शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जन्माला आलेला माणूस मरणारच हा निसर्गाचा नियम, कोरोनामुळे मृत्यू नाही- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 09:45 IST

कोरोनावर माझा विश्वास नाही, माझ्या डोळ्याला दिसते ते मी बोलतोय, सरकारने सगळं सुरु करावे, आम्ही ५ वर्ष तुम्हाला राज्य करायला दिली आहेत. आमचं आयुष्य नियंत्रण करायला दिली नाही.

ठळक मुद्देमागच्या १० वर्षात देशात एक दिवसही मृत्यू झाला नाही असं उदाहरण द्या. हे सरकार लोकांना फसवत आहे. २०१९ आणि २०२० च्या मृत्यूची आकडेवारी पाहा.घरामध्येच लोकांना डांबून ठेवण्याचा सरकारला अधिकार नाही

मुंबई – सरकारला कोरोनासंदर्भात काही माहिती नाही, माहिती असती तर आम्हाला आंदोलन करावे लागले नसते, धार्मिकस्थळे सरकारने उघडली असती, प्रत्येक बाबीत आंदोलन करावी लागत आहे. राज्य सरकार कोरोनाच्या नावावर लोकांना फसवत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्याची लोकसंख्या ८ ते १० कोटी आहेत, बुद्धाने एक गोष्ट सांगितली की, जो माणूस जन्माला आला त्याला एक दिवशी मृत्यू येणारच आहे. आता १० कोटीत २००-२५० लोकांना मृत्यू आला तर त्यात नवीन काय आहे? हा निसर्गाचा नियम आहे. जर यापेक्षा जास्त लोकं दगावली असती तर काही महामारी आली असं म्हणता येईल. कोरोनामुळे कोणाचा मृत्यू होत नाही, निसर्गाच्या नियमानुसार त्याचा मृत्यू होतो. एकातरी हॉस्पिटलने पोस्टमोर्टममध्ये लिहिलं आहे का? की या माणसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे? कोविडमुळे मृत्यू झाला हे प्रमाणपत्र मिळालं आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.  

तसेच कोरोनावर माझा विश्वास नाही, माझ्या डोळ्याला दिसते ते मी बोलतोय, सरकारने सगळं सुरु करावे, आम्ही ५ वर्ष तुम्हाला राज्य करायला दिली आहेत. आमचं आयुष्य नियंत्रण करायला दिली नाही. घरामध्येच लोकांना डांबून ठेवण्याचा सरकारला अधिकार नाही, मला कुठे बाहेर जायचं असेल त्यावर बंदी आणता येत नाही, हा घटनेवरचा आघात आहे. मार्च, एप्रिल, मे याचे मृत्यूची आकडेवारी काढली तर मागच्या वर्षीच्या तुलनेत मृत्यू कमी झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेवर अमेरिकेने आरोप केले आहेत. जनतेच्या लुटीमध्ये WHO चाही सहभाग आहे. मागच्या १० वर्षात देशात एक दिवसही मृत्यू झाला नाही असं उदाहरण द्या. माणूस जन्माला आला त्याचा मृत्यू होणारच आहे असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, मी सातत्याने सांगतोय हे सरकार लोकांना फसवत आहे. २०१९ आणि २०२० च्या मृत्यूची आकडेवारी पाहा. भाजपाने कधीही मंदिर उघडण्याची मागणी केली नव्हती. वारकऱ्यांनी महिनाभरापासून ही मागणी केली नाही. भाजपाचं हिंदुत्व हे इतर धर्माच्या विरोधातलं आहे. आमचं आंदोलन बहुजनांसाठी आहे. बारा बलुतेदारांची दुकाने मंदिराशेजारी आहे. मंदिर सुरु झाले तर त्यांचा रोजगार सुरु होईल. धर्माची विचारसरणी ही सैविधानिक जुळलेली आहे. भाजपा हिंदुत्ववादी नव्हे तर मनुवाद्यांची पार्टी आहे. आमचा लढा हा मनुवाद्यांशी आहे. आम्ही कुठेही आमचा मार्ग बदलला आहे असं कुठेही नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा