शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

"रश्मी शुक्ला यांना माफ केले; चुकीला माफी नाही, ही शिकवण सरकार विसरले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 06:01 IST

शिवाजी महाराजांचे तत्त्व होते, ते चूक झाल्यावर माफी नाही, ही शिकवण राज्य सरकार विसरले. सगळ्या चुका करून रश्मी शुक्ला रडत मुख्यमंत्री, गृहमंत्री, अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडे गेल्या

मुंबई/ठाणे : फोन टॅपिंग प्रकरण उघड झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी ‘‘मै माफी मांगती हूँ, मेरा लेटर वापस दे दो”, अशा शब्दांत माफी मागितली होती. मात्र त्यांना माफी देणे चूकच होते, असे  गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्र परिषदेत सांगितले.आव्हाड म्हणाले की महाराष्ट्र सरकार शिवाजी महाराजांची शिकवण विसरले. सरकारकडून आपण खूप मोठ्या हृदयाचे आहोत, हे दाखविण्याची चूक झाली.

शिवाजी महाराजांचे तत्त्व होते, ते चूक झाल्यावर माफी नाही, ही शिकवण राज्य सरकार विसरले. सगळ्या चुका करून रश्मी शुक्ला रडत मुख्यमंत्री, गृहमंत्री, अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडे गेल्या आणि मला माफ करा म्हणाल्या, तर कोणत्याही व्यक्तीला पाझर फुटतोच. पण हा मोठ्या कटाचा भाग आहे, हे लक्षातच आले नाही”, असा देखील दावा  आव्हाड यांनी केला. 

रश्मी शुक्ला यांच्या कथित अहवालाचा संदर्भ देऊन आव्हाड म्हणाले की चौबे नावाचे अधिकारी कायदा-सुव्यवस्था सह आयुक्त होते.  त्यांचे संबंध थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत असतात. ते कुठल्यातरी नवाज, इंगोलेसोबत बोलतील का? यांनीच माणसे पेरायची प्लांट करायची, यांनीच माणसांना संभाषण करायला लावायचं, यांनीच ते टेप करायचं आणि यांनीच त्याचा वापर बाजारात करायचं, असे हे षडयंत्र असल्याचे आव्हाड म्हणाले.

आमदारांवर रश्मी शुक्लांचा दबाव? जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी दुपारी रश्मी शुक्ला यांच्याबाबत एक ट्वीट केलं होतं. “शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर (आताचे राज्यमंत्री) यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपबरोबर रहावे, यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचादेखील प्रयत्न केला होता. अजून काय पुरावे पाहिजेत?”, असा सवाल आव्हाड यांनी ट्विटद्वारे केला.

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाJitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरे