शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आमचं ठरलंय! त्याला काय हुतंय?; काँग्रेस आमदाराचा कोल्हापुरी शैलीत ‘कोरोनाला तटवायचं’ इरादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 13:57 IST

कोल्हापूरात वाढणारा कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी असं आवाहन काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला केलं आहे.

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरी भागात पसरणाऱ्या कोरोनाने हळूहळू ग्रामीण भागातही पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूरातही आतापर्यंत १४ हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ७ हजाराहून जास्त रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ३८२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोल्हापूरात वाढणारा कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी असं आवाहन काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला केलं आहे. सुरुवातीला शहरी भागात पसरणारा कोरोना, आपल्या गावात, गल्लीत, दारात येऊन पोहचला आहे. सुरुवातील शासन, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस आपल्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. आता कम्युनिटी स्प्रेड होण्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे आपण स्वत:ची काळजी घ्यायला हवी, आजही मार्केट, दुकाने, बेकरी अशा अनेक ठिकाणी गर्दी असल्याचं चित्र आहे.

सोशल डिस्टेंसिंग आणि, मास्क घालणे सॅनिटायझरचा वापरही करत नाही, बऱ्याचदा मित्रांसोबत एकत्र बसणे, जेवायला एकत्र बसतो, गल्लीच्या कोपऱ्यावर मित्रमंडळी तासनतास गप्पा मारताना दिसतात. महिला मंडळीही दारात एकत्र बसून चर्चा करत असतात. त्याला काय हुतंय? ओपन ग्राऊंडवर खेळायचं तिथेही गर्दी, वाढदिवसाला मित्रमंडळी गर्दी करुन सेलिब्रेशन करतात, हातात हात देऊन टाळी देतो, सुट्टी आहे वेळ आहे म्हणून पार्ट्या केल्या जातात. मग त्याला काय हुतंय? कोरोना किती दिवस आहे माहिती नाही असं म्हणत लग्नाचा मुहुर्त काढून नियमांचे उल्लंघन करुन पै पाहुणे बोलवतो, खेळण्यासाठी आयुष्य आहे पण आता थोडं थांबू शकत नाही का? असं विचारलं आहे.

पावसाळा आहे म्हटल्यावर अनेक पर्यटनस्थळी जाता, रंकाळा, राधानगरी येथे लोक जमा होतात. मज्जा करायला गर्दी करतो, हे टाळता येणार नाही का? आम्ही सगळे घरचे आहोत असं म्हणत पाहुणे मंडळी, मित्रमंडळी नेहमीप्रमाणे ये जा करतो, हे सगळं आपण करत आलोय, कोरोना गेल्यानंतर पुढे करत राहू. पण आता काळ कठीण आहे. आपल्या जीवावर बेतलं आहे. त्यासाठी स्वत:ची, कुटुंबाची काळजी घ्या, लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटा, हे कोल्हापूर आहे, आता ठरलं की ठरलं, त्यामुळे पुन्हा एकदा आमचं ठरलंय, कोरोनाला तटवायचं असं म्हणत ऋतुराज पाटील यांनी व्हिडीओच्या माध्यमातून कोल्हापूरवासियांना आवाहन केले आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkolhapurकोल्हापूरRuturaj Patilऋतुराज पाटील