शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
5
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
6
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
7
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
8
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
9
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
10
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
11
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
12
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
13
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
14
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
15
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
16
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
17
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
18
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
19
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
20
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा

मोठा गौप्यस्फोट! “प्रताप सरनाईकांच्या पत्राची लिंक नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे भेटीत; शिवसेनेत दोन गट”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 17:14 IST

या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थेट भाजपाच्या केद्रीय नेत्यांवर टीका केलेली नाही त्यांची देहबोली बदलली आहे असा दावा अंजली दमानिया यांनी केला.

ठळक मुद्देकोणतीही विचारधारा आणि तत्व नाहीत. केवळ पैसा एकमेव कारण आहे प्रताप सरनाईक यांच्याविरोधात सबळ पुरावे आहेत. त्यामुळे ते तपासातून बाहेर पडू शकत नाहीत.राजकारण पाहता शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत

मुंबई -  शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर राज्यातील राजकीय वातावरण पेटू लागलं आहे. सरनाईक यांनी भाजपाशी जुळवून घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रात केली आहे. मात्र प्रताप सरनाईक यांच्या पत्राची लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीत भेटीत आहे असा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या की, सध्याच्या डिजिटल युगात पत्र लिहितं का? व्हॉट्सअप, फोन, मेसेज करतो. पण हे शिवसेना आमदाराकडूनच असं पत्र लिहिलं गेले. त्यानंतर ते मीडियात आलं हे सगळं हास्यास्पद आहे. या पत्रात दोन मुद्दे असे आहेत ज्यात एकीकडे महाविकास आघाडीत शिवसेनेचा छळ केला जातोय म्हटलं जातं तर दुसरीकडे शिवसेना-भाजपा युतीतील नेत्यांचे संबंध तुटले नाहीत. ते तुटण्याआधी जुळवून घ्यावं. हे सगळं मोदी-ठाकरे भेटीनंतर घडलं आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थेट भाजपाच्या केद्रीय नेत्यांवर टीका केलेली नाही त्यांची देहबोली बदलली आहे असा दावा त्यांनी केला. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

इतकचं नाही तर शिवसेनेत सध्या दोन गट तयार झाले आहेत. एक मिलिंद नार्वेकरांचा तर दुसरा गट संजय राऊतांचा आहे. संजय राऊतांना शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत राहावं असं वाटतं तर नार्वेकरांना शिवसेनेने भाजपासोबत जावं असं वाटतं आहे. कोणतीही विचारधारा आणि तत्व नाहीत. केवळ पैसा एकमेव कारण आहे असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. प्रताप सरनाईक यांच्याविरोधात सबळ पुरावे आहेत. त्यामुळे ते तपासातून बाहेर पडू शकत नाहीत. मात्र राजकारण पाहता शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत असं दमानियांनी म्हटलं आहे.

प्रताप सरनाईकांच्या पत्रात काय?

आजच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. सरनाईक यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे. 'पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल,' असं सरनाईक यांनी पत्रात नमूद केलं आहे.

सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोपदेखील केले आहेत. 'तुम्ही मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत असताना दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असं काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांना वाटतं. त्यात काँग्रेस पक्ष एकला चलो रेची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षाचे नेते-कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचं चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत आहेत,' असा खळबळजनक दावा त्यांनी पत्रात केला आहे.

 काँग्रेस- राष्ट्रवादीही लक्ष्य

आपली, आपल्या पक्षाच्या आमदारांची व्यथा मांडताना सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला अकारण लक्ष केल्याची भावना शिवसैनिकांत आहे. या दोन्ही पक्षांसोबत महाआघाडी स्थापन केल्यानंतर आणि त्यापूर्वीही शिवसेनेची राजकीय स्पर्धा फक्त भाजपशी असताना या दोन पक्षांना लक्ष्य करून आघाडीत तेढ वाढवण्याची भूमिका नेमकी त्यांची आहे, की त्यामागे कोणी बोलविता धनी आहे याबाबत वेगवेगळे तर्क दिवसभर लढविले जात होते.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊत