शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

ठाकरे सरकारच्या आरोपांची पार झाली शंभरी; यादी घेऊन भाजपा नेते राज्यपालांच्या दारी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 03:52 IST

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून  अहवाल मागवावा आणि दबावाखाली असलेल्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

मुंबई : महिन्याला १०० कोटींची वसुली करण्याचा कथित आदेश, बदल्यांचे रॅकेट आदींसह महाविकास आघाडी सरकारवरील १०० आरोपांची यादी भाजपच्या नेत्यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपविली आणि राज्यपालांनी याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडून मागवावा, अशी मागणी केली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशिष शेलार, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा आदी उपस्थित होते.

मुनगंटीवार यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्यातील अस्थिर परिस्थिती, शासनाकडून प्रशासनाला देण्यात येत असलेले चुकीचे निर्देश, कोरोना रोखण्यात आलेले अपयश, गृहमंत्र्यांनीच  वसुलीचे टार्गेट देणे, बदल्यांचे रॅकेट, जनहिताची कामे करण्यात सरकारला येत असलेले अपयश आदी मुद्द्यांवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून  अहवाल मागवावा आणि दबावाखाली असलेल्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

काँग्रेसला किती वाटा?सरकारवर गंभीर आरोप होत असताना काँग्रेसने मौन का बाळगले आहे? त्यांना किती वाटा मिळतो, हे त्यांनी सांगावे. मुख्यमंत्री ठाकरे यांचे मौनही खटकणारे आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

टॅग्स :BJPभाजपाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरेsachin Vazeसचिन वाझेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस