शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश नसल्यानं मुंडे भगिनी नाराज? पत्रकाराच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 16:06 IST

Narendra Modi Cabinet Reshuffle: प्रीतम मुंडे दिल्लीत असल्याच्या बातम्यांना पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी ट्विटरवरून खोटं असल्याचं सांगत आम्ही मुंबईच्या निवासस्थानी आहोत असं म्हटलं होतं.

ठळक मुद्देशिवसेना भाजपा युतीबाबत पत्रकारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी सावध भूमिका घेतली.राज्यातील ४ लोकांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यांना चांगली खातीही देण्यात आली आहे. खात्यांचा महाराष्ट्रासाठी चांगला फायदा होईल. नाशिक जिल्ह्याला ५० वर्षानंतर मंत्रिपदाची संधी मिळाली आहे

नाशिक – केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार(Cabinet Expansion) बुधवारी दिल्लीत पार पडला. तब्बल ४३ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात महाराष्ट्राच्या ४ मंत्र्यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. नारायण राणे(Narayan Rane), कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या नावांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. यात गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत होतं.

प्रीतम मुंडे दिल्लीत असल्याच्या बातम्यांना पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी ट्विटरवरून खोटं असल्याचं सांगत आम्ही मुंबईच्या निवासस्थानी आहोत असं म्हटलं होतं. त्यानंतर प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद नाही त्यामुळे मुंडे समर्थक नाराज झाल्याचं बोललं जात होतं. सोशल मीडियावर मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी आता वेगळा मार्ग निवडावा लागेल असं म्हटलं होतं. या सर्व घडामोडींवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले आहे. नाशिकमध्ये पत्रकारांनी प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने दोन्ही भगिनी नाराज आहेत अशी चर्चा आहे असा प्रश्न विचारला होता. त्यावर तुम्हाला कुणी सांगितले? असा प्रतिसवाल देवेंद्र फडणवीसांनी केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंडे भगिनी नाराज असल्याचं तुम्हाला कुणी सांगितले? उगाच काहीही बदनामी करू नका. भाजपामध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेतात. योग्यवेळी निर्णय होत असतो. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका. राज्यातील ४ लोकांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यांना चांगली खातीही देण्यात आली आहे. या खात्यांचा महाराष्ट्रासाठी चांगला फायदा होईल. नाशिक जिल्ह्याला ५० वर्षानंतर मंत्रिपदाची संधी मिळाली आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच शिवसेना भाजपा युतीबाबत पत्रकारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी सावध भूमिका घेतली. चर्चेवर कुठलेही निर्णय होत नसतात. विविध चर्चा असतात. नारायण राणे त्यांच्या क्षमतेवर मंत्री झालेत. यात बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यात आला नाही असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

भाजपला ओबीसी चेहऱ्याचा विसर पडला

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाला अखेर ओबीसी चेहऱ्याचा विसर पडल्याची टीका प्रकाश शेंडगे यांनी केली. गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे तिला मंत्रिमंडळात स्थान (Cabinet Expansion) न दिल्यामुळे भाजपच्या ओरिजनल ओबीसी चेहऱ्यावर अन्याय झालाय. भागवत कराड ओबीसी आणि वंजारी समाजाचे आहेत. पण गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला खरा ओबीसी चेहरा दिला होता. तो या मंत्रिमंडळात नाही आहे, असे शेंडगेंनी म्हटले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारBJPभाजपा