शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

न भूतो! हरियाणाचे खट्टर सरकार वाचविण्यासाठी मोदी उतरले मैदानात; दुष्यंत चौटाला घेणार भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 15:27 IST

Dushyant Chautala And Narendra Modi : दीड महिन्यांत सरकारसोबतच्या चर्चा निष्फळ ठरल्यानं आता भाजपाचं हरियाणातील सरकार धोक्यात आलं आहे.

नवी दिल्ली - गेल्या कित्येक दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्राने कृषी कायदे मागे घ्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र मोदी सरकार कायदे न घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. आंदोलक शेतकऱ्यांमधील बहुतांश जण पंजाब आणि हरियाणातील आहे. दीड महिन्यांत सरकारसोबतच्या चर्चा निष्फळ ठरल्यानं आता भाजपाचं हरियाणातील सरकार धोक्यात आलं आहे. हरियाणामध्ये बहुमतापासून दूर असलेल्या भाजपाचे मनोहरलाल खट्टर सरकार संकटात आले आहे. हरियाणात भाजप जननायक जनता पक्षासोबत (जेजेपी) सत्तेत आहे. जेजेपीचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. 

दुष्यंत चौटाला मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह दिल्लीत दाखल झाले होते. दोन्ही नेतांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहांची मंगळवारी भेट घेतली आहे. यानंतर आता चौटाला बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्रानं तिन्ही कृषी कायदे मागे घ्यायला हवेत. कारण हरयाणा, पंजाब आणि इतर राज्यांतील शेतकरी या कायद्यांच्या विरोधात आहे. चौटाला आमच्या भावना शहांपर्यंत पोहोचवतील, अशी अपेक्षा जेजेपीचे आमदार जोगी राम सिहाग यांनी व्यक्त केली.

शेतकरी आंदोलन भाजपाला भोवणार; हरियाणातील खट्टर सरकार संकटात

अमित शहांची भेट घेण्यापूर्वी चौटालांनी एका फार्म हाऊसवर आपल्या आमदारांची भेट घेतली. त्यावेळी आमदारांच्या एका गटानं कृषी कायद्यांना विरोध असल्याचं स्पष्ट सांगितलं. कायदे मागे न घेतल्यास त्याचे परिणाम राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप-जेजेपी युतीला भोगावे लागतील, असं मत यावेळी पक्षाचे आमदार जोगी राम सिहाग यांनी व्यक्त केलं. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन आता उग्र होऊ लागले असून याचा परिणाम आजुबाजुच्या राज्यांमधील राजकारणावरही जाणवू लागला आहे. हरियाणामध्ये भाजपाचे मनोहरलाल खट्टर सरकार संकटात आले आहे.

जेजेपीचे आमदार किती?

हरियाणामध्ये जेजेपीचे 10 आमदार आहेत. हरियाणात 2019 मध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. 90 जागा असलेल्या या विधानसभेत भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. यामुळे जेजेपीने हात पुढे करत पाठिंबा दिला होता. जेजेपीच्या पाठिंब्याने भाजपाचे मनोहरलाल खट्टर पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. शेतकरी आंदोलनावरून पहिली ठिणगी पंजाबमध्ये पडली होती. शिरोमणि अकाली दलाने सप्टेंबरमध्येच केंद्रातील मंत्रीपद सोडत काडीमोड घेतला होता. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीHaryanaहरयाणाFarmer strikeशेतकरी संपBJPभाजपाFarmerशेतकरी