शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटके, वाझे प्रकरणामुळे राज्य सरकारची प्रतिमा डागाळलीय, गृहमंत्रालयाने विश्वासार्हता गमावलीय, राज्यातील जनता म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 21:39 IST

Maharashtra Politics News : अंबानींच्या घराजवळ सापडलेली स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरणांमुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. आता एबीपी माझाने केलेल्या मूड जनतेचा या सर्व्हेमधून या घटनांबाबत जनतेचं मत समोर आलं आहे.

मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या अंबानींच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवण्याचे प्रकरण आणि या प्रकरणातील पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा (Sachin Vaze) उघड झालेला सहभाग तसेच त्यामधून झालेले धक्कादायक गौप्यस्फोट यामुळे राज्य सरकार मोठ्या अडचणीत सापडले आहे. दरम्यान, या घटनांनंतर राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. (Maharashtra Politics) आता एबीपी माझाने केलेल्या मूड जनतेचा या सर्व्हेमधून या घटनांबाबत जनतेचं मत समोर आलं आहे. (Explosives, Waze case has tarnished the image of the state government, the Home Ministry has lost credibility, the people of the state say ...)

या सर्व्हेमधून राज्य सरकारने कोरोनाकाळात केलेल्या कामगिरीबाबत विविध प्रश्न विचारून जनतेचा कल जाणून घेण्यात आला. यावेळी अंबानी स्फोटक प्रकरणामुळे राज्य सरकारची प्रतिमा डागाळलीय का? असा प्रश्न विचारला असता तब्बल ४३ टक्के जनतेने होय असे उत्तर दिले आहे. तर २९ लोकांनी नाही, असे उत्तर दिले. तर २८ टक्के लोकांनी सांगता येत नाही असे उत्तर दिले. 

यावेळी वाझे प्रकरणामुळे गृहखात्याने विश्वासार्हता गमावली का असा प्रश्न सर्व्हेमधून विचारला असता ४८ टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले. तर २५ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. उर्वरित २७ टक्के लोकांनी सांगता येत नाही असे सांगितले.  या सर्व्हेमध्ये कोरोना काळात ठाकरे सरकारनं परिस्थिती योग्य रितीनं हाताळली का, असा प्रश्न जनतेला विचारण्यात आला. त्यावर ४४ टक्के लोकांनी होय, तर ३६ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं. तर २० टक्के लोकांनी सांगता येत नाही, असं उत्तर दिलं. लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं का, या प्रश्नाला होय असं उत्तर देणाऱ्यांचं प्रमाण ४८ टक्के, तर नाही असं उत्तर देणाऱ्यांचं प्रमाण ३१ टक्के इतकं आहे. सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण २१ टक्के आहे. एबीपी माझानं याबद्दलचं सर्वेक्षण केलं आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुख