शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

पाकला दम दिला म्हणून अभिनंदनला सोडले; नरेंद्र मोदी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 04:07 IST

'योग्य वेळी सर्व काही उघड करीन'

पाटण (गुजरात) : आपण पाकिस्तानला गंभीर परिणाम होतील असा दम दिला म्हणून बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हाती लागलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान या भारतीय हवाईदलाच्या वैमानिकास त्या देशाने लगेच सहीसलामत सोडले असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केला.बालाकोट हवाई हल्यानंतर भारत व पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये धुमश्चक्री झाली होती. त्यावेळी अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे एक एफ-१६ विमान पाडले होते. परंतु त्यांच्याही विमानावर हल्ला झाल्याने त्यांनी पॅराशूटने बाहेर उडी घेतली. पण ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले. दोन दिवसांनी पाकिस्तानने त्यांना सोडून दिले होते.येथील प्रचारसभेत त्या घटक्रमाचा संदर्भ देत मोदी म्हणाले, आम्ही पत्रकार परिषद घेतली व आमच्या वैमानिकाचे काही बरेवाईट झाले तर, मोदींनी पाहा आमची काय अवस्था केली, असे जगाला सांगत फिरण्याची तुमच्यावर वेळ येईल, असा सज्जड इशारा आम्ही पाकिस्तानला दिला. मोदी पुढे म्हणाले की, मोदींनी १२ क्षेपणास्त्रे तयार ठेवली आहेत व ते कदाचित हल्ला करतील व परिस्थिती आणखी चिघळेल, असे एका अमेरिकी अधिकाऱ्याने दुसºया दिवशी म्हटले होते. त्याच दिवशी पाकिस्तानने आमच्या वैमानिकाची सुटका करण्याचे जाहीर केले, अन्यथा त्यावेळी ‘कत्ल की रात’ झाली असती.हे सर्व अमेरिकेचे म्हणणे होते. मला आत्ता त्याविषयी काहीही बोलायचे नाही. योग्य वेळ येईल तेव्हा मी सर्व बोलेन, असेही मोदी म्हणाले.राष्ट्रीय सुरक्षेशी आम्ही कधीही तडजोड केली नाही व करणारही नाही, असे सांगत पंतप्रधान असेही म्हणाले की, पंतप्रधानपदाची खुर्ची राहो अथवा जावो, पण एक तर मी तरी जिवंत राहीन किंवा दहशतवादी तरी जिवंत राहतील, हा माझा ठाम निर्धार आहे.गुजरातमधील २६ जागांवर मंगळवारी मतदान व्हायचे आहे. गुजरात हे माझे राज्य असल्याने येथील भूमीपुत्राला सर्व जागा मिळवून देणे हे गुजरातच्या मतदारांचे कर्तव्य आहे, असे सांगत मोदी म्हणाले की, माझे सरकार पुन्हा सत्तेवर येणार हे नक्की. पण गुजरातने भाजपला २६ जागा दिल्या नाहीत तर निकालानंतर लगेच टीव्ही वाहिन्यांवर त्याची चर्चा रंगेल. (वृत्तसंस्था)शरद पवारांना चिमटापूर्वी ज्यांना मोदींनी आपले राजकीय गुरू म्हटले, त्या शरद पवारांनी ‘मोदी यापुढे काय करतील याची मला भीती वाटते,’ असे वक्तव्य शनिवारी केले होते. त्यावर पवारांना चिमटा घेत मोदी म्हणाले की, उद्या मोदी काय करणार याची जर पवारांनाही कल्पना नसेल, तर इम्रान खानला तरी ते कसे कळणार?

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानPakistanपाकिस्तान