शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

"पूर रोखण्यासाठी संरक्षक भिंत हा उपाय नाही, तर…” देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला असा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 11:41 IST

Devendra Fadnavis News: भविष्यात पूर येऊ नये यासाठी पुराचा धोका असलेल्या नद्यांच्या किनाऱ्यावर असलेल्या गाव आणि शहरांच्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती

मुंबई - गेल्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन मोठी आर्थिक हानी झाली होती. दरम्यान, भविष्यात पूर येऊ नये यासाठी पुराचा धोका असलेल्या नद्यांच्या किनाऱ्यावर असलेल्या गाव आणि शहरांच्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी पूर रोखण्यासाठी संरक्षक भिंत हा उपाय नाही, असे सांगितले. तसेच पूरस्थिती रोखण्यासाठी वेगळा पर्याय सुचवला आहे. (Devendra Fadnavis  Says,"A protective wall is not a solution to prevent floods, but A diversion canal is a good option'')

मुख्यमंत्र्यांच्या संरक्षण भिंत बांधण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने काय ठरवले याची मला काही कल्पना नाही. मात्र संरक्षक भिंत हा काही त्याच्यावरचा उपाय नाही. भिंत बांधली तरी त्याच्यावरून पाणी येणार. किंवा ते आऊटलँकिंग करणार, कारण या पाण्याचा वेग आणि दाब अधिक असेल. जे पाणी पावसाचं नाही. आपण पाऊस वाढल्यानंतर जेव्हा धरणाचा विसर्ग करतो तेव्हा चारही बाजूंनी पाणी एकत्र येतं. आपण एखाद्या ठिकाणी भिंत बांधून त्याचा फायदा होईल. मात्र यापेक्षा आमच्या सरकारच्या काळात निर्णय घेतल्याप्रमाणे डायव्हर्जन कॅनॉल तयार करून पुराचा धोका असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात नेला येईल. त्यासंदर्भात वर्ल्ड बँकेशी आपण चर्चा केली होती. त्याला तत्त्वता मान्यताही मिळाली होती. तो प्रकल्प सरकारने पुढे नेल्यास अधिक फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काही जिल्ह्यांमध्ये वारंवार पूर येतात. पूररेषा वारंवार ओलांडणाऱ्या नद्यांभोवती गाव आणि वस्त्यांच्या ठिकाणी संरक्षक भिंती उभारता येईल का? याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत अधिकारी आणि उपमुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. या निर्णयानुसार महाडमधील सावित्री नदी आणि चिपळूणमधील वशिष्ठी नदीला संरक्षक भिंत बांधण्यासा प्राधान्य दिले जाणार आहे. 

 

टॅग्स :floodपूरchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाKolhapur Floodकोल्हापूर पूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे