शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळांवरील नेमणुकांसाठी टोकाचा आग्रह धरणे बरे नव्हे! शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यात झाली खलबते

By अतुल कुलकर्णी | Updated: June 8, 2021 05:32 IST

Sharad Pawar and Balasaheb Thorat : या दोन नेत्यांमध्ये साखर कारखान्यांचे प्रश्न आणि महामंडळावरील नियुक्त्या या दोन प्रमुख विषयांवर चर्चा झाली.

- अतुल कुलकर्णी

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन दीड वर्ष उलटून गेले. अद्याप विविध महामंडळांवरील नेमणुकांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. यासाठी टोकाचा आग्रह धरणे योग्य होणार नाही, अशी भूमिका काँग्रेसचे वरिष्ठ नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर मांडल्याचे समजते.

या दोन नेत्यांमध्ये साखर कारखान्यांचे प्रश्न आणि महामंडळावरील नियुक्त्या या दोन प्रमुख विषयांवर चर्चा झाली. साखर कारखान्यांवर ऊस आल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांत शेतकऱ्यांना उसाचे पैसे द्यावे लागतात. त्यानंतर साखर तयार होणे आणि ती बाजारात विक्रीसाठी नेणे, यात काही काळ जातो. सध्या साखरेला देशात उठावच नाही. अनेक कारखान्यांमध्ये साखर पडून आहे. त्यामुळे कारखान्यांना शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी घ्यावे लागलेले कर्ज आणि साखर पडून राहिली राहिल्यामुळे होत असलेले नुकसान, यातून कशा पद्धतीने मार्ग काढायचा यावर बैठकीत चर्चा झाली.

यासंदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, आमची बैठक झाली. साखर कारखान्यांच्या संदर्भात गांभीर्याने चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि आम्ही यावर तोडगा काढू. महामंडळावरील नियुक्त्यांचा प्रश्न यापूर्वी समन्वय समितीच्या बैठकीत चर्चेला आला होता. त्यानुसार पुणे आणि नाशिकची काही महामंडळे राष्ट्रवादीला देण्यात आली होती. मुंबईत काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार जास्त असल्यामुळे तेथील महामंडळे त्यांना द्यावीत, असा तोडगाही त्या बैठकीत काढण्यात आला होता.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण या सगळ्यांची त्याला मान्यता होती. मात्र बैठक संपत असताना उपमुख्यमंत्री आले आणि त्यांनी मुंबईच्या महामंडळासाठी आग्रह धरला. हे होत नसेल तर काहीच करू नका, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे या विषयावर पुढे बैठकच झाली नाही. ही बाब शरद पवार यांच्या कानावर घालण्यात आल्याचे समजते. महामंडळासारखे विषय फार काळ प्रलंबित ठेवणे योग्य नाही. जास्त ताणत गेलो तर विषय तुटत जातात. ते होऊ नये म्हणून लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावेत. दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे, अशीही चर्चा बैठकीत झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

माध्यमांसमोर विषय मांडण्यावर चर्चा शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या बैठकीत मंत्र्यांमधील समन्वय हा विषय चर्चेला आल्याचे समजते. मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार किंवा ऊर्जामंत्री नितीन राऊत हे ज्या पद्धतीने माध्यमांसमोर विषय मांडतात, त्याविषयी पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. ज्या त्या विभागाच्या मंत्र्यांनी आपापल्या विषयापुरते बोलावे, याला शरद पवार यांनीदेखील सहमती दर्शविल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण