शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“म्हणूनच संन्यास घेण्याची भाषा केली होती”; फडणवीसांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 21:14 IST

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना संन्यास घेऊ देणार नाही, असे म्हटले होते. त्यावर, म्हणूनच संन्यास घेण्याची भाषा केली होती, असा प्रतिटोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीसांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तरयापुढेही २५ वर्ष राजकारण करणार आहे - फडणवीसमला माहिती आहे की, संन्यास घ्यायची गरजच येणार नाही - फडणवीस

मुंबई: ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि मराठा आरक्षण यावरून राज्यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोध पक्ष भाजप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. तर, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही जोरदार झडत आहेत. दोन्ही आरक्षणांच्या मुद्द्यावरून भाजपने सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात बोलताना संन्यास घेण्याची भाषा केली होती. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना संन्यास घेऊ देणार नाही, असे म्हटले होते. त्यावर, म्हणूनच संन्यास घेण्याची भाषा केली होती, असा प्रतिटोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. (devendra fadnavis replied sanjay raut over retirement statement)

राज्यात सत्तेत आल्यानंतर ओबीसी आरक्षण मिळवून दिले नाही, तर राजकारणातून संन्यास घेईन, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केली होती. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, देवेंद्र फडणवीस लढवय्ये नेते आहेत. त्यांना संन्यास घेऊ देणार नाही. गरज पडली, तर मी त्यांची भेट घेईन. राज्याला आणि देशाला त्यांची गरज आहे. त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. याला आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

“हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी राफेल डीलवर पत्रकार परिषद घ्यावी”

यापुढेही २५ वर्ष राजकारण करणार

ज्यावेळी एखादी गोष्ट बोलतो, तेव्हा विचारपूर्वकच बोलतो. मला माहिती आहे की, संन्यास घ्यायची गरजच येणार नाही. पण जे करण्यासारखे आहे ते हे करत नाहीत. म्हणून मी तसे बोललो आणि राऊत म्हणतात तेही खरेच आहे, राज्याच्या राजकारणाला सगळ्यांचीच गरज आहे. माझीही गरज आहे, त्यांचीही गरज आहे. राजकारण एका पक्षाचे नसते. राजकारणात विरोधकही पाहिजेत. सगळ्याच प्रकारच्या लोकांची गरज आहे यापुढेही २५ वर्ष राजकारण करणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

“MPSC ला स्वायत्तता दिली, म्हणजे स्वैराचार नाही”; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

दरम्यान, संजय राऊत एक असे व्यक्ती आहेत, जे सकाळी काही सांगतात, दुपारी काही सांगतात, संध्याकाळी अजून काही सांगतात आणि दुसऱ्या दिवशी तिसरेच काहीतरी सांगतात. त्यांच्या बोलण्याप्रमाणे आम्ही आपले मत बनवायला लागलो आणि तुम्हीही बातमी बनवायला लागलात, तर तुमची बातमी योग्य होणार नाही, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना काढला. 

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा