शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

“जेव्हा काँग्रेस सोडली तेव्हा भाजपानं पैशांची ऑफर दिली होती, पण...”; आमदार श्रीमंत पाटील यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 11:58 IST

आमदार श्रीमंत पाटील(MLA Shrimant Patil) यांनी दावा केला की, कुठलीही रक्कम न घेता मी भारतीय जनता पार्टीत(BJP) प्रवेश केला.

ठळक मुद्देजेव्हा काँग्रेस(Congress) पक्ष सोडला तेव्हा भाजपाने विचारलं किती पैसे हवेत? मी कुठेही बोललो नाही. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला, श्रीमंत पाटलांचा दावाभाजपा नेतृत्वाने कॅबिनेट खात्यांना घेऊन माझ्याशी चर्चा केली. जसं कॅबिनेटचा विस्तार होईल त्यात मला संधी मिळेल

बंगळुरु – कर्नाटकात भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये राजकीय हालचाली वारंवार सुरु आहेत. काँग्रेसची साथ सोडून भाजपात सहभागी झालेल्या आमदार श्रीमंत पाटील यांच्या विधानानं राजकीय वातावरण तापलं आहे. जेव्हा मी काँग्रेस सोडली तेव्हा भारतीय जनता पार्टीने मला सोबत येण्यासाठी मोठी रक्कम ऑफर केली होती. श्रीमंत पाटलांच्या विधानानं मोठी खळबळ माजली आहे. विरोधकांना भाजपावर टीका करण्याची आयती संधीच मिळाली.

आमदार श्रीमंत पाटील(MLA Shrimant Patil) यांनी दावा केला की, कुठलीही रक्कम न घेता मी भारतीय जनता पार्टीत(BJP) प्रवेश केला. जेव्हा काँग्रेस(Congress) पक्ष सोडला तेव्हा भाजपाने विचारलं किती पैसे हवेत? तेव्हा मी एक रुपयाही घेतला नाही असं त्यांनी सांगितले. परंतु श्रीमंत पाटील यांच्या विधानावरुन वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी भाजपाने मला पैसे ऑफर केले नव्हते असं मी कुठेही बोललो नाही. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला असा आरोप त्यांनी केला. श्रीमंत पाटील हे कर्नाटकच्या कागवाड परिसरातील आमदार आहेत. ते कॅबिनेट मंत्रीही होते. काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षाची साथ सोडून भाजपात प्रवेश केला त्यातील श्रीमंत पाटील हे एक आमदार होते.

सध्याच्या कॅबिनेटबद्दल आमदार श्रीमंत पाटील म्हणाले की, मला कॅबिनेटमध्ये का घेतलं नाही हे सांगता येत नाही. परंतु कॅबिनेट विस्तारावेळी मला सहभागी करुन घेतलं जाईल असं पक्षाने म्हटलं आहे. भाजपा नेतृत्वाने कॅबिनेट खात्यांना घेऊन माझ्याशी चर्चा केली. जसं कॅबिनेटचा विस्तार होईल त्यात मला संधी मिळेल असा दावा त्यांनी केला. मराठा समुदायाला मी मंत्री व्हावं अशी इच्छा आहे त्यामुळे मला कॅबिनेटमध्ये स्थान दिले जाईल असा विश्वास आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केला.

कर्नाटकच्या राजकारणात मागील काही काळापासून अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. अलीकडेच भारतीय जनता पार्टीने राज्याच्या नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेत बी.एस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून बाजूला सारलं. कर्नाटकात बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. विधानसभा निवडणुकीपासूनच कर्नाटकचे राजकारण अस्थिर झाले आहे. काँग्रेस-निजदने एकत्र येत बहुमत असलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले. परंतू दीड वर्षानंतर त्यांचे आमदार फोडून भाजपाच्या येडीयुराप्पांनी पुन्हा सत्ता हिसकावून घेतली होती. त्यानंतर काही महिन्यापूर्वी कर्नाटकात मंत्रीमंडळ वाटपावरून भाजपाच्या आमदारांनी बंड पुकारले असून येडीयुराप्पा यांची खूर्चीच धोक्यात आली.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस