शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

काँग्रेस सरकारवर पुन्हा संकट?; सचिन पायलट समर्थकांमुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 13:56 IST

सचिन पायलट यांच्या जवळचे आमदार वेदप्रकाश सोलंकी यांनी सत्तेत अनुसुचित जाती आणि जमातीला न्याय देण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री अशोक गेहलोत हे संकट कसं परतवून लावतात हे पाहणं गरजेचे आहेअनुसूचित जाती आणि जमातीचं काँग्रेस सरकार गठन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाच्या नियुक्त्या झाल्या पाहिजेत.

नवी दिल्ली – राजस्थानच्या सत्ताधारी काँग्रेस पार्टीत पुन्हा एकदा गटबाजीनं डोकं वर काढलं आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या समर्थकांनी त्यांचा हक्क परत मागितला आहे. सचिन पायलट यांच्यासोबत समर्थक आमदारांना मंत्रिमंडळ विस्तार आणि पक्षातील पदांसाठी आवाज उठवला आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची मानसिकता नाही.

सचिन पायलट यांच्या जवळचे आमदार वेदप्रकाश सोलंकी यांनी सत्तेत अनुसुचित जाती आणि जमातीला न्याय देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे संकट कसं परतवून लावतात हे पाहणं गरजेचे आहे. आमदार वेदप्रकाश सोलंकी म्हणाले की, अनुसूचित जाती आणि जमातीचं काँग्रेस सरकार गठन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे समाजातील आमदारांना महत्त्वाची खात्याची जबाबदारी मिळायली हवी. सध्या असणाऱ्यांना कामगार आणि कारखाना बायलर्स विभागाची जबाबदारी दिली. या विभागाचा थेट जनतेसोबत संबंध नाही. या समाजातील आमदारांना वैद्यकीय, ऊर्जा आणि पाणी पुरवठा अशा खात्यांची जबाबदारी द्यायला हवी असं सोलंकी म्हणाले.

तसेच राजस्थानात काँग्रेस सरकार येऊन अडीच वर्ष झाली. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाच्या नियुक्त्या झाल्या पाहिजेत. कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं सरकार आलं आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण जितकं होईल तितकं पक्षाला आणि कार्यकर्त्यांना फायदा होईल. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनीही हाच पर्याय दिला होता. विधानसभेत आम्ही जे मुद्दे मांडले होते त्याचंही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्यामुळे आमची प्रतिमा मलीन होत आहे असं सोलंकी यांनी सांगितले.

मागील जुलै महिन्यात राजस्थानमध्ये राजकीय वातावरण पेटलं होतं. सचिन पायलट यांनी समर्थक आमदारांसह अशोक गेहलोत यांच्याविरोधात बंड पुकारलं होतं. त्यानंतर काँग्रेस हायकमांडच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण शांत झालं. पायलट आणि गेहलोत यांच्यातील वाद संपवण्यासाठी एक कमिटी बनवली. परंतु या कमिटीच्या शिफारशींवर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. ज्या पायलट समर्थक आमदारांना मंत्रिपदावरून हटवलं होतं. त्यांना परतही घेण्यात आलं नाही. त्यामुळे आता पुन्हा सचिन पायलट समर्थक नाराज झाल्याची चर्चा आहे.

काय म्हणाले सचिन पायलट?

मला सोनिया गांधी यांच्यावर विश्वास आहे. त्यांच्या आदेशावर जी कमिटी बनवली होती. त्या कमिटीच्या मुद्द्यावर अद्याप पुढे कारवाई झाली नाही. आता ५ राज्यांच्या निवडणुकाही पार पडतील त्यामुळे कमिटीच्या शिफारशींवर विलंब नको. दलित वर्गाला मान सन्मान मिळावा. सरकारने जे आश्वासन लोकांना दिलं होतं. ते पूर्ण करायला हवं. आता अडीच वर्ष झाली. मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ नियुक्त्या कराव्या असं सचिन पायलट म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसSachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतSonia Gandhiसोनिया गांधी