शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

गोपाळ शेट्टी सातवी, ऊर्मिलाकडेही पदवी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 1:53 AM

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्यात प्रमुख लढत आहे.

- सचिन लुंगसे मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्यात प्रमुख लढत आहे. मात्र हे दोन्ही उमेदवार पदवीधर नाहीत. शेट्टी यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले आहे. तर मातोंडकर यांचे शिक्षण एसवायबीएपर्यंत झाले आहे. उर्वरित उमेदवारांपैकी एक उमेदवार पीचडी, एक उमेदवार एमबीए आणि एक उमेदवार टेक्निकल क्षेत्रातील शिक्षण घेतलेला आहे.लोकसभा असो, विधानसभा असो, पालिकांसारख्या निवडणुका असो. अशा निवडणुकांमध्ये आपल्या मतदारसंघातील उमेदवार उच्च शिक्षित असावा, अशी आशा मतदारांना असते.मात्र एखाददुसरा उमेदवार वगळला तर उर्वरित उमेदवारांचे शिक्षण एसएससीच्या पुढे जात नाही. परिणामी मतदारांचा हिरमोड होतो. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून शेट्टी आणि मातोंडकर यांच्यातच प्रमुख लढत असून, हे दोघेही उच्च शिक्षित नसले तरी ऊर्मिला यांना बॉलीवूडचे वलय आहे आणि शेट्टी कार्यकर्त्यापासून खासदार झाले आहेत. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.>हे आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील वास्तवउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात तीन उमेदवार पदव्युत्तर आहेत. दोघांकडे पदवी आहे. बारावी चार जण आहेत. दहावी एक जण आहे. वाणिज्य, कला, पीचडी आणि एमबीएचेही उमेदवार येथे आहेत. ज्या दोघांमध्ये चुरस आहे त्या दोन उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराकडे पदवी नाही; हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील वास्तव आहे.

उच्चशिक्षितांकडून पुढाकारच नाहीजग एकविसाव्या शतकात जगत असताना आपल्या देशातील आपले प्रतिनिधी किमान शिक्षित असावेत, अशी अपेक्षा प्रत्येकाला असते. मात्र राजकारणाचा टेÑंड पाहता, राजकारणातील टीका पाहता; राजकीय क्षेत्रात उच्च शिक्षित तरुण उतरू पाहत नाहीत, अशी टीका सातत्याने होते. मात्र तरीही काही मतदारसंघांतून उच्च शिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिले जात असले तरीदेखील नव्याने राजकारणात येत असलेली पिढी उच्च शिक्षित असावी, अशी अपेक्षा मतदारांना असते.
>मतदार देतात का राजकीय नेत्याच्या शिक्षणावर भर?पदवीधर असावाजनतेच्या विकासाची ब्लू प्रिंट त्याच्याकडे असावी. संसदेमध्ये अशिक्षित लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानेदेश महासत्ता होत नसून बेरोजगारीमुळे अधोगतीकडे वाटचाल होते. लोकप्रतिनिधी किमान पदवीधर असावा.- सुरेश वाघमारेअर्थकारण समजावेकिमान पदवीधर असावा. त्याला देशाचे अर्थकारण समजावे. नोकरी, अर्थकारण याबाबत त्याचा अभ्यास असावा. दिल्लीमध्ये बोलताना त्याने देशाच्या प्रश्नांवर बोलावे. यापैकी काहीच नसेल तर देशाचे, नागरिकांचे नुकसान होते. परिणामी शिक्षित उमेदवारांना संधी द्यावी.- मंथन पाटीलकिमान शिक्षण असावेखासदार हे देशाचे प्रतिनिधित्व करत असतात. त्यांना इंग्रजीसोबतच हिंदी आणि स्थानिक भाषा आलीच पाहिजे. किमान शिक्षण असावे. आर्थिक प्रश्नांची जाण असावी. महत्त्वाचे म्हणजे तो किमान पदवीधर असावा. त्याला सामाजिक प्रश्नांची जाण असावी.- विनोद घोलप

टॅग्स :Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरGopal Shettyगोपाळ शेट्टीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019mumbai-north-pcमुंबई उत्तर