शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

"सक्रिय राजकारण अन् निवडणूक नियम माहीत नसतील तर शांत बसा", 'त्या' चुकीवरून भाजपाचा प्रियंका गांधींना सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 12:03 IST

Congress Priyanka Gandhi And BJP Jamyang Tsering Namgyal Kerala Assembly Election 2021 :

नवी दिल्ली - काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi ) यांची एका ट्विटमुळे फजिती झाली आहे. अनेकांनी त्यांच्यावर यामुळे निशाणा साधला आहे. भाजपाच्या एका खासदाराने प्रियंका गांधींची चूक सुधारली असून त्यांना चांगलंच सुनावलं आहे. सोशल मीडियावर लोकांनी प्रियंका गांधींना ट्रोल केलं. भाजपा नेता आणि लडाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल (Jamyang Tsering Namgyal) यांनी प्रियंका यांना निवडणूक नियम माहीत नसतील गप्प बसावं, असा सल्ला दिला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. 

प्रियंका गांधी यांनी "केरळमध्ये आमचे 50 टक्के उमेदवार 20 ते 40 वयोगटातले असल्याचा खूप अभिमान वाटतोय. आमच्या वरिष्ठ नेतृत्वाचा अनुभव आणि ज्ञानामुळे ते संयुक्तपणे एक शक्तीशाली ताकद बनतात. मला आशा आहे की, केरळच्या जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना मिळेल, जेणेकरुन युडीएफचा दृष्टीकोन समजेल" असं आपल्या ट्विट केलं होतं. आपल्या ट्विटमध्ये प्रियंका गांधींनी उमेदवारांचं किमान वय 20 वर्ष लिहिलं, त्यावरुन सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. 

भाजपा नेते जमयांग सेरिंग नामग्याल यांनी प्रियंका गांधींना यावरून सुनावलं आहे. "जर तुम्हाला सक्रिय राजकारण आणि निवडणूक नियम माहीत नसतील तर शांत बसणं एक चांगला पर्याय आहे" असा सणसणीत टोला त्यांनी प्रियंका गांधी यांना लगावला आहे. तसेच "भारतात निवडणूक लढण्याची किमान वयोमर्यादा 25 वर्ष आहे, आता तुमच्या 20 ते 25 वयोगटातील उमेदवारांचं काय होणार?" असंही खासदार नामग्याल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"केरळची लोकं हेच खरं सोनं पण मुख्यमंत्री सोन्याच्या तस्करीत आणि विदेशी कंपन्यांना कंत्राट देण्यात व्यस्त"

केरळमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण तापलं आहे. सत्तेवर असलेल्या एलडीएफ म्हणजेच लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रण्टवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी केरळमधील कोल्लमच्या करुनागप्पलीत निवडणक प्रचारादरम्यान राज्यातील पिनरई विजयन (Pinarayi Vijayan) सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री विजयन यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात उघडकीस आलेल्या सोने तस्करीच्या प्रकरणावरून प्रियंका गांधी यांनी निशाणा साधला आहे. तसेच केरळचे मुख्यमंत्री सोन्याच्या तस्करीत व्यस्त असल्याचं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

"केरळची लोकं हेच राज्याचं खरं सोनं आहेत. पण मुख्यमंत्री सोन्याची तस्करी करण्यात आणि विदेशी कंपन्यांना मासेमारीचे कंत्राट देण्यात व्यस्त आहेत. मुख्यमंत्री कॉर्पोरेट जाहीरनाम्याचं पालन करत असून, कॉर्पोरेट कंपन्यांच्या मालकांना राज्याची संपत्ती विकण्याचाच त्यांचा अजेंडा आहे" अशी घणाघाती टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. तसेच "तुमच्यासमोर तीन प्रकारच्या राजकारणाचे पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे शोषण, घोटाळे आणि हिंसाचार करणाऱ्या सीपीएमचं राजकारण. दुसरा द्वेषाचं आणि विभाजन करणारं भाजपाचं राजकारण. तर तिसरा पर्याय केरळच्या भविष्याची दृष्टी असलेलं काँग्रेसचं राजकारण. सीपीएमची मागील पाच वर्ष घोटाळे, दडपशाही आणि पक्षपातीपणाची होती" असं देखील प्रियंका यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीPoliticsराजकारणcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीIndiaभारतBJPभाजपा