शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

मनसेकडून विधानसभेची पायाभरणी? लोकसभा निवडणुकीत ताकदीची चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 06:49 IST

इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित

ठाणे : गेल्या १० वर्षांत मनसेला ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे महापालिकेत केवळ सात नगरसेवक निवडून आणता आले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाच्या मतांची कमाई करणाºया राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार दिला नसला, तरी राज यांनी राज्यात जाहीर सभांचा लावलेला धडाका पाहता आणि ठाण्यात एक दिवसाचा मुक्काम पाहता विधानसभेची ही पायाभरणी असल्याने ठाण्यामधून इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.राज्यात मनसेला सर्वाधिक यश नाशिक शहरात मिळाले होते. तशीच मोर्चेबांधणी त्यांनी ठाण्यातही केली होती. त्यानुसार, २००९ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघात मनसेला तिसºया क्रमांकाची मते मिळाली होती. तर, विधानसभा निवडणुकीतही मनसेला तिसºया क्रमांकाची मते मिळाली होती.

त्यानंतर, २०१२ च्या महापालिका निवडणुकीत तब्बल सात नगरसेवक निवडून आणून सत्ता स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु, मागील काही वर्षांत मनसेची अधोगती झाली. २०१४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी सपाटून मार खाल्ला. तर, २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेला भोपळासुद्धा फोडता आला नाही. आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी एकही उमेदवार न देता भाजपला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी राज्यात जाहीर सभांचा लावलेला एकूणच धडाका आणि ‘लाव रे तो व्हिडीओ’ यामुळे सोशल माध्यमातून मनसेचा बोलबाला सुरू आहे. सत्ताधारी भाजपनेही राज यांच्या सभांचा धसका घेतला आहे.
राज यांच्या सभांना राज्यभर मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता मरगळलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र चैतन्य निर्माण झाले असून येत्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विधानसभेत मनसे साºया शक्तिनिशी उतरण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत असल्याने विधानसभा निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी किमान दोन विधानसभा मतदारसंघांत चमत्कार घडवू शकते, इतकी ताकद पक्षाच्या मतांमध्ये आहे.मनसेला कुठे आहे स्थान?२००९ च्या विधानसभा निवडणुकीत ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा मतदारसंघांतून मनसेनेतिसºया क्रमांकाची मते मिळवली होती. २०१४ च्या निवडणुकीत मात्र मनसेचा दारुण पराभव झाला होता. परंतु, आता पुन्हा मनसेचे इंजीन सुसाट निघाले आहे.आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची काय रणनीती असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून असून ठाण्यातून काही दुरावलेले पदाधिकारीही स्वगृही परतण्याचा दावा मनसेच्या नेत्यांनी केला आहे.आघाडी करणार?राज यांनी अद्याप काँग्रेस आघाडीत जाण्यासंबंधी कोणताही निर्णय अथवा संकेत दिले नसले, तरी आघाडीसोबत मनसे जाण्याची शक्यताही व्यक्त होत असल्याने मनसेच्या इच्छुकांचे आघाडीच्या नेत्यांशी सूत जुळू लागलेले दिसून येत आहे. त्यामुळे आतापासूनच त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे