शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Kerala assembly Election 2021 : RSS चा स्मगलरांशी काय संबंध? केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या अमित शाहांना बोचरा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 11:08 IST

Kerala assembly Election 2021: केरळमधील सोने आणि डॉलरच्या तस्करीची लिंक ही केरळ सरकारशी जुळली असल्याचा आरोप अमित शाहा यांनी केला होता. तपास यंत्रणांचा हवाला देऊन शाहा यांनी हा आरोप केला होता.

ठळक मुद्देअमित शाहा यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केरळचा अपमान केलाअनेक एजन्सींनी भारतामध्ये केरळ हे सर्वात कमी भ्रष्ट असल्याचे प्रमाणित केले आहे काँग्रेसनेसुद्धा अमित शाहांच्या या विधानावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही, कारण हे दोघेही एकसारखेच आहेत

तिरुवनंतपुरम - केरळमधील सत्ताधारी डावे पक्ष आणि मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती करणारे गृहमंत्री अमित शाहा यांना केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (P. Vijayan ) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Kerala assembly Election 2021) अमित शाहा (Amit Shah)यांनी सोने आणि डॉलर तस्करीच्या प्रकरणात केरळ सरकारला सात प्रश्न विचारले होते. त्याला प्रत्युत्तर देताना आता विजयन यांनी RSS चा स्मगलरांशी काय संबंध आहे, असा प्रतिप्रश्न अमित शाहांना विचारला आहे. (What is relation between RSS with smugglers? question of Kerala Chief Minister P. Vijayan to Amit Shah)

 केरळमधील सोने आणि डॉलरच्या तस्करीची लिंक ही केरळ सरकारशी जुळली असल्याचा आरोप अमित शाहा यांनी केला होता. तपास यंत्रणांचा हवाला देऊन शाहा यांनी हा आरोप केला होता. तस्करीतील आरोपींनी मुख्यमंत्री विजयन, विधानसभा अध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन आणि अनेक मंत्र्यांविरोधात सनसनाटी आरोप केल्याचे कस्टम विभागाने हायकोर्टात सांगितल्याचा दावा अमित शाहा यांनी केला होता. 

अमित शाहांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना केरळच्या मुख्यमंत्र्यांनी हे आरोप म्हणजे केरळचा अपमान असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, अमित शाहा यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केरळचा अपमान केला. केरळ ही भ्रष्टाचाराची भूमी असल्याचे ते म्हणाले. अनेक एजन्सींनी भारतामध्ये केरळ हे सर्वात कमी भ्रष्ट असल्याचे प्रमाणित केले आहे. मात्र काँग्रेसनेसुद्धा अमित शाहांच्या या विधानावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही, कारण हे दोघेही एकसारखेच आहेत. विजयन पुढे म्हणाले की, संघ परिवारामधील एक ज्ञात व्यक्ती डिप्लोमॅटिक बॅगेजमध्ये सोन्याची तस्करी करण्यामधील मुख्य सूत्रधार नाही आहे? तुम्हाला हे माहिती नाही आहे का? सीमा शुल्क पूर्णपणे सोन्याच्या तस्करीसारख्या देशविरोधी कृतीला रोखण्यासाठी जबाबदार नाही आहे. तिरुवनंतपुरम विमानतळ पूर्णपणे केंद्र सरकारच्या अधीन नाही आहे, अशी प्रश्नांची सरबत्तीच विजयन यांनी केली. भाजपा सत्तेवर आल्यानंतर तिरुवनंतपुरम विमानतळ सोन्याच्या तस्करीचे केंद्र कसे बनले? सोन्याची तस्करी सुलभपणे करण्यासाठी या विमानतळावरील विविध पदांवर संघ परिवारातील लोकांची जाणीवपूर्वक नियुक्ती नाही करण्यात आली नाही का? असा सावालही विजयन यांनी केला.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाKerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ