शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

महामंडळांवरील नेमणुकांसाठी टोकाचा आग्रह धरणे बरे नव्हे! शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यात झाली खलबते

By अतुल कुलकर्णी | Updated: June 8, 2021 05:32 IST

Sharad Pawar and Balasaheb Thorat : या दोन नेत्यांमध्ये साखर कारखान्यांचे प्रश्न आणि महामंडळावरील नियुक्त्या या दोन प्रमुख विषयांवर चर्चा झाली.

- अतुल कुलकर्णी

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन दीड वर्ष उलटून गेले. अद्याप विविध महामंडळांवरील नेमणुकांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. यासाठी टोकाचा आग्रह धरणे योग्य होणार नाही, अशी भूमिका काँग्रेसचे वरिष्ठ नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर मांडल्याचे समजते.

या दोन नेत्यांमध्ये साखर कारखान्यांचे प्रश्न आणि महामंडळावरील नियुक्त्या या दोन प्रमुख विषयांवर चर्चा झाली. साखर कारखान्यांवर ऊस आल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांत शेतकऱ्यांना उसाचे पैसे द्यावे लागतात. त्यानंतर साखर तयार होणे आणि ती बाजारात विक्रीसाठी नेणे, यात काही काळ जातो. सध्या साखरेला देशात उठावच नाही. अनेक कारखान्यांमध्ये साखर पडून आहे. त्यामुळे कारखान्यांना शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी घ्यावे लागलेले कर्ज आणि साखर पडून राहिली राहिल्यामुळे होत असलेले नुकसान, यातून कशा पद्धतीने मार्ग काढायचा यावर बैठकीत चर्चा झाली.

यासंदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, आमची बैठक झाली. साखर कारखान्यांच्या संदर्भात गांभीर्याने चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि आम्ही यावर तोडगा काढू. महामंडळावरील नियुक्त्यांचा प्रश्न यापूर्वी समन्वय समितीच्या बैठकीत चर्चेला आला होता. त्यानुसार पुणे आणि नाशिकची काही महामंडळे राष्ट्रवादीला देण्यात आली होती. मुंबईत काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार जास्त असल्यामुळे तेथील महामंडळे त्यांना द्यावीत, असा तोडगाही त्या बैठकीत काढण्यात आला होता.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण या सगळ्यांची त्याला मान्यता होती. मात्र बैठक संपत असताना उपमुख्यमंत्री आले आणि त्यांनी मुंबईच्या महामंडळासाठी आग्रह धरला. हे होत नसेल तर काहीच करू नका, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे या विषयावर पुढे बैठकच झाली नाही. ही बाब शरद पवार यांच्या कानावर घालण्यात आल्याचे समजते. महामंडळासारखे विषय फार काळ प्रलंबित ठेवणे योग्य नाही. जास्त ताणत गेलो तर विषय तुटत जातात. ते होऊ नये म्हणून लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावेत. दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे, अशीही चर्चा बैठकीत झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

माध्यमांसमोर विषय मांडण्यावर चर्चा शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या बैठकीत मंत्र्यांमधील समन्वय हा विषय चर्चेला आल्याचे समजते. मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार किंवा ऊर्जामंत्री नितीन राऊत हे ज्या पद्धतीने माध्यमांसमोर विषय मांडतात, त्याविषयी पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. ज्या त्या विभागाच्या मंत्र्यांनी आपापल्या विषयापुरते बोलावे, याला शरद पवार यांनीदेखील सहमती दर्शविल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण