शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जीएसटी फेल गेली तर मोदींनी माफी मागावी; उद्धव ठाकरेंनी 'मास्क' काढून भाजपाला फटकारले

By हेमंत बावकर | Updated: October 25, 2020 19:56 IST

Uddhav Thackeray: आज शिवसेनेचा दसरा मेळावा कोरोनामुळे 50 पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन घेण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

मुंबई : सर्व मुख्यमंत्र्यांनी जीएसटी रद्द करण्याची मागणी करावी, जीएसटी फेल गेली असेल तर पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच त्यांनी मी मुख्यमंत्री पदाचे मास्क काढून बोलणार असल्याचे ते म्हणाले. 

आज शिवसेनेचा दसरा मेळावा कोरोनामुळे 50 पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन घेण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. देश संकटात आहे आणि भाजप राजकारण करतंय, हा देश म्हणजे कोणाच्या बापाची मालमत्ता नाही. सर्व मुख्यमंत्र्यांनी जीएसटी रद्द करण्याची मागणी करावी, जीएसटी फेल गेली असेल तर पंतप्रधानांनी माफी मागावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. 

मुंबई हा पाकव्याप्त काश्मीरचा भाग आहे म्हणणार रावण आला आहे, घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचे आणि नमकहरामी करायची. मुंबई पोलीस निकम्मे आहेत, चरस गांजा उघड उघड विकला जातो, असे सगळे चित्र उभे केले गेले. त्यांना सांगतो महाराष्ट्राच्या घराघरात तुळशीचे वृंदावन आहे, गांजाचे नाही, असा टोला ठाकरे यांनी अभिनेत्री कंगना राणौत प्रकरणी लगावला. तसेच मुंबई पोलिसांवर केलेले आरोप मी का खपवून घेऊ, मुंबई पोलिसही माझे कुटुंबीय आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे, असे बोलणे हा मोदींचा अपमान आहे. कारण त्यांनीच सांगितलेले की पाच वर्षांत पाकव्याप्त काश्मीर भारतात आणू अशी घोषणा केली होती, असा टोलाही त्यांनी हाणला. 

एकाने आत्महत्या केली तो लगेच बिहारचा पूत्र झाला. महाराष्ट्र, पोलीस आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली. ते शेण गप गिळायचे आणि शांत बसायचे, असा इशारा ठाकरे यांनी दिला. तसेच तुमच्या धोतराला गोमूत्र आणि शेणाचा वास येतोय त्याला आम्ही काय करायचे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आम्ही शांत आहोत, पण शंढ नाही. सभ्यतेने वागाल तर आम्हीही तसेच वागू. तलवारीने युद्ध जिंकले जाते, पण ती पकडायला मनगट लागते ते जनतेकडे, शिवसैनिकांकडे आहे, असा इशारा त्यांनी दिला. 

ज्यांना टक्कर देण्याची खुमखुमी असेल त्यांना जागा दाखवून देणार. संघमुक्त भारत हवे म्हणणारे नितीश कुमार भाजपला कसे चालतात. बिहारमध्ये मोफत लस देताय ती कोणाच्या पैशाने,  मग आम्ही काय बांगलादेशचे? असा सवाल त्यांनी केला. रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही, आमचे जीएसटीचे पैसे मिळायलाच हवेत. इथं काम करणारी पोरं महाराष्ट्राच्या मातीतली हवी.  आम्ही तुमच्यासारखे ढेपेला चिकटणाऱ्या मुंगळ्यासारखे नाही. वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो हे दाखवू, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपाला दिले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीDasaraदसरा