शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

“म्हणूनच संन्यास घेण्याची भाषा केली होती”; फडणवीसांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 21:14 IST

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना संन्यास घेऊ देणार नाही, असे म्हटले होते. त्यावर, म्हणूनच संन्यास घेण्याची भाषा केली होती, असा प्रतिटोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीसांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तरयापुढेही २५ वर्ष राजकारण करणार आहे - फडणवीसमला माहिती आहे की, संन्यास घ्यायची गरजच येणार नाही - फडणवीस

मुंबई: ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि मराठा आरक्षण यावरून राज्यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोध पक्ष भाजप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. तर, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही जोरदार झडत आहेत. दोन्ही आरक्षणांच्या मुद्द्यावरून भाजपने सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात बोलताना संन्यास घेण्याची भाषा केली होती. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना संन्यास घेऊ देणार नाही, असे म्हटले होते. त्यावर, म्हणूनच संन्यास घेण्याची भाषा केली होती, असा प्रतिटोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. (devendra fadnavis replied sanjay raut over retirement statement)

राज्यात सत्तेत आल्यानंतर ओबीसी आरक्षण मिळवून दिले नाही, तर राजकारणातून संन्यास घेईन, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केली होती. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, देवेंद्र फडणवीस लढवय्ये नेते आहेत. त्यांना संन्यास घेऊ देणार नाही. गरज पडली, तर मी त्यांची भेट घेईन. राज्याला आणि देशाला त्यांची गरज आहे. त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. याला आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

“हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी राफेल डीलवर पत्रकार परिषद घ्यावी”

यापुढेही २५ वर्ष राजकारण करणार

ज्यावेळी एखादी गोष्ट बोलतो, तेव्हा विचारपूर्वकच बोलतो. मला माहिती आहे की, संन्यास घ्यायची गरजच येणार नाही. पण जे करण्यासारखे आहे ते हे करत नाहीत. म्हणून मी तसे बोललो आणि राऊत म्हणतात तेही खरेच आहे, राज्याच्या राजकारणाला सगळ्यांचीच गरज आहे. माझीही गरज आहे, त्यांचीही गरज आहे. राजकारण एका पक्षाचे नसते. राजकारणात विरोधकही पाहिजेत. सगळ्याच प्रकारच्या लोकांची गरज आहे यापुढेही २५ वर्ष राजकारण करणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

“MPSC ला स्वायत्तता दिली, म्हणजे स्वैराचार नाही”; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

दरम्यान, संजय राऊत एक असे व्यक्ती आहेत, जे सकाळी काही सांगतात, दुपारी काही सांगतात, संध्याकाळी अजून काही सांगतात आणि दुसऱ्या दिवशी तिसरेच काहीतरी सांगतात. त्यांच्या बोलण्याप्रमाणे आम्ही आपले मत बनवायला लागलो आणि तुम्हीही बातमी बनवायला लागलात, तर तुमची बातमी योग्य होणार नाही, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना काढला. 

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा