शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

Coronavirus: दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही?, आरोग्यमंत्र्यांनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 11:18 IST

Coronavirus in Maharashtra: कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे महाराष्ट्रात किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, देशात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे त्या काळात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत होता. (Coronavirus in Maharashtra) दरम्यान, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे महाराष्ट्रात किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे राज्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले. (No deaths have been reported in Maharashtra due to lack of oxygen, information given by Health Minister Rajesh Tope)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, एप्रिल महिन्यात नाशिकमध्ये ऑक्सिजन टँकमध्ये गळती होऊन एका रुग्णालयातील २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी राजेश टोपे यांनी या हलगर्जीपणाबाबत माहिती घेण्यासाठी या घटनेचा तपास केला जाईल, अशे सांगितले होते. दरम्यान, मंगळवारी केंद्र सरकारने राज्यसभेत माहिती देताना सांगितले होते की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, देशातीत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

दरम्यान, या विधानावर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यावेळी एका वृत्तवाहिनीवर केंद्र सरकारच्या या विधानाबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यामध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे असे आम्ही कधीही म्हटलेले नाही. अनेक रुग्ण हे इतर आजारांनी पीडित होते. ऑक्सिजनच्या टंचाईमुळे कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

तत्पूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे झालेल्या मृत्यूंवरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. तसेच ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारविरोधात कोर्टात गेले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला होता. दरम्यान, यावर भाजपानेही जोरदार पलटवार केला होता. त्यात म्हटले होते की, विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यातील सरकारांनी दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे कोर्टात सांगितले होते. केंद सरकारने दिलेले उत्तर हे त्याच उत्तरावर आघारित आहे, असे भाजपाने स्पष्ट केले होते.

भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितले की, संसदेमध्ये केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून उत्तर दिले होते. कुठल्याही राज्याने ऑक्सिजनच्या टंचाईमुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा दिला नव्हता. पात्रा म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात ऑक्सिजनच्या टंचाईमुळे कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे सांगितले होते. छत्तीसगडच्या आरोग्यमंत्र्यांनीही असाच दावा केला होता.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपेMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार