शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

जन्माला आलेला माणूस मरणारच हा निसर्गाचा नियम, कोरोनामुळे मृत्यू नाही- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 09:45 IST

कोरोनावर माझा विश्वास नाही, माझ्या डोळ्याला दिसते ते मी बोलतोय, सरकारने सगळं सुरु करावे, आम्ही ५ वर्ष तुम्हाला राज्य करायला दिली आहेत. आमचं आयुष्य नियंत्रण करायला दिली नाही.

ठळक मुद्देमागच्या १० वर्षात देशात एक दिवसही मृत्यू झाला नाही असं उदाहरण द्या. हे सरकार लोकांना फसवत आहे. २०१९ आणि २०२० च्या मृत्यूची आकडेवारी पाहा.घरामध्येच लोकांना डांबून ठेवण्याचा सरकारला अधिकार नाही

मुंबई – सरकारला कोरोनासंदर्भात काही माहिती नाही, माहिती असती तर आम्हाला आंदोलन करावे लागले नसते, धार्मिकस्थळे सरकारने उघडली असती, प्रत्येक बाबीत आंदोलन करावी लागत आहे. राज्य सरकार कोरोनाच्या नावावर लोकांना फसवत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्याची लोकसंख्या ८ ते १० कोटी आहेत, बुद्धाने एक गोष्ट सांगितली की, जो माणूस जन्माला आला त्याला एक दिवशी मृत्यू येणारच आहे. आता १० कोटीत २००-२५० लोकांना मृत्यू आला तर त्यात नवीन काय आहे? हा निसर्गाचा नियम आहे. जर यापेक्षा जास्त लोकं दगावली असती तर काही महामारी आली असं म्हणता येईल. कोरोनामुळे कोणाचा मृत्यू होत नाही, निसर्गाच्या नियमानुसार त्याचा मृत्यू होतो. एकातरी हॉस्पिटलने पोस्टमोर्टममध्ये लिहिलं आहे का? की या माणसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे? कोविडमुळे मृत्यू झाला हे प्रमाणपत्र मिळालं आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.  

तसेच कोरोनावर माझा विश्वास नाही, माझ्या डोळ्याला दिसते ते मी बोलतोय, सरकारने सगळं सुरु करावे, आम्ही ५ वर्ष तुम्हाला राज्य करायला दिली आहेत. आमचं आयुष्य नियंत्रण करायला दिली नाही. घरामध्येच लोकांना डांबून ठेवण्याचा सरकारला अधिकार नाही, मला कुठे बाहेर जायचं असेल त्यावर बंदी आणता येत नाही, हा घटनेवरचा आघात आहे. मार्च, एप्रिल, मे याचे मृत्यूची आकडेवारी काढली तर मागच्या वर्षीच्या तुलनेत मृत्यू कमी झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेवर अमेरिकेने आरोप केले आहेत. जनतेच्या लुटीमध्ये WHO चाही सहभाग आहे. मागच्या १० वर्षात देशात एक दिवसही मृत्यू झाला नाही असं उदाहरण द्या. माणूस जन्माला आला त्याचा मृत्यू होणारच आहे असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, मी सातत्याने सांगतोय हे सरकार लोकांना फसवत आहे. २०१९ आणि २०२० च्या मृत्यूची आकडेवारी पाहा. भाजपाने कधीही मंदिर उघडण्याची मागणी केली नव्हती. वारकऱ्यांनी महिनाभरापासून ही मागणी केली नाही. भाजपाचं हिंदुत्व हे इतर धर्माच्या विरोधातलं आहे. आमचं आंदोलन बहुजनांसाठी आहे. बारा बलुतेदारांची दुकाने मंदिराशेजारी आहे. मंदिर सुरु झाले तर त्यांचा रोजगार सुरु होईल. धर्माची विचारसरणी ही सैविधानिक जुळलेली आहे. भाजपा हिंदुत्ववादी नव्हे तर मनुवाद्यांची पार्टी आहे. आमचा लढा हा मनुवाद्यांशी आहे. आम्ही कुठेही आमचा मार्ग बदलला आहे असं कुठेही नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा