शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

Assam Exit Poll 2021: 'चहाच्या मळ्या'त पुन्हा 'कमळ' फुलणार; आसामबाबत सगळ्या एक्झिट पोलचं एक(च)मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 20:17 IST

ईशान्यमध्ये सर्वात मोठं राज्य आसाम विधानसभेच्या एकूण १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडले.

ठळक मुद्देएकूण १२६ जागांपैकी भाजपा ९३, एजीपी २९, यूपीपीएल ११ जागांवर निवडणूक लढवत होतीकाँग्रेस ९५, एआययूडीएफ २०, बीपीएफ १२, डावे ७, आंचलिक गण मोर्चा १ आणि आरजेडी १ जागांवर निवडणूक लढवत होती. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण १२६ जागांपैकी भाजपाला ६०, काँग्रेस २६ जागांवर विजयी होती

नवी दिल्ली – देशात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. २ मे रोजी निकाल जाहीर होणार असले तरी तत्पूर्वी अनेक चॅनेल्सने एक्झिट पोलनुसार निकालांचा अंदाज वर्तवला आहे. आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपाचं कमळ फुलणार असून याठिकाणी भाजपा सरकार बनवू शकतं अशी आकडेवारी आहे. राज्यात भाजपाला ८५ जागा मिळतील असा अंदाज दाखवण्यात आला आहे. तर काँग्रेसला मागच्या वेळच्या तुलनेत काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे.

मतदानाच्या टक्केवारीत कोण किती पुढे?

पक्षमतदानाची टक्केवारी 
भाजपा +४८ टक्के
काँग्रेस४० टक्के 
अन्य १२ टक्के 

 

कोणाला मिळणार किती जागा?

भाजपा आघाडीला राज्यात ७५ ते ८५ जागा मिळण्याचा अंदाज

भाजपा – ६१-६५ जागा

एजीपी – ९-१३ जागा

यूपीपीएल – ५-७ जागा

काँग्रेस आघाडीला राज्यात ४० ते ५० जागा मिळण्याचा अंदाज

काँग्रेस – २४-३० जागा

एआययूडीएफ – १३-१६ जागा

बीपीएफ – ३-४ जागा

तर अन्य १-४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ईशान्यमध्ये सर्वात मोठं राज्य आसाम विधानसभेच्या एकूण १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आघाडी आणि काँग्रेस आघाडीत अटीतटीची लढत होती. तर तिसरी आघाडी म्हणून आसाम जातीय परिषद आणि रायजोर दर मैदानात होतं. भाजपाच्या नेतृत्वात आसाम गण परिषद आणि यूनाइटेड पीपल्स पार्टी लिबरल यांचा समावेश आहे. राज्यात एकूण १२६ जागांपैकी भाजपा ९३, एजीपी २९, यूपीपीएल ११ जागांवर निवडणूक लढवत होती तर भाजपा आघाडीत सात जागांवर मैत्रीपूर्ण लढत होती. आज तकनं दाखवलेल्या एक्झिट पोलमध्ये निकालाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 काँग्रेसच्या आघाडीत ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट, बोडोलैंड पीपल्स फ्रंट, आंचणिक गण मोर्चा, आरजेडी, डावे पक्ष सहभागी होते. काँग्रेस ९५, एआययूडीएफ २०, बीपीएफ १२, डावे ७, आंचलिक गण मोर्चा १ आणि आरजेडी १ जागांवर निवडणूक लढवत होती. १० जागांवर काँग्रेस आघाडीत मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळत होती. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण १२६ जागांपैकी भाजपाला ६०, काँग्रेस २६, ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट १३, आसाम गण परिषद १४, बोडोलँड पीपल्स फ्रंट १२ आणि अपक्षांना एका जागेवर विजय मिळाला होता.

 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूकexit pollमतदानोत्तर जनमत चाचणीAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021