शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

आमचं ठरलंय! त्याला काय हुतंय?; काँग्रेस आमदाराचा कोल्हापुरी शैलीत ‘कोरोनाला तटवायचं’ इरादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 13:57 IST

कोल्हापूरात वाढणारा कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी असं आवाहन काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला केलं आहे.

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरी भागात पसरणाऱ्या कोरोनाने हळूहळू ग्रामीण भागातही पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूरातही आतापर्यंत १४ हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ७ हजाराहून जास्त रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ३८२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोल्हापूरात वाढणारा कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी असं आवाहन काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला केलं आहे. सुरुवातीला शहरी भागात पसरणारा कोरोना, आपल्या गावात, गल्लीत, दारात येऊन पोहचला आहे. सुरुवातील शासन, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस आपल्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. आता कम्युनिटी स्प्रेड होण्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे आपण स्वत:ची काळजी घ्यायला हवी, आजही मार्केट, दुकाने, बेकरी अशा अनेक ठिकाणी गर्दी असल्याचं चित्र आहे.

सोशल डिस्टेंसिंग आणि, मास्क घालणे सॅनिटायझरचा वापरही करत नाही, बऱ्याचदा मित्रांसोबत एकत्र बसणे, जेवायला एकत्र बसतो, गल्लीच्या कोपऱ्यावर मित्रमंडळी तासनतास गप्पा मारताना दिसतात. महिला मंडळीही दारात एकत्र बसून चर्चा करत असतात. त्याला काय हुतंय? ओपन ग्राऊंडवर खेळायचं तिथेही गर्दी, वाढदिवसाला मित्रमंडळी गर्दी करुन सेलिब्रेशन करतात, हातात हात देऊन टाळी देतो, सुट्टी आहे वेळ आहे म्हणून पार्ट्या केल्या जातात. मग त्याला काय हुतंय? कोरोना किती दिवस आहे माहिती नाही असं म्हणत लग्नाचा मुहुर्त काढून नियमांचे उल्लंघन करुन पै पाहुणे बोलवतो, खेळण्यासाठी आयुष्य आहे पण आता थोडं थांबू शकत नाही का? असं विचारलं आहे.

पावसाळा आहे म्हटल्यावर अनेक पर्यटनस्थळी जाता, रंकाळा, राधानगरी येथे लोक जमा होतात. मज्जा करायला गर्दी करतो, हे टाळता येणार नाही का? आम्ही सगळे घरचे आहोत असं म्हणत पाहुणे मंडळी, मित्रमंडळी नेहमीप्रमाणे ये जा करतो, हे सगळं आपण करत आलोय, कोरोना गेल्यानंतर पुढे करत राहू. पण आता काळ कठीण आहे. आपल्या जीवावर बेतलं आहे. त्यासाठी स्वत:ची, कुटुंबाची काळजी घ्या, लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटा, हे कोल्हापूर आहे, आता ठरलं की ठरलं, त्यामुळे पुन्हा एकदा आमचं ठरलंय, कोरोनाला तटवायचं असं म्हणत ऋतुराज पाटील यांनी व्हिडीओच्या माध्यमातून कोल्हापूरवासियांना आवाहन केले आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkolhapurकोल्हापूरRuturaj Patilऋतुराज पाटील