शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

बसपाच्या तोंडी ‘जय लोहिया’, सपाच्या मुखात ‘जय कांशीराम’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 03:58 IST

मायावती, अखिलेश यादव आघाडी; उत्तर प्रदेशातील राजकारण बदलले

लखनऊ : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात आघाडी केलेल्या सपा व बसपाचे नेते जिंकण्याच्या ईर्षेने प्रचाराला लागले आहेत. बसपाचे नेते प्रचारसभांत ‘जय भीम, जय भारत’ याबरोबरच ‘जय लोहिया, जय समाजवाद’ या सपाच्या घोषणाही देऊ लागले आहेत, तर सपाचे नेते राममनोहर लोहिया यांना आदर्श मानत असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मायावती, कांशीराम यांचाही जयजयकार करू लागले आहेत.सभेच्या ठिकाणी सपा, बसपाचे झेंडे एकत्रपणे दिमाखाने फडकत असतात. मात्र तरीही एक प्रश्न आवर्जून विचारला जातो की, सपाकडे असलेली यादवांची तसेच बसपाकडे असलेली जाटव यांची मते परस्परांच्या उमेदवारांना मिळवून देण्यात त्यांना यश येईल का? हे दोन्ही पक्ष सुमारे दोन दशके एकमेकांचे कट्टर राजकीय हाडवैरी होते. आग्रा येथील बसपाचे नेते रवींद्र पारस वाल्मिकी यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांचे या वेळी खऱ्या अर्थाने मनोमिलन झाले आहे. सपाच्या कार्यकर्त्यांनी १९९५ साली लखनऊच्या सरकारी विश्रामधामात मायावतींवर हल्ला केला होता. त्या घटनेपासून दोन्ही पक्षांत वितुष्ट निर्माण झाले होते. मात्र आता हा सारा इतिहास झाला.जनतेच्या दबावामुळेच सपा, बसपाला लोकसभा निवडणुकांत आघाडी करावी लागली आहे. उत्तर प्रदेशात दोन्ही पक्षांच्या यादव व जाटव समुदायातील कार्यकर्त्यांमध्ये एकी होणार का यावर त्यांचे यश अपयश अवलंबून आहे. इटावा येथील कोठी बिचपुरा गावातील जाटव समाजातील शेतकरी रामदास म्हणाले की, सपाबरोबर आघाडी करून मायावतींनी दलितांचा अपेक्षाभंग केला आहे.यादवांची मतेही बसपालासराय इसार गावातील शिशुपाल सिंह यादव यांनी सांगितले की, सपाची यादवांची मते बसपाच्या उमेदवारांना मिळण्यात काही अडचणी येतील असे वाटत नाही. मायावतींविषयी आमच्या मनात आकस नाही. योगी यांच्यापेक्षा मायावती-सपाचे सरकार केव्हाही चांगलेच असेल.सपाचे सरकार असताना गुंडांना मोकळे रान होते. लोकसभा निवडणुकांनंतर गुंडांचे राज्य पुन्हा प्रस्थापित होणार असेल तर मग दलितांना कोण वाली उरणार? अर्थात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मात्र सर्व जाती आमच्याबरोबर असल्याचा दावा करीत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा