शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
3
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
4
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
5
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
6
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
7
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
10
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
11
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
12
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
13
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
14
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
15
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
16
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
17
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
18
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
19
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
20
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू

काँग्रेसची 'न्याय' योजना म्हणजे 60 वर्षांतील अन्यायाचा कबुलीनामा; नरेंद्र मोदींची चपराक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 1:45 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. नेटवर्क 18ला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी काँग्रेसच्या न्याय योजनेवर टीका केली आहे. काँग्रेसची न्याय योजना म्हणजे 60 वर्षांतील अन्यायाचा कबुलीनामाच असल्याचा घणाघात मोदींनी केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसनं जनतेला आश्वासन दिलं आहे की, जर आमचं सरकार केंद्रात सत्तेवर आलं तर गरिबांना प्रतिमहिना 6 हजार रुपये म्हणजेच वर्षाला 72 हजार रुपये देऊ. काँग्रेसनं या योजनेला न्याय असं नाव दिलं.मुलाखतीत मोदींना न्याय योजनेसंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, त्यांचा मुख्य मंत्र हाच आहे की, आता होणार न्याय. म्हणजेच ते मान्य करतात 60 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जनतेवर अन्याय केला. काँग्रेस जेव्हा न्यायाची भाषा वापरते, तेव्हा अनेकांना काँग्रेसनं न्याय दिलेला नाही हे प्रकर्षानं समोर येतं, 1984च्या शीख दंगल पीडितांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. त्यांना काँग्रेस न्याय देणार आहे काय?, तिहेरी तलाकमुळे पीडित असलेल्या महिलांना काँग्रेस न्याय देणार आहे काय?, काँग्रेसची ही योजना त्यांना न्याय मिळवून देईल काय?. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं, त्यांना 10 दिवसांत न्याय देतो, असं सांगण्यात आलं होतं, परंतु 100 दिवस झाले तरी त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यांना न्याय केव्हा मिळणार?, असा प्रश्नही मोदींनी उपस्थित केला.भोपाळ गॅस दुर्घटना पीडितांना अद्याप न्याय मिळालेला नाही. प्रतिष्ठित वैज्ञानिक नंबी नारायणही काँग्रेसकडे न्याय मागत आहेत. ज्यांना खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात धाडण्यात आलं. काँग्रेस त्यांना न्याय देणार काय?, समझोता बॉम्बस्फोट प्रकरणात अडकवल्या गेलेल्या निरपराध लोकांना काँग्रेसनं न्याय दिला काय?, काँग्रेसनंच हिंदू दहशतवाद हा शब्द प्रचलित केला. देशातील हिंदू न्याय मागत असताना त्यांना दहशतवादी का संबोधण्यात आलं. नरसिंह राव यांनी काँग्रेससाठी जीवन समर्पित केलं, परंतु त्यांचं पार्थिव काँग्रेसच्या कार्यालयात ठेवू दिलं नाही. नरसिंह राव यांची आत्मा काँग्रेसकडे न्याय मागत आहे?, असंही मोदी म्हणाले आहेत. एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्याय योजनेवरून काँग्रेसचे वाभाडे काढले आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस