शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"योगी आदित्यनाथ अडीच तास आरती करणारे संन्यासी, त्यांच्या तेजाने नष्ट व्हाल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 12:07 IST

ravi kishan : गोरखपूरचे भाजपा खासदार रवी किशन  (BJP MP Ravi Kishan)  यांनीही असदुद्दीन औवेसींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

गोरखपूर : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीला (UP Assembly Elections) अजून काही महिने शिल्लक आहेत, मात्र यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपले धोरण आखण्यात व्यस्त आहेत. उत्तर प्रदेशात सत्तेत असलेली भाजपा 'मिशन २०२२' साठी सतत मंथन करीत आहे, तर समाजवादी पक्षही विजयाच्या रणनीतीअंतर्गत युती करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचबरोबर, बसपा सुप्रिमो मायावती यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि योगी आदित्यनाथ यांच्यात शाब्दीक लढाई रंगत आहे.

योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री होऊ देणार नसल्याचे असदुद्दीन औवेसी  (AIMIM Chief Asaduddin Owaisi यांनी म्हटले आहे. तर, योगी आदित्यनाथ यांनी असदुद्दीन ओवैसी हे मोठे नेते असल्याचे वक्तव्य करत त्यांनी दिलेले आव्हान स्वीकारले आहे. तसेच, भाजपा 300 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवणार असल्याचा दावा, योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. दरम्यान, गोरखपूरचे भाजपा खासदार रवी किशन  (BJP MP Ravi Kishan)  यांनीही असदुद्दीन औवेसींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

असदुद्दीन ओवैसी यांच्या विधानानंतर भाजपाचे नेते आक्रमक झाले आहेत. भाजपाचे खासदार रवी किशन म्हणाले की, 'मी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना जाहीरपणे आव्हान देतो, आव्हान स्वीकारले आहे? महाराजजींना (योदी आदित्यनाथ) स्पर्श करून दाखवा, तुम्ही हैदराबादला पळून जाल.' याचबरोबर, भाजपाचे खासदार रवी किशन यांनी सहजनवा येथील कार्यक्रमात सांगितले की, 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ब्रह्मचर्यचे पालन करणारे आहेत आणि दररोज अडीच तास आरती करणारे संन्यासी आहेत. असदुद्दीन ओवैसी तुम्ही त्यांच्या तेजाने नष्ट व्हाल.'

आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनू देणार नाही - असदुद्दीन ओवैसीउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे मोठे नेते असल्याचे वक्तव्य करत त्यांनी दिलेले आव्हान स्वीकारले आहे. कोणत्याही परिस्थितीत २०२२ मध्ये पार पडणाऱ्या निवडणुकांमध्ये योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनू देणार नाही, असे वक्तव्य असदुद्दीन ओवैसी यांनी केले होते. "असदुद्दीन ओवैसी हे मोठे नेते आहेत आणि ते देशात प्रचारही करतात. त्यांना एका विशेष समाजाचे समर्थनही आहे. परंतु ते उत्तर प्रदेशात भाजपला आव्हान देऊ शकत नाही. भाजप आपली मूल्ये आणि मुद्दे घेऊन निवडणुकांच्या मैदानात असेल. आम्ही त्यांचे आव्हान स्वीकार करतो," असे योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. 

300 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल - योगी आदित्यनाथपुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरणही तापू लागले आहे. त्यातच, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 403 पैकी 300 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये भाजपाने 75 पैकी 67 जागांवर विजय मिळवला आहे. त्याबद्दल भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करताना, योगींनी हा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम हा पक्ष उत्तर प्रदेशात 100 जागांवर निवडणूक लढवणार आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीRavi Kishanरवी किशनBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश