शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

“जेव्हा काँग्रेस सोडली तेव्हा भाजपानं पैशांची ऑफर दिली होती, पण...”; आमदार श्रीमंत पाटील यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 11:58 IST

आमदार श्रीमंत पाटील(MLA Shrimant Patil) यांनी दावा केला की, कुठलीही रक्कम न घेता मी भारतीय जनता पार्टीत(BJP) प्रवेश केला.

ठळक मुद्देजेव्हा काँग्रेस(Congress) पक्ष सोडला तेव्हा भाजपाने विचारलं किती पैसे हवेत? मी कुठेही बोललो नाही. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला, श्रीमंत पाटलांचा दावाभाजपा नेतृत्वाने कॅबिनेट खात्यांना घेऊन माझ्याशी चर्चा केली. जसं कॅबिनेटचा विस्तार होईल त्यात मला संधी मिळेल

बंगळुरु – कर्नाटकात भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये राजकीय हालचाली वारंवार सुरु आहेत. काँग्रेसची साथ सोडून भाजपात सहभागी झालेल्या आमदार श्रीमंत पाटील यांच्या विधानानं राजकीय वातावरण तापलं आहे. जेव्हा मी काँग्रेस सोडली तेव्हा भारतीय जनता पार्टीने मला सोबत येण्यासाठी मोठी रक्कम ऑफर केली होती. श्रीमंत पाटलांच्या विधानानं मोठी खळबळ माजली आहे. विरोधकांना भाजपावर टीका करण्याची आयती संधीच मिळाली.

आमदार श्रीमंत पाटील(MLA Shrimant Patil) यांनी दावा केला की, कुठलीही रक्कम न घेता मी भारतीय जनता पार्टीत(BJP) प्रवेश केला. जेव्हा काँग्रेस(Congress) पक्ष सोडला तेव्हा भाजपाने विचारलं किती पैसे हवेत? तेव्हा मी एक रुपयाही घेतला नाही असं त्यांनी सांगितले. परंतु श्रीमंत पाटील यांच्या विधानावरुन वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी भाजपाने मला पैसे ऑफर केले नव्हते असं मी कुठेही बोललो नाही. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला असा आरोप त्यांनी केला. श्रीमंत पाटील हे कर्नाटकच्या कागवाड परिसरातील आमदार आहेत. ते कॅबिनेट मंत्रीही होते. काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षाची साथ सोडून भाजपात प्रवेश केला त्यातील श्रीमंत पाटील हे एक आमदार होते.

सध्याच्या कॅबिनेटबद्दल आमदार श्रीमंत पाटील म्हणाले की, मला कॅबिनेटमध्ये का घेतलं नाही हे सांगता येत नाही. परंतु कॅबिनेट विस्तारावेळी मला सहभागी करुन घेतलं जाईल असं पक्षाने म्हटलं आहे. भाजपा नेतृत्वाने कॅबिनेट खात्यांना घेऊन माझ्याशी चर्चा केली. जसं कॅबिनेटचा विस्तार होईल त्यात मला संधी मिळेल असा दावा त्यांनी केला. मराठा समुदायाला मी मंत्री व्हावं अशी इच्छा आहे त्यामुळे मला कॅबिनेटमध्ये स्थान दिले जाईल असा विश्वास आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केला.

कर्नाटकच्या राजकारणात मागील काही काळापासून अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. अलीकडेच भारतीय जनता पार्टीने राज्याच्या नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेत बी.एस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून बाजूला सारलं. कर्नाटकात बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. विधानसभा निवडणुकीपासूनच कर्नाटकचे राजकारण अस्थिर झाले आहे. काँग्रेस-निजदने एकत्र येत बहुमत असलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले. परंतू दीड वर्षानंतर त्यांचे आमदार फोडून भाजपाच्या येडीयुराप्पांनी पुन्हा सत्ता हिसकावून घेतली होती. त्यानंतर काही महिन्यापूर्वी कर्नाटकात मंत्रीमंडळ वाटपावरून भाजपाच्या आमदारांनी बंड पुकारले असून येडीयुराप्पा यांची खूर्चीच धोक्यात आली.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस