शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

Coronavirus: "जोपर्यंत कोरोना संपुष्टात येत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही", या राज्यातील मंत्र्यांची भीष्म प्रतिज्ञा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 09:36 IST

Coronavirus: कोरोनाला रोखण्यासाठी उत्तर प्रदेशमधील नगरविकास राज्यमंत्री महेश गुप्ता यांनी भीष्म प्रतिज्ञा केल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देअन्य देशांच्या तुलनेत पाहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाच्या साथीला नियंत्रित केलेयोगींच्या प्रयत्नांमुळेच उत्तर प्रदेशात अक्राळविक्राळ रूप घेतलेली कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहेकोरोना नामक शत्रू माझ्या प्रिय भरतातून आणि संपूर्ण जगातून नष्ट होत नाही तोपर्यंत मी अन्नग्रहण करणार नाही

लखनौ - गेल्या दीड वर्षांपासून कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाय केले जात आहेत. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी उत्तर प्रदेशमधील नगरविकास राज्यमंत्री महेश गुप्ता यांनी भीष्म प्रतिज्ञा केल्याचा दावा केला आहे. (Coronavirus in Uttar Pradesh)जोपर्यंत देशातून कोरोनाच्या संसर्गाचा खात्मा होत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही, अशी प्रतिज्ञा गुप्ता यांनी केली आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून आपण अन्न ग्रहण करत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (Until the corona is exhausted Until then, I will not take food, Pledge of Ministers in Uttar Pradesh)

उत्तर प्रदेशमधील राज्यमंत्री महेश गुप्ता यांनी सांगितले की, दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी अन्न ग्रहण न करण्याचा पण केले होता. त्यामुळेच आज देशामध्ये दहशतवाद शेवटच्या घटका मोजत आहे आणि त्याचे कंबरडे मोडले आहे, असा दावाही त्यांनी केला.

यावेळी राज्यमंत्री महेश गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रनायकच नाही तर विश्वनायक असल्याचा उल्लेख केला. नरेंद्र मोदींनी ब्राझीलला संजीवनी दिली आहे. अमेरिकेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांची स्तुती केली आहे. महेश गुप्ता यांनी योगी आदित्यनाथ यांचेही कौतुक केले आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान, आमच्या मुख्यमंत्र्यांनी सातत्याने राज्यातील विविध भागांचे दौरे केले. त्यांना स्वत:ला कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र तरीही त्यांनी आपल्या जीवनाची पर्वा न करता जनतेच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले.

महेश गुप्ता म्हणाले की, आज योगींच्या प्रयत्नांमुळेच उत्तर प्रदेशात अक्राळविक्राळ रूप घेतलेली कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता उत्तर प्रदेश पूर्णपणे तयार आहे. मुलांसाठी वेगळे वॉर्ड तयार केले आहेत. तसेच आवश्यक मशिनरी लावण्यात आली आहे.

राज्यमंत्री गुप्ता यांनी सांगितले की, अन्य देशांच्या तुलनेत पाहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाच्या साथीला नियंत्रित केले आहे. मात्र आता तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. त्यासाठी तयारी सुरू आहे. मात्र मी प्रार्थना करतो की, तिसरी लाट भारतात आणि उत्तर प्रदेशात येऊच नये. त्यासाठीच मी भीष्म प्रतिज्ञा केली आहे. की हा कोरोना नामक शत्रू माझ्या प्रिय भरतातून आणि संपूर्ण जगातून नष्ट होत नाही तोपर्यंत मी अन्नग्रहण करणार नाही.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाPoliticsराजकारण