शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी चेंडू टोलवला मुख्यमंत्र्यांकडे; २३६ एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांची मदत रखडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 05:31 IST

राज्यभरातील नऊ हजार एसटी कर्मचाऱ्यांना काेराेना झाला. पैकी २४५ जणांचा मृत्यू झाला. कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच महामंडळाने प्रदान केले

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या २४५ कोरोना योद्ध्यांचे बळी गेले. यातील केवळ नऊ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. उर्वरित २३६ कुटुंबांना मदतीसाठी आणखी ११८ कोटी रुपयांची गरज आहे. या निधीसाठी परिवहन मंत्र्यांनी राज्याच्या मदत व पुनर्वसन मंत्र्यांना साकडे घातले. आता मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी निधीचा हा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवला आहे.

राज्यभरातील नऊ हजार एसटी कर्मचाऱ्यांना काेराेना झाला. पैकी २४५ जणांचा मृत्यू झाला. कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच महामंडळाने प्रदान केले. मात्र, मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला विम्याची मदत देण्यासाठी पैसे नाहीत, ही वास्तविकता आहे.मृत फक्त नऊ जणांच्या  कुटुंबांना मदत मिळाली. दोन कुटुंबांना मदतीचे प्रस्ताव तयार झाले, प्रत्यक्षात मात्र त्यांना अद्यापही मदत मिळालेली नसल्याचे समाेर आले आहे. मृतांच्या  कुटुंबास मदत देण्यास हातभार लावावा, अशी मागणी एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना केली आहे. परंतु, अद्याप विभागाने  यावर काेणतेही उत्तर दिले नसल्याचे समजते.

...त्यामुळेच ३५ कोटी सांभाळून ठेवले  प्रत्येक प्रवाशाकडून तिकिटामागे एक रुपया कपात केला जातो. व्यक्तीच्या मृत्यूस एसटी जबाबदार असल्यास दहा लाखांची भरपाई यातून दिली जाते. त्यामुळे शिल्लक असलेले ३५ कोटी रुपये सांभाळून ठेवले जात आहेत. परिवहन मंत्र्यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्याशी चर्चा करण्यात येईल. त्यांनी सूचना केल्यास एसटी महामंडळाला मदतीचा हात देता येईल.- विजय वडेट्टीवार,  मदत व पुनर्वसन मंत्री 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेstate transportएसटीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार