शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

coronavirus: त्यामुळे कोरोना फैलाव होत असतानाही मोदींपासून भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री टाळताहेत लॉकडाऊन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 09:53 IST

coronavirus in India : देशाला संबोधित करताना कोरोनामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि त्यावरील उपाययोजनांचा उहापोह करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी देशात व्यापक लॉकडाऊन (lockdown ) होणार नसल्याचे संकेत दिले. त

ठळक मुद्दे पंतप्रधान मोदींनी देशात व्यापक लॉकडाऊन होणार नसल्याचे दिले संकेत राज्यांनीही शेवटचा पर्याय म्हणूनच लॉकडाऊनचा अवलंब करावा, असा सल्ला मोदींनी दिलामोदींप्रमाणेच विविध भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही लॉकडाऊन लावणे टाळत आहेत

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात चिंताजन परिस्थिती निर्माण झाली आहे. (coronavirus in India) काही दिवसांपासून देशात अडीच लाखांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी काल देशाला संबोधित केले. मात्र संबोधनात कोरोनामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि त्यावरील उपाययोजनांचा उहापोह करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी देशात व्यापक लॉकडाऊन (lockdown ) होणार नसल्याचे संकेत दिले. तसेच राज्यांनीही शेवटचा पर्याय म्हणूनच लॉकडाऊनचा अवलंब करावा, असा सल्ला दिला. एकीकडे देशातील विविध राज्यांत लॉकडाऊन तसेच इतर कडक निर्बंध लागू होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत लॉकडाऊन हा विषय टाळला जात आहे. त्यामागची कारणे आता समोर येत आहेत. (So even though the corona is spreading, the PM Narendra Modi & chief ministers of BJP-ruled states are avoiding lockdown ) 

गेल्यावर्षी देशात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र एकाएकी झालेल्या या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर सरकारवर टीकेजी झोड उठली होती. तसेच लॉकडाऊनमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. तसेच स्थलांतरीत मजुरांचीही मोठ्या प्रमाणात फरफट झाली होती. देशाच्या अर्थव्यवस्थेलाही लॉकडाऊनमुळे मोठा धक्का बसला होता. त्यामुळेच मोदींना काल आपल्या भाषणात चार वेळा लॉकडाऊन हा शब्द वापरला मात्र राज्यांना लॉकडाऊन न करण्याचा सल्ला दिला. मोदींप्रमाणेच विविध भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही लॉकडाऊन लावणे टाळत आहेत. त्यामागे त्यांच्या राजकीय अडचणीही आहेत.

दरम्यान, देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्याप्रकारे लॉकडाऊन न लावण्याचा सल्ला दिला आहे. त्यावरून भाजपाशासित राज्यांना याची आधीची माहिती दिली गेली असावी, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच या राज्यांकडून लॉकडाऊनला नकार दिला जात आहे. लॉकडाऊन लावला गेल्यास राज्यांच्या आर्थिक स्थितीवर थेट परिणाम होतो. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार बंद पडले होते. मजूर, कामगार वर्गाने मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले होते. त्यातून अनेक राज्ये अद्याप सावरलेली नाहीक, व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारतीय अर्थव्यवस्थेला ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्याच्या स्वप्नालाही ग्रहण लागले आहे. लॉकडाऊनचा फटका सरकारी तिजोरीलाही बसतो. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यावेळी लॉकडाऊन लावण्याच्या बाजूने नाही आहेत. त्याचे पालन भाजपाशासित राज्यांकडूनही होत आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण