शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

coronavirus: "महाराष्ट्राप्रमाणे देशातही लॉकडाऊन लागल्यास आश्चर्य वाटायला नको" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 15:07 IST

Sanjay Raut News : एकंदरीत परिस्थिती पाहता महाराष्ट्रातच नाही तर देशामध्येही लॉकडाऊन लागल्यास आश्चर्य वाटायला नको, असे विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रासह देशामध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रचंड प्रमाणात वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे शासन आणि प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. (coronavirus in Maharashtra ) त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लावण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, एकंदरीत परिस्थिती पाहता महाराष्ट्रातच नाही तर देशामध्येही लॉकडाऊन लागल्यास आश्चर्य वाटायला नको, असे विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. (Sanjay Raut Says "Don't be surprised if the country starts lockdown like Maharashtra")राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनबाबत मत मांडताना राऊत यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, अस्लम शेख कॅबिनेट मंत्री आहेत. मुंबईचे पालकमंत्री आहेत. बैठकीमध्ये ते असतात. सरकारच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री बोलू शकतात किंवा पालकमंत्री बोलू शकतात. मात्र मला जे चित्र दिसतंय त्यानुसार महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशातच लॉकजाऊन लावले गेले तर आश्चर्य वाटायला नको. काल उत्तर प्रदेशमध्ये हरिद्वारलासुद्धा लाखो लोक एकत्र आले. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांच्या सभा होत आहेत. त्यामनाने महाराष्ट्रात या गोष्टींवर नियंत्रण आहे, असे संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रामध्ये बाहेरील राज्यांमधून लोक येतात. तिथे काहीच नियंत्रण नाही आहे. त्यामुळेच राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, असा दावाही संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून ५० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. 

दरम्यान, संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या कारवाईचाही निषेध केला आहे. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर २४ तासांची प्रचारबंदी घातली आहे. केंद्रात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. हा लोकशाही आणि भारताच्या स्वतंत्र संस्थांच्या सार्वभौमत्वावर थेट हल्ला आहे, अशी टीका करत संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शवला आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतPoliticsराजकारण