शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे, देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 00:57 IST

डॉक्टर हे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा स्थितीत संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे आहे. असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.

नागपूर - डॉक्टरांसंदर्भात शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर टोकाची प्रतिक्रिया टाळली आहे. मात्र डॉक्टर हे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा स्थितीत संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे आहे. असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. सोमवारी फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.नागपुरसह राज्यात 'कोरोना'मुळे वाढणारे मृत्यू हे गंभीर आहेत. शिवाय आॅगस्ट महिन्यात 'कोरोना'बाधितांची संख्यादेखील प्रचंड वाढली आहे. दिल्लीचा अनुभव लक्षात घेता राज्यभरात चाचण्यांची संख्या वाढविणे अनिवार्य झाले आहे. नागपुरसारख्या शहरात दररोज पाच हजारांहून अधिक संशयितांची चाचणी झाली पाहिजे. चाचण्या वाढल्यानंतर रुग्णांची संख्या वाढेल व त्यांच्यासाठी तशी व्यवस्थादेखील करावी लागेल, असे फडणवीस म्हणाले.पुढील महिन्याभराचा काळ नागपुरसाठी गंभीरनागपुरात मृत्यूचे व 'कोरोना'बाधितांचे प्रमाण वाढलेले आहे. यासंदर्भात योग्य नियोजन करुन पावले उचलायला हवे. एकूणच पुढील महिन्याभराचा काळ नागपुरकरांसाठी गंभीरच आहे. लवकर निदान होणे गरजेचे आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.'जम्बो सेंटर'कामाचे नाहीनागपुरात 'कोरोना'वर उपचारासाठी 'जम्बो सेंटर' कामाचे राहणार नाही. त्यापेक्षा विकेंद्रीकरण करत मध्यम स्वरुपाचे केंद्र उभारले गेले पाहिजे. ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत त्यांना घरीच ठेवून त्यांचे समुपदेशन झाले पाहिजे. यासाठी डॉक्टर 'व्हिडीओ कॉल'च्या माध्यमातून संपर्क साधू शकतात. तर उरलेल्या ३ ते ४ टक्के गंभीर रुग्णांसाठी उपचाराची व्यवस्था उभी झाली पाहिजे, अशी सूचना मी केली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. खाजगी संस्थांसोबत 'कोव्हिड केअर सेंटर' उभारता येतील. आवश्यकता भासली तर 'नॉन कोव्हिड' इस्पितळांना त्यांच्यासोबत जोडता येईल. थोडी तयारी केली तर २० ते २५ दिवसात स्थिती नियंत्रणात येईल, असेदेखील ते म्हणाले.राहुल गांधी यांना गंभीरतेने घेत नाही'फेसबुक'संदर्भातून राहुल गांधी यांनी भाजपावर आरोप लावले आहेत. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता आम्ही राहुल गांधी यांना गंभीरतेने घेत नाही असे उत्तर त्यांनी दिले. राहुल गांधी काहीही आरोप लावतात. त्यांना आम्हीच काय कुणीही गंभीरतेने घेत नाही, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस