शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कर्नाटक: कॉँग्रेस-जेडीएस आघाडीचे भाजपसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 03:42 IST

मोदी लाट असतानाही मागील लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपच्या जागा घटल्या होत्या. यावेळी काँग्रेसने जनता दलाशी (सेक्युलर) आघाडी केली.

बंगळुरू : मोदी लाट असतानाही मागील लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपच्या जागा घटल्या होत्या. यावेळी काँग्रेसने जनता दलाशी (सेक्युलर) आघाडी केली. ही आघाडी व विधानसभेत वाढलेल्या मतांच्या टक्क्याने कॉँग्रेस अधिक यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. सन २००९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला १९, कॉँग्रेसला ६ तर जनता दलाला ३ जागा मिळाल्या होत्या. सन २०१४च्या निवडणुकीमध्ये भाजपला १७, कॉँग्रेसला ९ तर जनता दलाला २ जागा मिळाल्या होत्या.मागील वर्षी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मोठी चुरस दिसून आली. कोणालाच बहुमत न मिळाल्यामुळे कॉँग्रेस-जनता दलाने आघाडी करून सत्ता स्थापन केली आहे. विधानसभेत कॉँग्रेसला ३८ टक्के (यापूर्वी ३६.६ टक्के) मते मिळाली. कॉँग्रेसची मते वाढली असली तरी त्यांच्या जागा मात्र घटल्या. ही किमया तिरंगी लढतींमुळे झाली. यावेळी कॉँग्रेस-जनता दलाने आघाडी करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना अधिक जागा मिळण्याची अपेक्षा आहे.देवेगौडांची तिसरी पिढीही सक्रियमाजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची तिसरी पिढी या निवडणुकीतून राजकारणामध्ये प्रवेश करीत आहे. हसन या देवेगौडा यांच्या नेहमीच्या मतदारसंघातून त्यांचे नातू प्रज्वल रेवण्णा निवडणूक लढवत आहेत, तर दुसरे नातू आणि मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी यांच्या मतदारसंघात मतदान दुसऱ्या टप्प्यात झाले आहे. स्वत: देवेगौडाही रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीमधून देवेगौडा यांची तिसरी पिढी राजकारणामध्ये सक्रिय होत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKarnataka Lok Sabha Election 2019कर्नाटक लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपा