शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
4
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
5
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
6
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
7
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
8
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
9
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
10
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
11
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
12
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
13
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
14
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
15
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
16
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
17
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
18
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
19
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
20
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

मंदिराच्या आंदोलनातून हिंदुत्वाकडे वळताय का?; आंबेडकरांनी दिलं 'अर्थ'पूर्ण उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 3:50 PM

पंढरपूरातील विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी आंबेडकरांनी केलं होतं आंदोलन

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी दोन आठवड्यांपूर्वी पंढरपूरात मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केलं होतं. आंबेडकरांच्या आंदोलनानंतर वंचितनं हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याची चर्चा सुरू झाली. आंबेडकर हिंदू धर्माकडे वळले, मंदिराच्या माध्यमातून सोशल इंजिनीयरिंग सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली. याच मुद्द्यावर आंबेडकर यांनी पुन्हा भाष्य केलं आहे. मी कोणाला उत्तरं देत बसत नाही, मला जे वाटतं ते मी करतो, असं थेट उत्तर आंबेडकरांनी दिलं. मंदिर सुरू करण्याच्या मागणीमागील नेमका अर्थदेखील त्यांनी सांगितला.“सत्तेत असलो म्हणून काहीही सहन करायचं का?; आमच्या दैवतावर टीका कराल तर मर्यादा सुटणारच”धर्म, मंदिरं यांचा संबंध थेट अर्थकारणाशी आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मंदिरं सुरू करण्याची मागणी आम्ही केली. कारण मंदिरं सुरू झाल्यावर अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर येण्यास मदत होईल. पंढरपूरातील मंदिर खुलं झाल्यावर त्या पाठोपाठ तुळजापूर, शेगाव, कोल्हापूर इथली मंदिरं सुरू होतील. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सरकारचा १ लाख कोटींचा महसूल बुडणार आहे. त्यातील काही महसूल मंदिरं आणि त्याच्याशी संबंधित असलेलं अर्थकारण यांच्या माध्यमातून भरून निघेल, असं आंबेडकर म्हणाले.सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल?, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना शहाजोग सल्ला३१ ऑगस्टला आंबेडकरांच्या नेतृत्त्वाखाली पंढरपूरात आंदोलन झालं. त्यानंतर राज्य सरकारनं आंबेडकर यांच्यासह १५ जणांना मंदिरात जाण्याची, विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी दिली. 'राज्यातील प्रार्थनास्थळं सुरू करण्यासाठी सरकारनं १० दिवसांची मुदत मागितली आहे. या दिवसांत सरकारकडून नियमावली जारी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे,' असं आंबेडकर यांनी त्यावेळी सांगितलं होतं. हा १० दिवसांचा कालावधी उलटून गेल्याची आठवण करून दिली असता, नियमावली तयार करण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. त्याबद्दलचा निर्णय याच आठवड्यात अपेक्षित आहे, असं आंबेडकर म्हणाले.

पंढरपूरातील आंदोलनानंतर काय म्हणाले होते आंबेडकर?मंदिरं खुली करण्याचा मुद्दा हाती घेऊन वंचितनं हिंदुत्व पकडलं का, असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना आंदोलनानंतर विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकून आंबेडकर काही सेकंद थांबले. 'महात्मा फुले, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही गुरू मानतो. या तिघांनी कधीही धर्म नाकारला नाही. धर्म अविभाज्य अंग आहे, अशीच त्यांची भावना होती. आम्ही त्यांच्या विचारांनुसार चालतो. कोणी कोणाला मानायचं, याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. इतर कोणतीही व्यक्ती ते लादू शकत नाही,' असं उत्तर आंबेडकर यांनी दिलं. विठ्ठ्लाच्या भाविकांना पंढरपूरला यायचं आहे. विठोबाचं दर्शन घ्यायचं आहे. मात्र सरकारच्या नियमांमुळे त्यांना येणं शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही प्रार्थनास्थळं उघडण्याची भूमिका घेतली आणि आंदोलन केलं, असं ते पुढे म्हणाले होते. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPandharpurपंढरपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या