शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

“मतदान घ्या, मग तुमची ताकद पाहू; बहुमत आहे, तर घाबरता कशाला?”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 16:34 IST

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली असून, बहुमत आहे, तर मग घाबरता कशाला, अशी विचारणा केली आहे.

ठळक मुद्देतुमच्याकडे बहुमत आहे, तर मग घाबरताय का?यांचा एकमेकांवरही विश्वास नाहीपंकजा मुंडेचे भाषण ऐकण्याचा प्रश्नच नाही

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील वातावरण ढवळून निघत असल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडले. मात्र, त्यात विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा प्रस्तावच नसल्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली असून, बहुमत आहे, तर मग घाबरता कशाला, अशी विचारणा केली आहे. (devendra fadnavis criticized maha vikas aghadi over assembly speaker election)

विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत. ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते. पण अध्यक्षच नाहीत. तुमच्याकडे बहुमत आहे, तर मग घाबरताय का? हात वर करुन निवड कशासाठी? मतदान घ्या, मग तुमची ताकद पाहू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

“आम्हाला वादात पडायचं नाही, ठाकरे सरकारने कृषी विधेयक तातडीने मागे घ्यावं”

यांचा एकमेकांवरही विश्वास नाही

महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या काळात हे कधीही घडले नव्हते. यांचा एकमेकांवरही विश्वास नाही आणि आपल्या आमदारांवर देखील विश्वास नाही, असा टोला लगावत नाना पटोले बोलतात, त्यानंतर शरद पवार मत व्यक्त करतात. त्यानंतर काही लोक नाना पटोले यांना न घेताच पवाराची भेट घेतात. यातून सर्व काही कळते, अशी टीका फडणवीस यांनी यावेळी बोलताना केली.  

देशात उद्धव ठाकरेच ‘लय भारी’ कारभारी; लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये ठरले नंबर १

पंकजा मुंडेचे भाषण ऐकण्याचा प्रश्नच नाही

पंकजा मुंडे यांचे भाषण ऐकले का, या प्रश्नावर उत्तर देताना, पंकजा मुंडेचे भाषण ऐकण्याचा प्रश्नच नाही. आमचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंच्या भाषणावर खुलासा केला आहे. त्यांच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर खुलासेही केलेत. त्यावर आता मी बोलण्यात काही अर्थ नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुकेश अंबानी ‘ही’ कंपनी खरेदी करणार; ३ कोटी व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मेगा प्लान

दरम्यान, आम्ही सक्षम विरोधी पक्ष आहोत. लोकांसाठी आम्ही काम करणार आहोत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आपल्या वजनानेच कोसळणार आहे. ते आज कोसळेल की उद्या कोसळेल हे मी सांगितलेले नाही. पण ज्या दिवशी कोसळेल, त्या दिवशी आम्ही राज्याला पर्यायी सरकार देऊ, असा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना