शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

काँग्रेसची 'न्याय' योजना म्हणजे 60 वर्षांतील अन्यायाचा कबुलीनामा; नरेंद्र मोदींची चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 13:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. नेटवर्क 18ला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी काँग्रेसच्या न्याय योजनेवर टीका केली आहे. काँग्रेसची न्याय योजना म्हणजे 60 वर्षांतील अन्यायाचा कबुलीनामाच असल्याचा घणाघात मोदींनी केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसनं जनतेला आश्वासन दिलं आहे की, जर आमचं सरकार केंद्रात सत्तेवर आलं तर गरिबांना प्रतिमहिना 6 हजार रुपये म्हणजेच वर्षाला 72 हजार रुपये देऊ. काँग्रेसनं या योजनेला न्याय असं नाव दिलं.मुलाखतीत मोदींना न्याय योजनेसंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, त्यांचा मुख्य मंत्र हाच आहे की, आता होणार न्याय. म्हणजेच ते मान्य करतात 60 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जनतेवर अन्याय केला. काँग्रेस जेव्हा न्यायाची भाषा वापरते, तेव्हा अनेकांना काँग्रेसनं न्याय दिलेला नाही हे प्रकर्षानं समोर येतं, 1984च्या शीख दंगल पीडितांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. त्यांना काँग्रेस न्याय देणार आहे काय?, तिहेरी तलाकमुळे पीडित असलेल्या महिलांना काँग्रेस न्याय देणार आहे काय?, काँग्रेसची ही योजना त्यांना न्याय मिळवून देईल काय?. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं, त्यांना 10 दिवसांत न्याय देतो, असं सांगण्यात आलं होतं, परंतु 100 दिवस झाले तरी त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यांना न्याय केव्हा मिळणार?, असा प्रश्नही मोदींनी उपस्थित केला.भोपाळ गॅस दुर्घटना पीडितांना अद्याप न्याय मिळालेला नाही. प्रतिष्ठित वैज्ञानिक नंबी नारायणही काँग्रेसकडे न्याय मागत आहेत. ज्यांना खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात धाडण्यात आलं. काँग्रेस त्यांना न्याय देणार काय?, समझोता बॉम्बस्फोट प्रकरणात अडकवल्या गेलेल्या निरपराध लोकांना काँग्रेसनं न्याय दिला काय?, काँग्रेसनंच हिंदू दहशतवाद हा शब्द प्रचलित केला. देशातील हिंदू न्याय मागत असताना त्यांना दहशतवादी का संबोधण्यात आलं. नरसिंह राव यांनी काँग्रेससाठी जीवन समर्पित केलं, परंतु त्यांचं पार्थिव काँग्रेसच्या कार्यालयात ठेवू दिलं नाही. नरसिंह राव यांची आत्मा काँग्रेसकडे न्याय मागत आहे?, असंही मोदी म्हणाले आहेत. एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्याय योजनेवरून काँग्रेसचे वाभाडे काढले आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस