शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
2
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
3
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
4
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
5
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
6
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
7
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
8
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
9
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
10
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
11
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
12
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
13
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
14
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
15
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
16
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
17
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
18
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
19
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
20
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा

Assam Exit Poll 2021: 'चहाच्या मळ्या'त पुन्हा 'कमळ' फुलणार; आसामबाबत सगळ्या एक्झिट पोलचं एक(च)मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 20:17 IST

ईशान्यमध्ये सर्वात मोठं राज्य आसाम विधानसभेच्या एकूण १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडले.

ठळक मुद्देएकूण १२६ जागांपैकी भाजपा ९३, एजीपी २९, यूपीपीएल ११ जागांवर निवडणूक लढवत होतीकाँग्रेस ९५, एआययूडीएफ २०, बीपीएफ १२, डावे ७, आंचलिक गण मोर्चा १ आणि आरजेडी १ जागांवर निवडणूक लढवत होती. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण १२६ जागांपैकी भाजपाला ६०, काँग्रेस २६ जागांवर विजयी होती

नवी दिल्ली – देशात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. २ मे रोजी निकाल जाहीर होणार असले तरी तत्पूर्वी अनेक चॅनेल्सने एक्झिट पोलनुसार निकालांचा अंदाज वर्तवला आहे. आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपाचं कमळ फुलणार असून याठिकाणी भाजपा सरकार बनवू शकतं अशी आकडेवारी आहे. राज्यात भाजपाला ८५ जागा मिळतील असा अंदाज दाखवण्यात आला आहे. तर काँग्रेसला मागच्या वेळच्या तुलनेत काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे.

मतदानाच्या टक्केवारीत कोण किती पुढे?

पक्षमतदानाची टक्केवारी 
भाजपा +४८ टक्के
काँग्रेस४० टक्के 
अन्य १२ टक्के 

 

कोणाला मिळणार किती जागा?

भाजपा आघाडीला राज्यात ७५ ते ८५ जागा मिळण्याचा अंदाज

भाजपा – ६१-६५ जागा

एजीपी – ९-१३ जागा

यूपीपीएल – ५-७ जागा

काँग्रेस आघाडीला राज्यात ४० ते ५० जागा मिळण्याचा अंदाज

काँग्रेस – २४-३० जागा

एआययूडीएफ – १३-१६ जागा

बीपीएफ – ३-४ जागा

तर अन्य १-४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ईशान्यमध्ये सर्वात मोठं राज्य आसाम विधानसभेच्या एकूण १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आघाडी आणि काँग्रेस आघाडीत अटीतटीची लढत होती. तर तिसरी आघाडी म्हणून आसाम जातीय परिषद आणि रायजोर दर मैदानात होतं. भाजपाच्या नेतृत्वात आसाम गण परिषद आणि यूनाइटेड पीपल्स पार्टी लिबरल यांचा समावेश आहे. राज्यात एकूण १२६ जागांपैकी भाजपा ९३, एजीपी २९, यूपीपीएल ११ जागांवर निवडणूक लढवत होती तर भाजपा आघाडीत सात जागांवर मैत्रीपूर्ण लढत होती. आज तकनं दाखवलेल्या एक्झिट पोलमध्ये निकालाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 काँग्रेसच्या आघाडीत ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट, बोडोलैंड पीपल्स फ्रंट, आंचणिक गण मोर्चा, आरजेडी, डावे पक्ष सहभागी होते. काँग्रेस ९५, एआययूडीएफ २०, बीपीएफ १२, डावे ७, आंचलिक गण मोर्चा १ आणि आरजेडी १ जागांवर निवडणूक लढवत होती. १० जागांवर काँग्रेस आघाडीत मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळत होती. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण १२६ जागांपैकी भाजपाला ६०, काँग्रेस २६, ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट १३, आसाम गण परिषद १४, बोडोलँड पीपल्स फ्रंट १२ आणि अपक्षांना एका जागेवर विजय मिळाला होता.

 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूकexit pollमतदानोत्तर जनमत चाचणीAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021