शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

बसपाच्या तोंडी ‘जय लोहिया’, सपाच्या मुखात ‘जय कांशीराम’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 03:58 IST

मायावती, अखिलेश यादव आघाडी; उत्तर प्रदेशातील राजकारण बदलले

लखनऊ : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात आघाडी केलेल्या सपा व बसपाचे नेते जिंकण्याच्या ईर्षेने प्रचाराला लागले आहेत. बसपाचे नेते प्रचारसभांत ‘जय भीम, जय भारत’ याबरोबरच ‘जय लोहिया, जय समाजवाद’ या सपाच्या घोषणाही देऊ लागले आहेत, तर सपाचे नेते राममनोहर लोहिया यांना आदर्श मानत असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मायावती, कांशीराम यांचाही जयजयकार करू लागले आहेत.सभेच्या ठिकाणी सपा, बसपाचे झेंडे एकत्रपणे दिमाखाने फडकत असतात. मात्र तरीही एक प्रश्न आवर्जून विचारला जातो की, सपाकडे असलेली यादवांची तसेच बसपाकडे असलेली जाटव यांची मते परस्परांच्या उमेदवारांना मिळवून देण्यात त्यांना यश येईल का? हे दोन्ही पक्ष सुमारे दोन दशके एकमेकांचे कट्टर राजकीय हाडवैरी होते. आग्रा येथील बसपाचे नेते रवींद्र पारस वाल्मिकी यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांचे या वेळी खऱ्या अर्थाने मनोमिलन झाले आहे. सपाच्या कार्यकर्त्यांनी १९९५ साली लखनऊच्या सरकारी विश्रामधामात मायावतींवर हल्ला केला होता. त्या घटनेपासून दोन्ही पक्षांत वितुष्ट निर्माण झाले होते. मात्र आता हा सारा इतिहास झाला.जनतेच्या दबावामुळेच सपा, बसपाला लोकसभा निवडणुकांत आघाडी करावी लागली आहे. उत्तर प्रदेशात दोन्ही पक्षांच्या यादव व जाटव समुदायातील कार्यकर्त्यांमध्ये एकी होणार का यावर त्यांचे यश अपयश अवलंबून आहे. इटावा येथील कोठी बिचपुरा गावातील जाटव समाजातील शेतकरी रामदास म्हणाले की, सपाबरोबर आघाडी करून मायावतींनी दलितांचा अपेक्षाभंग केला आहे.यादवांची मतेही बसपालासराय इसार गावातील शिशुपाल सिंह यादव यांनी सांगितले की, सपाची यादवांची मते बसपाच्या उमेदवारांना मिळण्यात काही अडचणी येतील असे वाटत नाही. मायावतींविषयी आमच्या मनात आकस नाही. योगी यांच्यापेक्षा मायावती-सपाचे सरकार केव्हाही चांगलेच असेल.सपाचे सरकार असताना गुंडांना मोकळे रान होते. लोकसभा निवडणुकांनंतर गुंडांचे राज्य पुन्हा प्रस्थापित होणार असेल तर मग दलितांना कोण वाली उरणार? अर्थात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मात्र सर्व जाती आमच्याबरोबर असल्याचा दावा करीत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा