शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

Raj Thackeray: मुकेश अंबानींना सुरक्षा कोण पुरविते? इस्त्रायल, मध्य प्रदेश पोलीस; राज ठाकरेंचे प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 13:01 IST

Raj Thackreay on Mukesh Ambani Security: दहशतवादी बॉम्ब ठेवतात असं आपण आजवर घटना पाहत आलो. पण आता पोलीस बॉम्ब ठेवतात ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय धक्कादायक बाब आहे. बॉम्ब ठेवणारा सचिन वाझे हा उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारकडून योग्य पद्धतीनं होणार नाही. केंद्र सरकारनं या प्रकरणाची कसून चौकशी करायला हवी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. 

मुकेश अंबानींकडून (Mukesh Ambani) पैसे काढणे एवढे सोपे आहे का? ज्या मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध आहेत त्यां अंबानींकडे पोलीस (Mumbai Police) पैसे मागायला जातील का? गेलेच तर पोलीस खात्यात राहतील का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackreay) 100 कोटी रुपयांच्या लेटर बॉम्ब प्रकरणावर केला आहे. (Why Mukesh Ambani get police security from Madhya pradesh police? Raj Thackreay ask question.)

Parambir Singh: 'जिलेटीनपेक्षा 100 कोटींची चिठ्ठी अधिक स्फोटक'; कोणत्याही क्षणी केंद्राची महाशक्ती ED ची एन्ट्री शक्य

दहशतवादी बॉम्ब ठेवतात असं आपण आजवर घटना पाहत आलो. पण आता पोलीस बॉम्ब ठेवतात ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय धक्कादायक बाब आहे. बॉम्ब ठेवणारा सचिन वाझे हा उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारकडून योग्य पद्धतीनं होणार नाही. केंद्र सरकारनं या प्रकरणाची कसून चौकशी करायला हवी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. 

याचबरोबर मुकेश अंबानींना इस्त्रायलची यंत्रणा सुरक्षा पुरविते. त्यांच्या सुरक्षेसाठी इस्त्रायलची लोकं आहेत. इस्त्रायलची यंत्रणा काय आहे हे साऱ्या जगाला माहिती आहे. मुकेश अंबानींना इतर पोलीस सुरक्षा आहे ही मध्य प्रदेश सरकारची आहे. त्यांच्या ताफ्यात सहा सात रेंज रोव्हर आणि त्यात हे पोलीस बसलेले असतात. मुंबईतील माणसाला मध्य प्रदेश सुरक्षा का पुरविते हे समजलेले नाही. एखादा माणूस त्या रोडवर जरी दोनदा गेला तरी त्याची चौकशी होते. त्या रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी कशी गेली? धमकी देणारा माणूस आदराने पत्र पाठवतो. गुड नाईटचे स्पेलिंग एनआयटी असे आहे. या पत्राचा टोन गुजराती आहे. त्या अंबानींकडून पत्र काढणे सोपे आहे का? असा सवाल करत राज ठाकरेंनी हे प्रकरण भरकटवले जात असल्याचा आरोप केला. 

Sachin Vaze: सचिन वाझेंचे आयुष्यच रहस्यमय! स्वत:चे मेसेंजिंग अ‍ॅप, मराठी फेसबुक ते रितेश-जेनेलियावर खटला...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Raj Thackeray Demands Central Government to inquire in the mukesh ambani bomb scare case and allegations on Anil Deshmukh)

Raj Thackeray: परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब; राज ठाकरेंनी उपस्थित केले १० महत्त्वाचे मुद्दे

परमबीर सिंग यांची बदली नेमकी कशासाठी?"बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणात जर सचिन वाझेचा हात होता. मग मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली का केली गेली? आणि जर परमबीर सिंगही यात सामील असतील मग त्यांची चौकशी न करता त्यांची बदली का केली गेली? या प्रश्नाचं उत्तर सरकारनं द्यावं. कारण परमबीर सिंग यांच्या बदलीचं नेमकं कारणंच सरकारनं दिलेलं नाही", असं राज ठाकरे म्हणाले. 

मुंबईचं १०० कोटींचं टार्गेट मग इतर शहरांचं काय?राज्याचा गृहमंत्री मुंबईसारख्या शहराच्या पोलीस आयुक्तांना वसुलीचं टार्गेट देतो हा अतिशय घाणेरडा प्रकार असून मुंबईसाठी जर देशमुखांनी १०० कोटींचं टार्गेट दिलं होतं तर इतर शहरांमध्ये काय परिस्थिती असेल?, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. यासोबत परमबीर सिंग मुंबईचे पोलीस आयुक्त होऊन वर्षभराचा कालावधी झाला आहे. जर महिन्याला १०० कोटी पकडले तर वर्षाचे १२०० कोटी रुपये जमा झाल्याचं आपण समजायचं का? इतका पैसा गेला कुठे?, असे सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMukesh Ambaniमुकेश अंबानीsachin Vazeसचिन वाझेParam Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुख