शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

बिजदमधून आलेले जय पांडा हे भाजपासाठी फायद्याचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 04:36 IST

रोशोगोल्ला कुणाचा या मुद्द्यावरून पश्चिम बंगाल व ओडिशा या दोन राज्यांत वाद सुरू असताना, भाजपाने या दोन्ही राज्यांमध्ये स्वत:चे तोंड गोड करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त चालवली आहे.

- रवि टालेरोशोगोल्ला कुणाचा या मुद्द्यावरून पश्चिम बंगाल व ओडिशा या दोन राज्यांत वाद सुरू असताना, भाजपाने या दोन्ही राज्यांमध्ये स्वत:चे तोंड गोड करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त चालवली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपाने आधी प. बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते मुकुल रॉय यांना पावन करून घेतले. आता २०१८ मध्ये ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाचा राजीनामा दिलेले बैजयंत ऊर्फ ‘जय’ पांडा यांना पक्षात प्रवेश दिला आहे.बिजदचा राजीनामा देण्यापूर्वी पांडा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय होते. पटनायक यांचे वडील बिजू पटनायक यांच्याही ते विश्वासातेले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रापाडा मतदारसंघातून बिजदतर्फे विजयी झालेल्या पांडा यांची प्रतिमा स्वच्छ आहे. अमेरिकेतून अभियांत्रिकी व व्यवस्थापनाची पदवी घेतलेल्या पांडा यांनी सामाजिक क्षेत्रातही भरीव काम केले. तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी करण्यास मोहीम हाती घेतली. कुपोषणाविरोधात आवाज उठविला. रोजगारासाठी ओडिशातून अन्य राज्यांत स्थलांतर करणाऱ्या मजुरांचा आवाज बुलंद करण्यातही ते आघाडीवर असतात.पांडा यांना पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली बिजदने निलंबित केले होते. त्यानंतर त्यांनी पक्ष सदस्यत्व व खासदारकीचा राजीनामा दिला. तेव्हापासूनच ते कोणत्या पक्षाचा मार्ग धरणार याविषयी चर्चा सुरू होती. आता पांडांमुळे भाजपाला किती लाभ होणार व बिजदचे किती नुकसान होणार, ही चर्चा सुरू झाली आहे.हिंदी भाषिक पट्ट्यातील संभाव्य नुकसानाची भरपाई करण्यासाठी भाजपाने लक्ष केंद्रित केलेल्या राज्यांमध्ये ओडिशाचा क्रमांक वरचा आहे; मात्र केंद्रीय मंत्री धर्मेश प्रधान वगळता भाजपाकडे ओडिशामध्ये आश्वासक चेहराच नाही. ती कमतरता काही अंशी पांडा यांच्यामुळे भरून निघेल अशी शक्यता नाही, कारण ते लोकनेते नाहीत. पण बिजदला कंटाळलेल्या लोकांना भाजपा हा उत्तम पर्याय असल्याचा संदेश पोहचविण्यासाठी पांडा यांचा उपयोग होईल. त्यापेक्षाही पांडा यांच्या पत्नीच्या मालकीच्या प्रादेशिक वृत्त वाहिनीचा भाजपाला जास्त लाभ होईल, असा राजकीय निरीक्षकांचा होरा आहे. गेल्या एक दशकात दूरचित्रवाणी वाहिन्यांचा प्रभाव ओडिशामध्ये चांगलाच वाढला आहे. त्यामुळे या वृत्तवाहिनीद्वारे पक्ष घराघरात पोहचविण्याचे काम होऊ शकते, असे भाजपा नेतृत्वाला वाटत भाजपाचे संघटन बिजदच्या तुलनेत कमकुवत आहे. त्यामुळे जगतसिंगपूर, भद्रक, जाजपूर व कटक या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये पांडा पक्षासाठी मोठी भूमिका निभावू शकतील, अशी अपेक्षा भाजपाला आहे. ती पार पाडण्यात पांडा यशस्वी होतात का, याचे उत्तर काळच देईल. त्यात ते यशस्वी झाल्यास त्यांची राजकीय कारकीर्द नव्या उंचीवर जाऊ शकेल; मात्र अपेक्षा पूर्ण न झाल्यास, त्यांची गत त्यांचे एकेकाळचे सहकारी बिजॉय मोहपात्रा व दिलीप रे यांच्याप्रमाणही होऊ शकेल. मोहपात्रा व दिलीप रे यांनीही पांडा यांच्याप्रमाणेच भाजपाची कास धरली होती; मात्र बराच काळ उपेक्षा झाल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी बाहेरचा रस्ता धरला! बहुधा त्यामुळेच पांडा यांनी भाजपाचा झेंडा खांद्यावर घेण्यास बराच विलंब केला असावा.