शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

इलक्सन आली, दिवाळी झाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 00:50 IST

ठाण्यातील इंदिरानगर, रामनगर, कळव्यातील आतकोनेश्वर झोपडपट्टी यासह अन्य ठिकाणच्या झोपडपट्टी परिसरातील महिलांचे चमू एकत्र येत आहेत

ठाणे : चलो इलक्सन आया है, ५०० रुपैय्या की बोली है’ असे म्हणत डोंबिवलीतील इंदिरानगर, त्रिमूर्तीनगर तसेच ठाण्यातील इंदिरानगर, रामनगर, कळव्यातील आतकोनेश्वर झोपडपट्टी यासह अन्य ठिकाणच्या झोपडपट्टी परिसरातील महिलांचे चमू एकत्र येत आहेत. दिवसभरात टिकल्या, पापड करून जेवढी कमाई होत नाही, ती लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराच्या रॅली, सभा, भाषणांना गर्दी करून पाच तासांत मिळत असल्याने ‘इलक्सन के दिन है’ म्हणत अन्य कामांच्या ठिकाणी सुटी घेण्याची मानसिक तयारी महिलांनी केली आहे. बिर्याणी, चहा, नाश्ता, पाणी आणि येण्याजाण्यासाठी गाडीही असल्याने भाड्याने येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी जणू दिवाळीच आहे.विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींचे पदाधिकारी किंवा ज्यांनी रॅलीमध्ये गर्दी, सभा भरवण्याची जबाबदारी घेतलेली असते, ते कॉर्पोरेट इव्हेंट करणाºया संस्थांचे प्रतिनिधी येतात आणि व्यवहार करून जातात. १०० ते ५०० महिला आणि त्यापुढे पुरुष, युवा अशी गर्दी दिसून येण्यासाठी वेगवेगळे बोलीचे प्रमाण ठरलेले आहे. अगदीच छोटा पक्ष असेल तर ३००, ४०० रुपये घेत महिला प्रचारात सहभागी होतात. परंतु, मोठ्या पक्षांकडून मात्र आणि ज्यांची चलती आहे, अशांकडून मात्र ५०० रुपये प्रति महिला, पुरुषांना देण्याची बोली पक्की झाल्याशिवाय कुणीही जात नाही. एकदा बोली झाली की, मग ती तारीख अन्य कुणालाही दिली जात नाही. तसेच बोली झाली की, लगेच सर्व निधी तोही रोखीच्या स्वरूपात द्यावा लागतो. संपर्कासाठी चार, पाच मोबाइल दिले जातात. ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी एकत्र येण्याचे ठिकाण, तेथे जाण्यासाठी वाहनांची सोय, पाण्यापासून चहा, नाश्ता, जेवणाचे पॅकेट्स असे सगळे ठरलेले असते, अशी माहिती रागिणी गौतम, संगीता जैस्वाल, रुबिना शेख, मुमताज शेख आदी महिला प्रतिनिधींनी दिली. या महिलांना गळ्यात घालायला उपरणे, टोप्या तसेच पक्षांचे झेंडे, निवडणूक चिन्हे हेही दिले जाते. प्रचारात सहभागी होत असल्याने रोजगार मिळतो. दिवस ढकलला जातो. महागाईच्या दिवसात कौटुंबिक खर्च भागवणे कठीण होते. त्यामुळे दिवस भरण्याची आणि अर्थार्जन करण्यासाठी जी संधी मिळते, ती न सोडण्याकडेच सगळ्यांचा कल असतो.>भाडोत्री कार्यकर्त्यांना रोख मजुरीधुणीभांडी करणाºया, वाहने धुण्यासाठी तसेच अन्य किरकोळ कामे करणाºया तळागाळातील महिला, पुरुषांचा वापर प्रचारात गर्दी करण्यासाठी केला जातो. या कामासाठी त्यांना मुख्यत्वे रोखीने पैसे मिळतात. त्यामुळे त्यांना नोटाबंदीच्या काळात बसलेला फटका भरून काढण्याची संधी निवडणुकीमुळे चालून आली आहे. बहुतांश उच्च मध्यमवर्गीयांसह सगळ्यांनाच धुणीभांडी करण्यासह वाहने धुण्यासाठी, सोसायट्यांमध्ये कचरा गोळा करण्यासाठी मनुष्यबळ लागतेच. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे ही कामे घरी केली जातात. त्यामुळे आता निवडणूक काळात हा कामगार वर्ग बरेचदा त्यांच्या कामावर नसल्याचे दिसते.तुमची कामवाली किंवा गाडी धुणारा दोन-चार दिवस दिसला नाही, तर त्याचा अर्थ तो या प्रचारफेरीत सामील झाला आहे. अलीकडे सभा, रॅलींचे इव्हेंट कंपन्यांना कंत्राट दिले जाते. त्यामुळे या व्यवसायातील छोट्या व्यापाऱ्यांवर संक्रांत आली आहे. साउंड सिस्टीम कालबाह्य झाली असून त्यासाठी केलेला खर्च अडकून पडला आहे.रिक्षांना झेंडे लावणे, हुडवर जाहिरात करणे, अशा पद्धतीनेही प्रचार केला जातो. अनेकदा पक्षप्रेमापोटी वाहनांवर झेंडे लावले जातात. पण, त्यातूनही दिवसाला १०० ते २०० रुपये मिळत असल्याने अथवा इंधन भरून दिले जात असल्याने ती संधी तरी का सोडावी, असा काही रिक्षाचालकांचा कल दिसून येतो.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे