शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 19:12 IST

Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीत भाजपला जागा सुटणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्ष सोडला. त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी खंत व्यक्त केली.  

Devendra Fadnavis Latest News: "एकट्या भाजपच्या भरोशावर हा विजय मिळणार नाही. तीनही पक्षांची बेरीज करून आम्ही विजयापर्यंत पोहोचतोय", असा दावा करतानाच महायुतीच्या राजकारणामुळे अनेक चांगले नेते भाजप सोडून गेले, अशी खंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

एका मुलाखतीत निष्ठावंतावर अन्याय होतोय, बंडखोरीची भीती आहे, त्यासाठी भाजपकडे योजना काय? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "असं आहे की, राजकारणात आपल्याला व्यावहारिक असावं लागतं आणि जमिनीवरची परिस्थिती काय आहे, हे समजून निर्णय करावे लागतात. आज जमिनीवरची परिस्थिती हीच आहे की, तीन पक्ष मिळूनच आम्हाला विजय मिळणार आहे."

उद्धव ठाकरेंचे १७ उमेदवार आमचे नेते -फडणवीस

"एकट्या भाजपच्या भरोशावर हा विजय मिळणार नाही. तीनही पक्षांची बेरीज करून आम्ही विजयापर्यंत पोहोचतोय. हे खरंय की भाजप यातील सर्वात प्रमुख पक्ष आहे. सर्वात जास्त मते आमच्याकडे आहे. आमची मतांची टक्केवारीही जास्त आहे. मग अशा परिस्थितीत जेव्हा तुम्हाला ते पक्ष पाहिजेत, त्यांची मते पाहिजेत आणि त्यांना आम्ही जागा देणार नाही, असं नाही म्हणता येत. तडजोड करावीच लागते. हे खरंय की जेव्हा आपण तडजोड करतो, त्यावेळी काही लोकांवर अन्याय होतो. त्याचं दुःखही होतं. कारण आम्ही आधी अडीच वर्ष २८८ जागांवर काम करत होतो. अनेक नेते आम्ही तयार केले. त्यादिवशी मी बघत होतो, उद्धव ठाकरेंनी जी पहिली यादी घोषित केली. त्यात १७ लोकं आमची आहेत. आमचे १७ नेते आहेत. राजकारणात अलिकडच्या काळात कोणी थांबायला तयार नाही. त्यामुळे त्यांचं असं वाटतं की, साहेब आम्ही एवढी तयारी केली. आम्ही निष्ठावंतच आहोत, पण तुम्ही जागा दुसऱ्या पक्षाला दिली."

"युतीच्या राजकारणामुळे चांगले लोक दूर गेले"

"महाराष्ट्राची निवडणूक अशी आहे की, याठिकाणी सहा पक्ष प्रमुख आहेत आणि इतके पक्ष आहेत की, प्रत्येक कलाकाराला रोल आहे. इतके सिनेमे बननं चाललेलं आहे. त्यामुळे प्रत्येक जण जो स्वतःला हिरो समजतो. तो ज्या सिनेमात काम मिळेल तिथे चाललाय. मी नावं घेणार नाही, पण काही लोकांच्याबद्दल मला दुःखही आहे. कारण चांगली मंडळी आहेत, जी या युतीच्या राजकारणामुळे आमच्यापासून दूर गेली. त्याचं दुःख आहे." 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाharshvardhan patilहर्षवर्धन पाटील