शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस सरकारवर पुन्हा संकट?; सचिन पायलट समर्थकांमुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 13:56 IST

सचिन पायलट यांच्या जवळचे आमदार वेदप्रकाश सोलंकी यांनी सत्तेत अनुसुचित जाती आणि जमातीला न्याय देण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री अशोक गेहलोत हे संकट कसं परतवून लावतात हे पाहणं गरजेचे आहेअनुसूचित जाती आणि जमातीचं काँग्रेस सरकार गठन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाच्या नियुक्त्या झाल्या पाहिजेत.

नवी दिल्ली – राजस्थानच्या सत्ताधारी काँग्रेस पार्टीत पुन्हा एकदा गटबाजीनं डोकं वर काढलं आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या समर्थकांनी त्यांचा हक्क परत मागितला आहे. सचिन पायलट यांच्यासोबत समर्थक आमदारांना मंत्रिमंडळ विस्तार आणि पक्षातील पदांसाठी आवाज उठवला आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची मानसिकता नाही.

सचिन पायलट यांच्या जवळचे आमदार वेदप्रकाश सोलंकी यांनी सत्तेत अनुसुचित जाती आणि जमातीला न्याय देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे संकट कसं परतवून लावतात हे पाहणं गरजेचे आहे. आमदार वेदप्रकाश सोलंकी म्हणाले की, अनुसूचित जाती आणि जमातीचं काँग्रेस सरकार गठन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे समाजातील आमदारांना महत्त्वाची खात्याची जबाबदारी मिळायली हवी. सध्या असणाऱ्यांना कामगार आणि कारखाना बायलर्स विभागाची जबाबदारी दिली. या विभागाचा थेट जनतेसोबत संबंध नाही. या समाजातील आमदारांना वैद्यकीय, ऊर्जा आणि पाणी पुरवठा अशा खात्यांची जबाबदारी द्यायला हवी असं सोलंकी म्हणाले.

तसेच राजस्थानात काँग्रेस सरकार येऊन अडीच वर्ष झाली. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाच्या नियुक्त्या झाल्या पाहिजेत. कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं सरकार आलं आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण जितकं होईल तितकं पक्षाला आणि कार्यकर्त्यांना फायदा होईल. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनीही हाच पर्याय दिला होता. विधानसभेत आम्ही जे मुद्दे मांडले होते त्याचंही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्यामुळे आमची प्रतिमा मलीन होत आहे असं सोलंकी यांनी सांगितले.

मागील जुलै महिन्यात राजस्थानमध्ये राजकीय वातावरण पेटलं होतं. सचिन पायलट यांनी समर्थक आमदारांसह अशोक गेहलोत यांच्याविरोधात बंड पुकारलं होतं. त्यानंतर काँग्रेस हायकमांडच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण शांत झालं. पायलट आणि गेहलोत यांच्यातील वाद संपवण्यासाठी एक कमिटी बनवली. परंतु या कमिटीच्या शिफारशींवर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. ज्या पायलट समर्थक आमदारांना मंत्रिपदावरून हटवलं होतं. त्यांना परतही घेण्यात आलं नाही. त्यामुळे आता पुन्हा सचिन पायलट समर्थक नाराज झाल्याची चर्चा आहे.

काय म्हणाले सचिन पायलट?

मला सोनिया गांधी यांच्यावर विश्वास आहे. त्यांच्या आदेशावर जी कमिटी बनवली होती. त्या कमिटीच्या मुद्द्यावर अद्याप पुढे कारवाई झाली नाही. आता ५ राज्यांच्या निवडणुकाही पार पडतील त्यामुळे कमिटीच्या शिफारशींवर विलंब नको. दलित वर्गाला मान सन्मान मिळावा. सरकारने जे आश्वासन लोकांना दिलं होतं. ते पूर्ण करायला हवं. आता अडीच वर्ष झाली. मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ नियुक्त्या कराव्या असं सचिन पायलट म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसSachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतSonia Gandhiसोनिया गांधी