शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"सक्रिय राजकारण अन् निवडणूक नियम माहीत नसतील तर शांत बसा", 'त्या' चुकीवरून भाजपाचा प्रियंका गांधींना सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 12:03 IST

Congress Priyanka Gandhi And BJP Jamyang Tsering Namgyal Kerala Assembly Election 2021 :

नवी दिल्ली - काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi ) यांची एका ट्विटमुळे फजिती झाली आहे. अनेकांनी त्यांच्यावर यामुळे निशाणा साधला आहे. भाजपाच्या एका खासदाराने प्रियंका गांधींची चूक सुधारली असून त्यांना चांगलंच सुनावलं आहे. सोशल मीडियावर लोकांनी प्रियंका गांधींना ट्रोल केलं. भाजपा नेता आणि लडाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल (Jamyang Tsering Namgyal) यांनी प्रियंका यांना निवडणूक नियम माहीत नसतील गप्प बसावं, असा सल्ला दिला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. 

प्रियंका गांधी यांनी "केरळमध्ये आमचे 50 टक्के उमेदवार 20 ते 40 वयोगटातले असल्याचा खूप अभिमान वाटतोय. आमच्या वरिष्ठ नेतृत्वाचा अनुभव आणि ज्ञानामुळे ते संयुक्तपणे एक शक्तीशाली ताकद बनतात. मला आशा आहे की, केरळच्या जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना मिळेल, जेणेकरुन युडीएफचा दृष्टीकोन समजेल" असं आपल्या ट्विट केलं होतं. आपल्या ट्विटमध्ये प्रियंका गांधींनी उमेदवारांचं किमान वय 20 वर्ष लिहिलं, त्यावरुन सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. 

भाजपा नेते जमयांग सेरिंग नामग्याल यांनी प्रियंका गांधींना यावरून सुनावलं आहे. "जर तुम्हाला सक्रिय राजकारण आणि निवडणूक नियम माहीत नसतील तर शांत बसणं एक चांगला पर्याय आहे" असा सणसणीत टोला त्यांनी प्रियंका गांधी यांना लगावला आहे. तसेच "भारतात निवडणूक लढण्याची किमान वयोमर्यादा 25 वर्ष आहे, आता तुमच्या 20 ते 25 वयोगटातील उमेदवारांचं काय होणार?" असंही खासदार नामग्याल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"केरळची लोकं हेच खरं सोनं पण मुख्यमंत्री सोन्याच्या तस्करीत आणि विदेशी कंपन्यांना कंत्राट देण्यात व्यस्त"

केरळमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण तापलं आहे. सत्तेवर असलेल्या एलडीएफ म्हणजेच लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रण्टवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी केरळमधील कोल्लमच्या करुनागप्पलीत निवडणक प्रचारादरम्यान राज्यातील पिनरई विजयन (Pinarayi Vijayan) सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री विजयन यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात उघडकीस आलेल्या सोने तस्करीच्या प्रकरणावरून प्रियंका गांधी यांनी निशाणा साधला आहे. तसेच केरळचे मुख्यमंत्री सोन्याच्या तस्करीत व्यस्त असल्याचं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

"केरळची लोकं हेच राज्याचं खरं सोनं आहेत. पण मुख्यमंत्री सोन्याची तस्करी करण्यात आणि विदेशी कंपन्यांना मासेमारीचे कंत्राट देण्यात व्यस्त आहेत. मुख्यमंत्री कॉर्पोरेट जाहीरनाम्याचं पालन करत असून, कॉर्पोरेट कंपन्यांच्या मालकांना राज्याची संपत्ती विकण्याचाच त्यांचा अजेंडा आहे" अशी घणाघाती टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. तसेच "तुमच्यासमोर तीन प्रकारच्या राजकारणाचे पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे शोषण, घोटाळे आणि हिंसाचार करणाऱ्या सीपीएमचं राजकारण. दुसरा द्वेषाचं आणि विभाजन करणारं भाजपाचं राजकारण. तर तिसरा पर्याय केरळच्या भविष्याची दृष्टी असलेलं काँग्रेसचं राजकारण. सीपीएमची मागील पाच वर्ष घोटाळे, दडपशाही आणि पक्षपातीपणाची होती" असं देखील प्रियंका यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीPoliticsराजकारणcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीIndiaभारतBJPभाजपा