शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसच्या जाळ्यात अडकून मी जनतेचा 12 वर्षांचा विश्वास गमावला", कुमारस्वामींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 11:09 IST

HD Kumaraswamy And Congress : काँग्रेसने षड्यंत्र आखलं आणि त्यात अडकल्याचं कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी कट रचून अडकवल्याचा गंभीर आरोप देखील कुमारस्वामींनी केला आहे.

नवी दिल्ली - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनी शनिवारी काँग्रेसवर (Congress) गंभीर आरोप केला आहे. काँग्रेससोबत हातमिळवणी करून युती सरकार स्थापन केलं मात्र मी 12 वर्षांपासून जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास गमावला असं म्हटलं आहे. काँग्रेसने षड्यंत्र आखलं आणि त्यात अडकल्याचं कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी कट रचून अडकवल्याचा गंभीर आरोप देखील कुमारस्वामींनी केला आहे.

भाजपाने एवढी मोठी फसवणूक कधी केली नाही जेवढी काँग्रेसने केली असंही कुमारस्वामी यांनी यावेळी म्हटलं आहे. कुमारस्वामी आणि सिद्धरामय्या यांच्या सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सिद्धरामय्या यांनी देखील कुमारस्वामींवर पलटवार केला आहे. "कुमारस्वामी 'खोटं बोलण्यात' माहिर आहेत आणि भावुक होऊन अश्रू वाहणं ही त्यांची जुनी सवय असल्याची जोरदार टीका सिद्धरामय्या यांनी केली आहे. तर दुसरीकडे कुमारस्वामी यांनी देखील निशाणा साधला आहे. 

"काँग्रेससोबत युती करून चूक केली, जनतेच्या विश्वासाला तडा गेला"

"2006-07 मध्ये मी निवडणूक जिंकून जनतेचा विश्वास मोठ्या कष्टाने मिळवला होता. 12 वर्षे हा विश्वास जनतेने माझ्यावर दाखवला. पण मी काँग्रेससोबत युती केल्यानंतर जनतेच्या या विश्वासाला तडा गेला" असं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेससोबत युती करून चूक केली. त्यांच्यासोबत हातमिळवणी करायला नको होती असं देखील कुमारस्वीमी यावेळी म्हणाले. पक्षश्रेष्ठीमुळे युती सरकार स्थापनेवर सहमती दर्शविली होती. 

"कुमारस्वामी खोटं बोलण्यात पटाईत, ते राजकारणासाठी परिस्थितीनुसार खोटं बोलू शकतात"

2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तेव्हा एकमेकांविरूद्ध लढलेल्या काँग्रेस-जेडी (एस) ने एकत्र येऊन सरकार स्थापन केले आणि कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामी खोटं बोलण्यात पटाईत आहेत, ते राजकारणासाठी परिस्थितीनुसार खोटं बोलू शकतात. जेडीएसला केवळ 37 जागा मिळाल्या तरीसुद्धा त्यांना मुख्यमंत्रिपदी बसवून आमची चूक झाली का? असा सवाल देखील सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाsiddaramaiahसिद्धरामय्या