शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सिंधिया व्हा, भाजपामध्ये जा; कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांना आठवलेंचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 09:19 IST

पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांवर आरोप करणं चुकीचं; आठवलेंचं राहुल गांधींवर शरसंधान

मुंबई: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्याच पक्षातल्या कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या नेत्यांवर आरोप करत असतील, तर त्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. आम्ही त्यांच्या स्वागताला तयार आहोत, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.  भाजप पुढील अनेक वर्षे सत्तेत असणार आहे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सिब्बल आणि आझाद यांच्यावर भाजपशी हातमिळवणी केल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे त्या नेत्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारखं पाऊल उचलायला हवं, असा सल्ला आठवलेंनी सिब्बल आणि आझाद यांना दिला. गेल्या आठवड्यात अध्यक्ष निवडीसाठी काँग्रेसची एक बैठक झाली. त्या बैठकीआधी काँग्रेसच्या देशातल्या २३ मोठ्या नेत्यांनी पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष देण्याची मागणी करणारं पत्र सोनिया गांधींना लिहिलं होतं. त्यावरून राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली होती. त्या २३ नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांच्या नावांचा समावेश होता. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप राहुल यांनी केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मोठा वादंग माजला होता.आठवलेंनी या बैठकीचा आणि त्यातील घडामोडींचा संदर्भ देत आझाद आणि सिब्बल यांना काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला. 'काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून वाद आहे. राहुल गांधींनी सिब्बल आणि आझाद यांच्यावर भाजपशी संगनमत केल्याचा आरोप लावला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा. त्यांनी काँग्रेसच्या विस्तारासाठी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे दिली आहेत. मात्र आता त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपत प्रवेश करायला हवा,' असं आठवले म्हणाले.मंदिर-मशीद उघडा अन्यथा आंदोलन, वंचितनंतर रिपाइंला 'आठवले' प्रार्थनास्थळकाँग्रेसमध्ये अपमान होत असेल, तर आझाद आणि सिब्बल यांनी पक्षातून बाहेर पडायला हवं. त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारखं पाऊल उचलायला हवं. इतकंच काय सचिन पायलट यांनीदेखील तसंच केलं होतं. पण मग त्यांनी माघार घेऊन समेट घडवला. काँग्रेससाठी घाम गाळणाऱ्या, कष्ट करणाऱ्या नेत्यांवर राहुल यांनी अशा प्रकारे आरोप करणं चुकीचं असल्याचं आठवलेंनी म्हटलं.रामदास आठवलेंनी घेतली सुशांतच्या वडिलांची भेट, रियाबद्दल व्यक्त केला संशय

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेkapil sibalकपिल सिब्बलRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे