शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

संघराज्याच्या संकल्पनेला केंद्र सरकारकडून तडा; खासदार सुनिल तटकरे यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 19:25 IST

राज्य सरकारच्या अधिकारावर गदा आणून केंद्र सरकारची मनमानी हाेणार असल्याने त्याला सर्वच विराेधकांनी कडाडून विराेध केला असल्याचे, खासदार तटकरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देकृषी विधेयक, कामगार विधयेक, पाेर्ट संबधीची अशी विविध विधयेके केंद्र सरकारने बहुमतांच्या जाेरावर पारीत केली आहेतघटनाकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघराज्याच्या संकल्पनेलाच तडा जाणार आहे. सरकारने शेतकरी, कामगार यांच्या विराेधात आणणलेल्या विधयेकांविराेधात राज्यात असंताेष आहे

रायगड - केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये विविध विधयके बहुमतांच्या जाेरावर पारीत केली आहेत. अशा विधेयकांमुळे केंद्र सरकार राज्य सरकारांच्या अधिकारावर गदा आणत आहे. त्यामुळे घटनाकार डाॅॅॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील मुळ संघराज्याची संकल्पना धुळीत मिळवली जात आहे. अशी जाेरदार टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांनी केली.निसर्ग चक्रीवादळात पाेल्ट्री व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत आढावा घेण्यासाठी ते अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आले हाेते. त्यानंतर राष्ट्रवादी काॅग्रेस भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.

कृषी विधेयक, कामगार विधयेक, पाेर्ट संबधीची अशी विविध विधयेके केंद्र सरकारने बहुमतांच्या जाेरावर पारीत केली आहेत. विराेधकांनी सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेला प्रखर विराेध केला आहे. पाेर्टच्या विधयेकामुळे पाेर्टचे खासगीकरण करण्यात येणार आहे. तसेच विविध राज्यात असणाऱ्या पाेर्टच्या परिसरातील जमिनींचे झाेन बदलून राज्य सरकारच्या पूर्व परनावगी शिवाय केंद्र सरकार जमीनींचा ताबा घेणार आहे. त्यामुळे घटनाकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघराज्याच्या संकल्पनेलाच तडा जाणार आहे. राज्य सरकारच्या अधिकारावर गदा आणून केंद्र सरकारची मनमानी हाेणार असल्याने त्याला सर्वच विराेधकांनी कडाडून विराेध केला असल्याचे, खासदार तटकरे यांनी सांगितले.

सरकारने शेतकरी, कामगार यांच्या विराेधात आणणलेल्या विधयेकांविराेधात राज्यात असंताेष आहे. याप्रश्नी राष्ट्रवादी काॅंग्रेस रस्त्यावर उतरुन जन आंदाेलन छेडणार असल्याकेड त्यांनी लक्ष वेधले. मच्छिमारी बंदरांचा विकास व्हावा यासाठी मुरुड तालुक्यातील खाेरा बंदर, श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर आणि दापाेली तालुक्यातील हर्णे बंदरांचा विकास सागरमाला याेजनेंतर्गत करावा अशी मागणी संबंधीत विभागाच्या केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी तातडीने द्यावा अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.कांदा निर्यातीवरील बंदी उठवून उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरातून लवकरच ती सुरु करुन शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे, राज्याचा जीएसटीचा परतावा तातडीने द्यावा, महाड येथे कायमस्वरुपी एनडीआरएफचा कॅंप द्यावा, मुंबई-गाेवा महामार्गाच्या पहील्या टप्यासाठी निधी उपलब्ध करावा, एलआयसीचे खासगीकरण करु नये, कुलाबा किल्याच्या डागडुजीसाठी निधी द्यावा अशी मागण्या केंद्र सरकारकडे केल्याचे खासदार तटकरे यांनी सांगितले.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी