शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

'सरकारी अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना बांबूचे फटके द्या', मोदी सरकारच्या मंत्र्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 2:56 PM

giriraj singh says beat up officials with sticks if they dont listen : सरकारी अधिकारी वारंवार लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असतात. सामान्य लोकांकडून अशा नेहमी तक्रारी वारंवार माझ्याकडे येत असतात, असे गिरीराज सिंह सांगितले.

ठळक मुद्देशनिवारी बिहारच्या बेगूसराय येथील खोदवांपूरमधील एका कृषी संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना गिरीराज सिंह यांनी लोकांना त्यांच्या समस्येबद्दल संवेदनहीन असलेल्या अधिकाऱ्यांना 'बांबूच्या काठीने मारण्याचा' सल्ला दिला.

नवी दिल्ली : भाजपाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील मंत्री गिरीराज सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहचीच चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी जर तुमच्या तक्रारी ऐकल्या नाहीत तर त्यांना बांबूच्या काठीने फटके द्या, असे विधान गिरीराज सिंह यांनी आपल्या बेगूसराय मतदारसंघातील लोकांना संबोधित करताना केले आहे. शनिवारी बिहारच्या बेगूसराय येथील खोदवांपूरमधील एका कृषी संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना गिरीराज सिंह यांनी लोकांना त्यांच्या समस्येबद्दल संवेदनहीन असलेल्या अधिकाऱ्यांना 'बांबूच्या काठीने मारण्याचा' सल्ला दिला.

सरकारी अधिकारी वारंवार लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असतात. सामान्य लोकांकडून अशा नेहमी तक्रारी वारंवार माझ्याकडे येत असतात, असे गिरीराज सिंह सांगितले. तसेच, ते म्हणाले, "मला या लोकांना सांगायचे आहे की, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी माझ्याकडे कशाला येता... खासदार, आमदार, गावचे प्रमुख, डीएम, एसडीएम, बीडीओ… या सर्वांचे कर्तव्य आहे की त्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे. जर त्यांनी तुमचे ऐकले नाही तर मग दोन्ही हातात बांबूची काठी घ्या आणि त्यांच्या डोक्यावर मारा. तसेच, जर असेही करूनही तुमचे काम होत नसेल तर मी तुमच्यासोबत आहे."

दरम्यान,  गेल्या काही दिवसांपूर्वी  गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींच्या हम दो हमारे दो वक्तव्याबद्दल टीका केली होती, ते म्हणाले होते की, "राहुल गांधींनी या घोषणेचा संदर्भ स्वत:साठी दिला होता. ते स्वत:, त्यांची आई, त्यांची बहीण आणि त्यांच्या बहीणीचा पती यांच्याबद्दल ते बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात अर्थसंकल्पाबद्दल साधा एक शब्दही उच्चारला नाही", यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिले होते.

आरजेडीचा हल्लाबोलगिरीराज सिंह यांच्या विधानावरून आरजेडीने बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. हे सरकार चालू आहे की महाजंगलराज चालू आहे?, असा सवाल आरजेडीने उपस्थित केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदी