शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

आमचं ठरलंय! त्याला काय हुतंय?; काँग्रेस आमदाराचा कोल्हापुरी शैलीत ‘कोरोनाला तटवायचं’ इरादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 13:57 IST

कोल्हापूरात वाढणारा कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी असं आवाहन काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला केलं आहे.

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरी भागात पसरणाऱ्या कोरोनाने हळूहळू ग्रामीण भागातही पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूरातही आतापर्यंत १४ हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ७ हजाराहून जास्त रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ३८२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोल्हापूरात वाढणारा कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी असं आवाहन काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला केलं आहे. सुरुवातीला शहरी भागात पसरणारा कोरोना, आपल्या गावात, गल्लीत, दारात येऊन पोहचला आहे. सुरुवातील शासन, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस आपल्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. आता कम्युनिटी स्प्रेड होण्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे आपण स्वत:ची काळजी घ्यायला हवी, आजही मार्केट, दुकाने, बेकरी अशा अनेक ठिकाणी गर्दी असल्याचं चित्र आहे.

सोशल डिस्टेंसिंग आणि, मास्क घालणे सॅनिटायझरचा वापरही करत नाही, बऱ्याचदा मित्रांसोबत एकत्र बसणे, जेवायला एकत्र बसतो, गल्लीच्या कोपऱ्यावर मित्रमंडळी तासनतास गप्पा मारताना दिसतात. महिला मंडळीही दारात एकत्र बसून चर्चा करत असतात. त्याला काय हुतंय? ओपन ग्राऊंडवर खेळायचं तिथेही गर्दी, वाढदिवसाला मित्रमंडळी गर्दी करुन सेलिब्रेशन करतात, हातात हात देऊन टाळी देतो, सुट्टी आहे वेळ आहे म्हणून पार्ट्या केल्या जातात. मग त्याला काय हुतंय? कोरोना किती दिवस आहे माहिती नाही असं म्हणत लग्नाचा मुहुर्त काढून नियमांचे उल्लंघन करुन पै पाहुणे बोलवतो, खेळण्यासाठी आयुष्य आहे पण आता थोडं थांबू शकत नाही का? असं विचारलं आहे.

पावसाळा आहे म्हटल्यावर अनेक पर्यटनस्थळी जाता, रंकाळा, राधानगरी येथे लोक जमा होतात. मज्जा करायला गर्दी करतो, हे टाळता येणार नाही का? आम्ही सगळे घरचे आहोत असं म्हणत पाहुणे मंडळी, मित्रमंडळी नेहमीप्रमाणे ये जा करतो, हे सगळं आपण करत आलोय, कोरोना गेल्यानंतर पुढे करत राहू. पण आता काळ कठीण आहे. आपल्या जीवावर बेतलं आहे. त्यासाठी स्वत:ची, कुटुंबाची काळजी घ्या, लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटा, हे कोल्हापूर आहे, आता ठरलं की ठरलं, त्यामुळे पुन्हा एकदा आमचं ठरलंय, कोरोनाला तटवायचं असं म्हणत ऋतुराज पाटील यांनी व्हिडीओच्या माध्यमातून कोल्हापूरवासियांना आवाहन केले आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkolhapurकोल्हापूरRuturaj Patilऋतुराज पाटील