शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

न भूतो! हरियाणाचे खट्टर सरकार वाचविण्यासाठी मोदी उतरले मैदानात; दुष्यंत चौटाला घेणार भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 15:27 IST

Dushyant Chautala And Narendra Modi : दीड महिन्यांत सरकारसोबतच्या चर्चा निष्फळ ठरल्यानं आता भाजपाचं हरियाणातील सरकार धोक्यात आलं आहे.

नवी दिल्ली - गेल्या कित्येक दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्राने कृषी कायदे मागे घ्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र मोदी सरकार कायदे न घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. आंदोलक शेतकऱ्यांमधील बहुतांश जण पंजाब आणि हरियाणातील आहे. दीड महिन्यांत सरकारसोबतच्या चर्चा निष्फळ ठरल्यानं आता भाजपाचं हरियाणातील सरकार धोक्यात आलं आहे. हरियाणामध्ये बहुमतापासून दूर असलेल्या भाजपाचे मनोहरलाल खट्टर सरकार संकटात आले आहे. हरियाणात भाजप जननायक जनता पक्षासोबत (जेजेपी) सत्तेत आहे. जेजेपीचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. 

दुष्यंत चौटाला मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह दिल्लीत दाखल झाले होते. दोन्ही नेतांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहांची मंगळवारी भेट घेतली आहे. यानंतर आता चौटाला बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्रानं तिन्ही कृषी कायदे मागे घ्यायला हवेत. कारण हरयाणा, पंजाब आणि इतर राज्यांतील शेतकरी या कायद्यांच्या विरोधात आहे. चौटाला आमच्या भावना शहांपर्यंत पोहोचवतील, अशी अपेक्षा जेजेपीचे आमदार जोगी राम सिहाग यांनी व्यक्त केली.

शेतकरी आंदोलन भाजपाला भोवणार; हरियाणातील खट्टर सरकार संकटात

अमित शहांची भेट घेण्यापूर्वी चौटालांनी एका फार्म हाऊसवर आपल्या आमदारांची भेट घेतली. त्यावेळी आमदारांच्या एका गटानं कृषी कायद्यांना विरोध असल्याचं स्पष्ट सांगितलं. कायदे मागे न घेतल्यास त्याचे परिणाम राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप-जेजेपी युतीला भोगावे लागतील, असं मत यावेळी पक्षाचे आमदार जोगी राम सिहाग यांनी व्यक्त केलं. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन आता उग्र होऊ लागले असून याचा परिणाम आजुबाजुच्या राज्यांमधील राजकारणावरही जाणवू लागला आहे. हरियाणामध्ये भाजपाचे मनोहरलाल खट्टर सरकार संकटात आले आहे.

जेजेपीचे आमदार किती?

हरियाणामध्ये जेजेपीचे 10 आमदार आहेत. हरियाणात 2019 मध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. 90 जागा असलेल्या या विधानसभेत भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. यामुळे जेजेपीने हात पुढे करत पाठिंबा दिला होता. जेजेपीच्या पाठिंब्याने भाजपाचे मनोहरलाल खट्टर पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. शेतकरी आंदोलनावरून पहिली ठिणगी पंजाबमध्ये पडली होती. शिरोमणि अकाली दलाने सप्टेंबरमध्येच केंद्रातील मंत्रीपद सोडत काडीमोड घेतला होता. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीHaryanaहरयाणाFarmer strikeशेतकरी संपBJPभाजपाFarmerशेतकरी