शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी चेंडू टोलवला मुख्यमंत्र्यांकडे; २३६ एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांची मदत रखडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 05:31 IST

राज्यभरातील नऊ हजार एसटी कर्मचाऱ्यांना काेराेना झाला. पैकी २४५ जणांचा मृत्यू झाला. कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच महामंडळाने प्रदान केले

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या २४५ कोरोना योद्ध्यांचे बळी गेले. यातील केवळ नऊ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. उर्वरित २३६ कुटुंबांना मदतीसाठी आणखी ११८ कोटी रुपयांची गरज आहे. या निधीसाठी परिवहन मंत्र्यांनी राज्याच्या मदत व पुनर्वसन मंत्र्यांना साकडे घातले. आता मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी निधीचा हा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवला आहे.

राज्यभरातील नऊ हजार एसटी कर्मचाऱ्यांना काेराेना झाला. पैकी २४५ जणांचा मृत्यू झाला. कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच महामंडळाने प्रदान केले. मात्र, मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला विम्याची मदत देण्यासाठी पैसे नाहीत, ही वास्तविकता आहे.मृत फक्त नऊ जणांच्या  कुटुंबांना मदत मिळाली. दोन कुटुंबांना मदतीचे प्रस्ताव तयार झाले, प्रत्यक्षात मात्र त्यांना अद्यापही मदत मिळालेली नसल्याचे समाेर आले आहे. मृतांच्या  कुटुंबास मदत देण्यास हातभार लावावा, अशी मागणी एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना केली आहे. परंतु, अद्याप विभागाने  यावर काेणतेही उत्तर दिले नसल्याचे समजते.

...त्यामुळेच ३५ कोटी सांभाळून ठेवले  प्रत्येक प्रवाशाकडून तिकिटामागे एक रुपया कपात केला जातो. व्यक्तीच्या मृत्यूस एसटी जबाबदार असल्यास दहा लाखांची भरपाई यातून दिली जाते. त्यामुळे शिल्लक असलेले ३५ कोटी रुपये सांभाळून ठेवले जात आहेत. परिवहन मंत्र्यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्याशी चर्चा करण्यात येईल. त्यांनी सूचना केल्यास एसटी महामंडळाला मदतीचा हात देता येईल.- विजय वडेट्टीवार,  मदत व पुनर्वसन मंत्री 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेstate transportएसटीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार