शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पाकला दम दिला म्हणून अभिनंदनला सोडले; नरेंद्र मोदी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 04:07 IST

'योग्य वेळी सर्व काही उघड करीन'

पाटण (गुजरात) : आपण पाकिस्तानला गंभीर परिणाम होतील असा दम दिला म्हणून बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हाती लागलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान या भारतीय हवाईदलाच्या वैमानिकास त्या देशाने लगेच सहीसलामत सोडले असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केला.बालाकोट हवाई हल्यानंतर भारत व पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये धुमश्चक्री झाली होती. त्यावेळी अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे एक एफ-१६ विमान पाडले होते. परंतु त्यांच्याही विमानावर हल्ला झाल्याने त्यांनी पॅराशूटने बाहेर उडी घेतली. पण ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले. दोन दिवसांनी पाकिस्तानने त्यांना सोडून दिले होते.येथील प्रचारसभेत त्या घटक्रमाचा संदर्भ देत मोदी म्हणाले, आम्ही पत्रकार परिषद घेतली व आमच्या वैमानिकाचे काही बरेवाईट झाले तर, मोदींनी पाहा आमची काय अवस्था केली, असे जगाला सांगत फिरण्याची तुमच्यावर वेळ येईल, असा सज्जड इशारा आम्ही पाकिस्तानला दिला. मोदी पुढे म्हणाले की, मोदींनी १२ क्षेपणास्त्रे तयार ठेवली आहेत व ते कदाचित हल्ला करतील व परिस्थिती आणखी चिघळेल, असे एका अमेरिकी अधिकाऱ्याने दुसºया दिवशी म्हटले होते. त्याच दिवशी पाकिस्तानने आमच्या वैमानिकाची सुटका करण्याचे जाहीर केले, अन्यथा त्यावेळी ‘कत्ल की रात’ झाली असती.हे सर्व अमेरिकेचे म्हणणे होते. मला आत्ता त्याविषयी काहीही बोलायचे नाही. योग्य वेळ येईल तेव्हा मी सर्व बोलेन, असेही मोदी म्हणाले.राष्ट्रीय सुरक्षेशी आम्ही कधीही तडजोड केली नाही व करणारही नाही, असे सांगत पंतप्रधान असेही म्हणाले की, पंतप्रधानपदाची खुर्ची राहो अथवा जावो, पण एक तर मी तरी जिवंत राहीन किंवा दहशतवादी तरी जिवंत राहतील, हा माझा ठाम निर्धार आहे.गुजरातमधील २६ जागांवर मंगळवारी मतदान व्हायचे आहे. गुजरात हे माझे राज्य असल्याने येथील भूमीपुत्राला सर्व जागा मिळवून देणे हे गुजरातच्या मतदारांचे कर्तव्य आहे, असे सांगत मोदी म्हणाले की, माझे सरकार पुन्हा सत्तेवर येणार हे नक्की. पण गुजरातने भाजपला २६ जागा दिल्या नाहीत तर निकालानंतर लगेच टीव्ही वाहिन्यांवर त्याची चर्चा रंगेल. (वृत्तसंस्था)शरद पवारांना चिमटापूर्वी ज्यांना मोदींनी आपले राजकीय गुरू म्हटले, त्या शरद पवारांनी ‘मोदी यापुढे काय करतील याची मला भीती वाटते,’ असे वक्तव्य शनिवारी केले होते. त्यावर पवारांना चिमटा घेत मोदी म्हणाले की, उद्या मोदी काय करणार याची जर पवारांनाही कल्पना नसेल, तर इम्रान खानला तरी ते कसे कळणार?

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानPakistanपाकिस्तान