शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

निवडणूक झाली, सरपंचपदाचं आरक्षण कधी जाहीर होणार? हसन मुश्रिफ यांनी केली मोठी घोषणा

By बाळकृष्ण परब | Published: January 19, 2021 7:30 PM

Gram Panchayat Election Results Update : राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता विजयी आघाड्यांना सरपंच आणि उपसरपंच निवडीचे वेध लागले आहेत.

मुंबई - राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता विजयी आघाड्यांना सरपंच आणि उपसरपंच निवडीचे वेध लागले आहेत. मात्र यावेळी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे सरपंचपदासाठीचं आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार आहे. त्यामुळे आता आरक्षणाच्या घोषणेकडे विजयी उमेदवार लक्ष देऊन आहेत. दरम्यान, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांनी सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीबाबत मोठी घोषणा केली आहे.राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडल्या आहेत. यावेळी आरक्षण आधी जाहीर करण्यात न आल्याने मतदानामध्ये ४ टक्के वाढ दिसून आली आहे, असे हसन मुश्रिफ म्हणाले. तसेच राज्यातील ग्रामपंचातींच्या आरक्षणाची सोडत पुढच्या आठ ते दहा दिवसांत घेण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे हसन मुश्रिफ यांनी सांगितले.राज्यातील अनेक ग्रामपंचातयींमध्ये सध्या प्रशासक आहे. त्या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे. एका अधिकाऱ्याकडे चार-पाच ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत पुढच्या ८-१० दिवसांत घेऊन गावचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्याची सूचना जिल्ह्याधिकाऱ्यांना दिली गेली आहे. मात्र ग्रामसभा घेण्यास ३१ मार्चपर्यंत मनाई असेल, असे हसन मुश्रिफ यांनी सांगितले.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतHasan Mushrifहसन मुश्रीफElectionनिवडणूकsarpanchसरपंच