शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटके, वाझे प्रकरणामुळे राज्य सरकारची प्रतिमा डागाळलीय, गृहमंत्रालयाने विश्वासार्हता गमावलीय, राज्यातील जनता म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 21:39 IST

Maharashtra Politics News : अंबानींच्या घराजवळ सापडलेली स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरणांमुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. आता एबीपी माझाने केलेल्या मूड जनतेचा या सर्व्हेमधून या घटनांबाबत जनतेचं मत समोर आलं आहे.

मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या अंबानींच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवण्याचे प्रकरण आणि या प्रकरणातील पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा (Sachin Vaze) उघड झालेला सहभाग तसेच त्यामधून झालेले धक्कादायक गौप्यस्फोट यामुळे राज्य सरकार मोठ्या अडचणीत सापडले आहे. दरम्यान, या घटनांनंतर राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. (Maharashtra Politics) आता एबीपी माझाने केलेल्या मूड जनतेचा या सर्व्हेमधून या घटनांबाबत जनतेचं मत समोर आलं आहे. (Explosives, Waze case has tarnished the image of the state government, the Home Ministry has lost credibility, the people of the state say ...)

या सर्व्हेमधून राज्य सरकारने कोरोनाकाळात केलेल्या कामगिरीबाबत विविध प्रश्न विचारून जनतेचा कल जाणून घेण्यात आला. यावेळी अंबानी स्फोटक प्रकरणामुळे राज्य सरकारची प्रतिमा डागाळलीय का? असा प्रश्न विचारला असता तब्बल ४३ टक्के जनतेने होय असे उत्तर दिले आहे. तर २९ लोकांनी नाही, असे उत्तर दिले. तर २८ टक्के लोकांनी सांगता येत नाही असे उत्तर दिले. 

यावेळी वाझे प्रकरणामुळे गृहखात्याने विश्वासार्हता गमावली का असा प्रश्न सर्व्हेमधून विचारला असता ४८ टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले. तर २५ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. उर्वरित २७ टक्के लोकांनी सांगता येत नाही असे सांगितले.  या सर्व्हेमध्ये कोरोना काळात ठाकरे सरकारनं परिस्थिती योग्य रितीनं हाताळली का, असा प्रश्न जनतेला विचारण्यात आला. त्यावर ४४ टक्के लोकांनी होय, तर ३६ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं. तर २० टक्के लोकांनी सांगता येत नाही, असं उत्तर दिलं. लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं का, या प्रश्नाला होय असं उत्तर देणाऱ्यांचं प्रमाण ४८ टक्के, तर नाही असं उत्तर देणाऱ्यांचं प्रमाण ३१ टक्के इतकं आहे. सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण २१ टक्के आहे. एबीपी माझानं याबद्दलचं सर्वेक्षण केलं आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुख