शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

'तसा' कोणताच प्रस्ताव नाही! महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला पुन्हा धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 20:43 IST

उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात; कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यानं दोन दिवसांचं अधिवेशन

मुंबई: उद्यापासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. कोरोनाचं संकट असल्यानं दोन दिवसांचंच अधिवेशन घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यातच विधानसभा अध्यक्ष पदासाठी आग्रही असलेल्या काँग्रेसला धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. उद्यापासून सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. सरकारकडून कोविड परिस्थितीचं कारण देत निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता आहे. 

विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ते रिक्त आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या आणि केवळ दोनच दिवस चालणाऱ्या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक अपेक्षित होती. त्यासाठी संग्राम थोपटे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. या पदासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची नावंही चर्चेत होती. मात्र काँग्रेस नेतृत्त्वानं थोपटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं ते पद रिक्त झालं. पक्षाच्या प्रदेशाध्यपदी निवड झाल्यानं पटोलेंनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं. तेव्हापासून रिक्त असलेलं पद यंदाच्या अधिवेशनात भरलं जावं अशी काँग्रेसची इच्छा आहे. मात्र ती पूर्ण होणं जवळपास अशक्य आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कोणताही प्रस्ताव सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना देण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले