शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

"मला फाशी दिली तरी चालेल पण..."; महायुतीविरोधात विधान, माजी आमदाराची भाजपाने केली हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 22:51 IST

Mallikarjun Rami Reddy: भाजपाचे रामटेक विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांच्यावर तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. रेड्डी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. 

Mallikarjun Rami Reddy suspended from bjp: "मला फाशी दिली तरी चालेल पण आशिष जयस्वाल यांचे काम करणार नाही', असे म्हणणारे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांची भाजपाने तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचे नेते-पदाधिकाऱ्यांना सज्जड दम दिला आहे. भाजपाचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला, तर कठोर कारवाई केली जाईल, असे बावनकुळे रेड्डींवरील कारवाईनंतर म्हणाले. 

माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी शिंदे, जयस्वालांबद्दल काय बोलले?

शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी रामटेकचे विद्यमान आमदार आशिष जयस्वाल यांची उमेदवारी घोषित केली. या मतदारसंघातून मल्लिकार्जून रेड्डी इच्छुक होते. २०१९ मध्ये आशिष जयस्वाल निवडून आल्यापासूनच रेड्डी त्यांच्याविरोधात सातत्याने टोकाची भूमिका घेत आले आहेत. 

जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मल्लिकार्जून रेड्डींनी शिंदेंनाही लक्ष्य केले. "एकनाथ शिंदे हे ॲक्सिडेंटल मुख्यमंत्री आहेत. त्यांना आता आम्हाला मुख्यमंत्री करायचं नाही. भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे. मला फाशी दिली तरी चालेल पण आशिष जयस्वाल यांचं रामटेकमध्ये काम करणार नाही."

"मी महायुतीचा सन्मान करतो, पण आशिष जयस्वाल यांना विरोध आहे. नागपूर जिल्ह्यातून शिंदे गटाचा आमदार येऊ नये, अशी आमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी आहे", असे रेड्डी म्हणाले होते. रेड्डींच्या विधानांची दखल घेत भाजपाने त्यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली. 

"पक्षाने काही कठोर निर्णय घेतले आहेत. यापुढील काळात महायुतीविरोधात जो नेता किंवा कार्यकर्ता जाहीरपणे बोलेल किंवा पंड पुकारेल, त्याच्यावर कारवाई होईल. पक्षाच्या मंचावर प्रत्येकाला नाराजी मांडता येईल, सार्वजनिकपणे पक्षविरोधी भूमिका मान्य करण्यात येणार नाही", असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीविरोधात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांनाही तंबी दिली आहे.

रामटेक विधानसभा मतदारसंघात वाद काय?

२००९ मध्ये रामटेक विधानसभा मतदारसंघातून आशिष जयस्वाल शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. २०१४ मध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले. यावेळी आशिष जयस्वाल यांचा भाजपाचे मल्लिकार्जून रेड्डी यांनी पराभव केला. १२ हजार मताधिक्य घेऊन रेड्डी जिंकले होते. त्यानंतर २०१९ विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये ही जागा भाजपाकडे गेली. भाजपाने मल्लिकार्जून रेड्डी यांनी उमेदवारी दिल्यानंतर आशिष जयस्वाल यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. जयस्वाल यांनी मल्लिकार्जून रेड्डी यांचा २४ हजार मतांनी पराभव केला होता. तेव्हापासूनच रेड्डी आणि जयस्वाल यांच्यात संघर्ष निर्माण झाला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ramtek-acरामटेकAshish Jaiswalआशीष जयस्वालBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे