शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

'तसा' कोणताच प्रस्ताव नाही! महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला पुन्हा धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 20:43 IST

उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात; कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यानं दोन दिवसांचं अधिवेशन

मुंबई: उद्यापासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. कोरोनाचं संकट असल्यानं दोन दिवसांचंच अधिवेशन घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यातच विधानसभा अध्यक्ष पदासाठी आग्रही असलेल्या काँग्रेसला धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. उद्यापासून सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. सरकारकडून कोविड परिस्थितीचं कारण देत निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता आहे. 

विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ते रिक्त आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या आणि केवळ दोनच दिवस चालणाऱ्या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक अपेक्षित होती. त्यासाठी संग्राम थोपटे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. या पदासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची नावंही चर्चेत होती. मात्र काँग्रेस नेतृत्त्वानं थोपटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं ते पद रिक्त झालं. पक्षाच्या प्रदेशाध्यपदी निवड झाल्यानं पटोलेंनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं. तेव्हापासून रिक्त असलेलं पद यंदाच्या अधिवेशनात भरलं जावं अशी काँग्रेसची इच्छा आहे. मात्र ती पूर्ण होणं जवळपास अशक्य आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कोणताही प्रस्ताव सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना देण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले