शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

"काँग्रेसच्या जाळ्यात अडकून मी जनतेचा 12 वर्षांचा विश्वास गमावला", कुमारस्वामींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 11:09 IST

HD Kumaraswamy And Congress : काँग्रेसने षड्यंत्र आखलं आणि त्यात अडकल्याचं कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी कट रचून अडकवल्याचा गंभीर आरोप देखील कुमारस्वामींनी केला आहे.

नवी दिल्ली - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनी शनिवारी काँग्रेसवर (Congress) गंभीर आरोप केला आहे. काँग्रेससोबत हातमिळवणी करून युती सरकार स्थापन केलं मात्र मी 12 वर्षांपासून जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास गमावला असं म्हटलं आहे. काँग्रेसने षड्यंत्र आखलं आणि त्यात अडकल्याचं कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी कट रचून अडकवल्याचा गंभीर आरोप देखील कुमारस्वामींनी केला आहे.

भाजपाने एवढी मोठी फसवणूक कधी केली नाही जेवढी काँग्रेसने केली असंही कुमारस्वामी यांनी यावेळी म्हटलं आहे. कुमारस्वामी आणि सिद्धरामय्या यांच्या सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सिद्धरामय्या यांनी देखील कुमारस्वामींवर पलटवार केला आहे. "कुमारस्वामी 'खोटं बोलण्यात' माहिर आहेत आणि भावुक होऊन अश्रू वाहणं ही त्यांची जुनी सवय असल्याची जोरदार टीका सिद्धरामय्या यांनी केली आहे. तर दुसरीकडे कुमारस्वामी यांनी देखील निशाणा साधला आहे. 

"काँग्रेससोबत युती करून चूक केली, जनतेच्या विश्वासाला तडा गेला"

"2006-07 मध्ये मी निवडणूक जिंकून जनतेचा विश्वास मोठ्या कष्टाने मिळवला होता. 12 वर्षे हा विश्वास जनतेने माझ्यावर दाखवला. पण मी काँग्रेससोबत युती केल्यानंतर जनतेच्या या विश्वासाला तडा गेला" असं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेससोबत युती करून चूक केली. त्यांच्यासोबत हातमिळवणी करायला नको होती असं देखील कुमारस्वीमी यावेळी म्हणाले. पक्षश्रेष्ठीमुळे युती सरकार स्थापनेवर सहमती दर्शविली होती. 

"कुमारस्वामी खोटं बोलण्यात पटाईत, ते राजकारणासाठी परिस्थितीनुसार खोटं बोलू शकतात"

2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तेव्हा एकमेकांविरूद्ध लढलेल्या काँग्रेस-जेडी (एस) ने एकत्र येऊन सरकार स्थापन केले आणि कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामी खोटं बोलण्यात पटाईत आहेत, ते राजकारणासाठी परिस्थितीनुसार खोटं बोलू शकतात. जेडीएसला केवळ 37 जागा मिळाल्या तरीसुद्धा त्यांना मुख्यमंत्रिपदी बसवून आमची चूक झाली का? असा सवाल देखील सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाsiddaramaiahसिद्धरामय्या