शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: केंद्राचे क्रूर राजकारण! ऑक्सिजन आणण्यास गेलेल्या एक्स्प्रेसचा खोळंबा; अरविंद सावंतांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 04:42 IST

Oxygen Express: ऑक्सिजन एक्स्प्रेसबाबत माध्यमांना अरविंद सावंत यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेऊन रेल्वेने ऑक्सिजन आणण्याचा तोडगा काढण्यात आला. त्यानुसार १९ तारखेला कळंबोलीहून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस अजूनही फिरतेच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार क्रूर राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी बुधवारी केला आहे. महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला कळंबोलीहून निघालेल्या एक्स्प्रेस ट्रेनला रेल्वे खात्याने फिरवत ठेवले आहे. जनतेच्या जिवाशी खेळण्याचा, विश्वासघात करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.ऑक्सिजन एक्स्प्रेसबाबत माध्यमांना अरविंद सावंत यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेऊन रेल्वेने ऑक्सिजन आणण्याचा तोडगा काढण्यात आला. त्यानुसार १९ तारखेला कळंबोलीहून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस अजूनही फिरतेच आहे. आता ही एक्स्प्रेस ट्रेन रायपूरजवळ आहे. गाडीला जायचे आहे विशाखापट्टणमला पण ती फिरतेय कुठे माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन येण्यास अजून तीन दिवस लागणार आहेत. महाराष्ट्राच्या पाठीत सुरा खुपसण्याचा हा प्रकार आहे. या ऑक्सिजन एक्स्प्रेसला ग्रीन कॉरिडोअर उपलब्ध करून दिला जाईल, असे रेल्वे खात्याने सांगितले होते. त्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याप्रकरणी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणीही सावंत यांनी केली.

कोरोनाच्या संकटकाळात राज्यात विरोधी पक्षाकडून राजकारण सुरू आहे. गरिबांच्या जीवाशी खेळणारे राजकारण केले जात आहे. राज्याने केलेले चांगले काम दिसू नये, यासाठी घाणेरडे राजकारण सुरू आहे. असाच प्रकार भिलाई प्लांटमधून महाराष्ट्राला शंभर टक्के ऑक्सिजन पुरवण्याचे ठरले होते; मात्र आता ते केवळ साठ टक्क्यांवर आणण्यात आले आहे. हा बदल कोणी आणि का केला, याचेही उत्तर मिळायला हवे. महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यासाठी अडवणुकीचे राजकारण केले जात आहे. विरोधक सत्तेसाठी कासावीस झाले आहेत, असेही सावंत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे सांगत आहेत; पण त्यांनी चार तासाच्या अवधीत लाॅकडाऊन जाहीर केला होता. त्याचा फायदा जरूर झाला. आता तर डबल म्युटेशनचा विषाणू आहे. तो अधिक धोकादायक आहे. अजून बंगालच्या निवडणुका संपायच्या आहेत. या निवडणुका झाल्या की पंतप्रधानच लॉकडाऊनची घोषणा करतील, असे भाकीतही सावंत यांनी केले.

राज्य सरकारने खेळखंडोबा मांडला आहे - केशव उपाध्येnमहाराष्ट्रातील कोरोनाचा संकटात सर्व सहाय्य करण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. महाविकास आघाडी सरकारनेच या प्रश्नाचा खेळखंडोबा केला आहे. राज्य सरकारला ऑक्सिजन टँकरसाठी चालक देता आले नाहीत. nरेमडेसिविर, ऑक्सिजन अशा सर्व आघाड्यांवर राज्यातील सरकारने गोंधळ घालून ठेवला आहे. यातूनही केंद्र सरकार वाट काढण्याचा प्रयत्नात असताना आरोपबाजी केली जात असल्याचा पलटवार भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला. मुळात सावंत यांना या विषयाची पुरेशी माहिती असल्याचे दिसत नाही. ज्या पद्धतीने राज्य सरकारने खेळखंडोबा मांडला आहे तसाच गोंधळ सावंत यांचा उडाल्याचा दिसतो, असेही उपाध्ये म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndian Railwayभारतीय रेल्वेArvind Sawantअरविंद सावंत