शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

'फडणवीस सरकारच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी करणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 05:53 IST

काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास विकास आराखड्यासह फडणवीस सरकारच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी करण्यात येईल, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी दिला.

मुंबई : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबईचा विकास आराखडा दोनदा बदलून दहा हजार कोटींचा घोटाळा केला आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास विकास आराखड्यासह फडणवीस सरकारच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी करण्यात येईल, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी दिला.दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या चेंबूर येथील प्रचारसभेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, कारगिलप्रमाणेच पुलवामा येथील हल्लासुद्धा गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे. कारगिल युद्धानंतर वाजपेयींनी सर्व घटनांच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. वाजपेयींसारखी हिंमत मोदी दाखविणार का, असा सवाल करतानाच, हे सरकार शहिदांच्या हौतात्माचे राजकारण करून मते मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. राफेल प्रकरण हे या सरकारचा सर्वात मोठा घोटाळा आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास तब्बल छत्तीस हजार कोटींच्या या घोटाळ्याची चौकशी करून दोषींना तुरुंगात डांबणार असल्याचा पुनरुच्चारही चव्हाण यांनी केला.‘काँग्रेस गरिबीचे उच्चाटन करेल’२०१४च्या प्रचारात मोदींनी समाजातील प्रत्येक घटकाला वारेमाप आश्वासने दिली. पाच वर्षांनंतर आश्वासनपूर्तीचा लेखाजोखा मांडायचे सोडून, भाजपने पुन्हा एकदा आश्वासनांचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. याउलट काँग्रेसचा जाहीरनामा देशातील वीस टक्के गरिबांना नजरेसमोर ठेवून तयार करण्यात आला आहे. इंदिरा गांधींनी केलेल्या प्रभावी कामामुळे देशातील गरिबीचा दर कमी झाला होता. आता ‘न्याय’ योजनेमुळे गरिबीचे समूळ उच्चाटन होईल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNarendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डील