शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे, देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 00:57 IST

डॉक्टर हे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा स्थितीत संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे आहे. असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.

नागपूर - डॉक्टरांसंदर्भात शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर टोकाची प्रतिक्रिया टाळली आहे. मात्र डॉक्टर हे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा स्थितीत संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे आहे. असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. सोमवारी फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.नागपुरसह राज्यात 'कोरोना'मुळे वाढणारे मृत्यू हे गंभीर आहेत. शिवाय आॅगस्ट महिन्यात 'कोरोना'बाधितांची संख्यादेखील प्रचंड वाढली आहे. दिल्लीचा अनुभव लक्षात घेता राज्यभरात चाचण्यांची संख्या वाढविणे अनिवार्य झाले आहे. नागपुरसारख्या शहरात दररोज पाच हजारांहून अधिक संशयितांची चाचणी झाली पाहिजे. चाचण्या वाढल्यानंतर रुग्णांची संख्या वाढेल व त्यांच्यासाठी तशी व्यवस्थादेखील करावी लागेल, असे फडणवीस म्हणाले.पुढील महिन्याभराचा काळ नागपुरसाठी गंभीरनागपुरात मृत्यूचे व 'कोरोना'बाधितांचे प्रमाण वाढलेले आहे. यासंदर्भात योग्य नियोजन करुन पावले उचलायला हवे. एकूणच पुढील महिन्याभराचा काळ नागपुरकरांसाठी गंभीरच आहे. लवकर निदान होणे गरजेचे आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.'जम्बो सेंटर'कामाचे नाहीनागपुरात 'कोरोना'वर उपचारासाठी 'जम्बो सेंटर' कामाचे राहणार नाही. त्यापेक्षा विकेंद्रीकरण करत मध्यम स्वरुपाचे केंद्र उभारले गेले पाहिजे. ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत त्यांना घरीच ठेवून त्यांचे समुपदेशन झाले पाहिजे. यासाठी डॉक्टर 'व्हिडीओ कॉल'च्या माध्यमातून संपर्क साधू शकतात. तर उरलेल्या ३ ते ४ टक्के गंभीर रुग्णांसाठी उपचाराची व्यवस्था उभी झाली पाहिजे, अशी सूचना मी केली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. खाजगी संस्थांसोबत 'कोव्हिड केअर सेंटर' उभारता येतील. आवश्यकता भासली तर 'नॉन कोव्हिड' इस्पितळांना त्यांच्यासोबत जोडता येईल. थोडी तयारी केली तर २० ते २५ दिवसात स्थिती नियंत्रणात येईल, असेदेखील ते म्हणाले.राहुल गांधी यांना गंभीरतेने घेत नाही'फेसबुक'संदर्भातून राहुल गांधी यांनी भाजपावर आरोप लावले आहेत. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता आम्ही राहुल गांधी यांना गंभीरतेने घेत नाही असे उत्तर त्यांनी दिले. राहुल गांधी काहीही आरोप लावतात. त्यांना आम्हीच काय कुणीही गंभीरतेने घेत नाही, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस