शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्याचा आदर राखला जात नसेल तर काॅंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावे - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 10:27 IST

Prakash Ambedkar's Advice to Congress : काॅंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे दिला.

ठळक मुद्दे आपत्ती व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार मंत्री वडेट्टीवार यांनी ‘अनलाॅक ’जाहीर केले; मुख्यमंत्र्यांनी ते रद्द कले हे चुकीचे असून, आपत्ती व्यवस्थानाचे निर्णय लागू झाले पाहीजे.त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करणे चुकीचे आहे

अकोला : आपत्ती व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘अनलाॅक’ जाहीर केले; मात्र मुख्यमंत्र्यांनी ते रद्द केले. त्यामुळे मंत्र्याचा आदर राखला जात नसेल तर काॅंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे दिला.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रसार माध्यमांच्या निवडक प्रतिनिधींसोबत ते बोलत होते. राज्यातील १८ जिल्हे पूर्णत: अनलाॅक करण्यात आले असून, तेथील सर्व व्यवहार सुरळीत होतील, पाच स्तरावर अनलाॅकची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची घोषणा मदत व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी केली. परंतू तसा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. यासंदर्भात अॅड आंबेडकर यांनी मत व्यक्त केले. आपत्ती व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार मंत्री वडेट्टीवार यांनी ‘अनलाॅक ’जाहीर केले; मात्र मुख्यमंत्र्यांनी ते रद्द कले हे चुकीचे असून, आपत्ती व्यवस्थानाचे निर्णय लागू झाले पाहीजे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करणे चुकीचे आहे, ; मात्र या खेळात सामान्य माणूस भरडला जाऊ नये, असा आरोप अॅड.आंबेडकर यांनी केला. एकेकाळी शिवसेना सत्तेची फळे खायची आणि भाजपवर टिका करायची, अशा दोन गोष्टी एकावेळी चालत नाहीत काॅंग्रेसनेही तेच करावे, असे सांगत एका मंत्र्याचा आदर राखला जात नसेल तर काॅंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावे पडावे, असा सल्लादेखिल अॅड.आंबेडकर यांनी दिला.

दोघांपैकी एकाने राजीनमा द्यावा!

वडेट्टीवार यांनी अनलाॅकचा निर्णय जाहीर केला तर मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मंत्र्याचा निर्णय बदल करुन लागू केला तर मंत्र्याचा अपमान आहे. त्यामुळे दोघांपैकी एकाने राजीनामा दिला पाहीजे, असा सल्ला देखिल अॅड.आंबेडकर यांनी दिला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक