शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आमचं ठरलंय! त्याला काय हुतंय?; काँग्रेस आमदाराचा कोल्हापुरी शैलीत ‘कोरोनाला तटवायचं’ इरादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 13:57 IST

कोल्हापूरात वाढणारा कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी असं आवाहन काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला केलं आहे.

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरी भागात पसरणाऱ्या कोरोनाने हळूहळू ग्रामीण भागातही पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूरातही आतापर्यंत १४ हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ७ हजाराहून जास्त रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ३८२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोल्हापूरात वाढणारा कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी असं आवाहन काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला केलं आहे. सुरुवातीला शहरी भागात पसरणारा कोरोना, आपल्या गावात, गल्लीत, दारात येऊन पोहचला आहे. सुरुवातील शासन, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस आपल्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. आता कम्युनिटी स्प्रेड होण्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे आपण स्वत:ची काळजी घ्यायला हवी, आजही मार्केट, दुकाने, बेकरी अशा अनेक ठिकाणी गर्दी असल्याचं चित्र आहे.

सोशल डिस्टेंसिंग आणि, मास्क घालणे सॅनिटायझरचा वापरही करत नाही, बऱ्याचदा मित्रांसोबत एकत्र बसणे, जेवायला एकत्र बसतो, गल्लीच्या कोपऱ्यावर मित्रमंडळी तासनतास गप्पा मारताना दिसतात. महिला मंडळीही दारात एकत्र बसून चर्चा करत असतात. त्याला काय हुतंय? ओपन ग्राऊंडवर खेळायचं तिथेही गर्दी, वाढदिवसाला मित्रमंडळी गर्दी करुन सेलिब्रेशन करतात, हातात हात देऊन टाळी देतो, सुट्टी आहे वेळ आहे म्हणून पार्ट्या केल्या जातात. मग त्याला काय हुतंय? कोरोना किती दिवस आहे माहिती नाही असं म्हणत लग्नाचा मुहुर्त काढून नियमांचे उल्लंघन करुन पै पाहुणे बोलवतो, खेळण्यासाठी आयुष्य आहे पण आता थोडं थांबू शकत नाही का? असं विचारलं आहे.

पावसाळा आहे म्हटल्यावर अनेक पर्यटनस्थळी जाता, रंकाळा, राधानगरी येथे लोक जमा होतात. मज्जा करायला गर्दी करतो, हे टाळता येणार नाही का? आम्ही सगळे घरचे आहोत असं म्हणत पाहुणे मंडळी, मित्रमंडळी नेहमीप्रमाणे ये जा करतो, हे सगळं आपण करत आलोय, कोरोना गेल्यानंतर पुढे करत राहू. पण आता काळ कठीण आहे. आपल्या जीवावर बेतलं आहे. त्यासाठी स्वत:ची, कुटुंबाची काळजी घ्या, लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटा, हे कोल्हापूर आहे, आता ठरलं की ठरलं, त्यामुळे पुन्हा एकदा आमचं ठरलंय, कोरोनाला तटवायचं असं म्हणत ऋतुराज पाटील यांनी व्हिडीओच्या माध्यमातून कोल्हापूरवासियांना आवाहन केले आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkolhapurकोल्हापूरRuturaj Patilऋतुराज पाटील