शहरं
Join us  
Trending Stories
1
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
4
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
5
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
6
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
7
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
8
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
9
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
10
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
11
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
12
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
13
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
14
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
15
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
16
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
17
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
18
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
19
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
20
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 

Coronavirus: दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही?, आरोग्यमंत्र्यांनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 11:18 IST

Coronavirus in Maharashtra: कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे महाराष्ट्रात किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, देशात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे त्या काळात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत होता. (Coronavirus in Maharashtra) दरम्यान, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे महाराष्ट्रात किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे राज्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले. (No deaths have been reported in Maharashtra due to lack of oxygen, information given by Health Minister Rajesh Tope)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, एप्रिल महिन्यात नाशिकमध्ये ऑक्सिजन टँकमध्ये गळती होऊन एका रुग्णालयातील २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी राजेश टोपे यांनी या हलगर्जीपणाबाबत माहिती घेण्यासाठी या घटनेचा तपास केला जाईल, अशे सांगितले होते. दरम्यान, मंगळवारी केंद्र सरकारने राज्यसभेत माहिती देताना सांगितले होते की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, देशातीत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

दरम्यान, या विधानावर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यावेळी एका वृत्तवाहिनीवर केंद्र सरकारच्या या विधानाबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यामध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे असे आम्ही कधीही म्हटलेले नाही. अनेक रुग्ण हे इतर आजारांनी पीडित होते. ऑक्सिजनच्या टंचाईमुळे कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

तत्पूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे झालेल्या मृत्यूंवरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. तसेच ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारविरोधात कोर्टात गेले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला होता. दरम्यान, यावर भाजपानेही जोरदार पलटवार केला होता. त्यात म्हटले होते की, विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यातील सरकारांनी दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे कोर्टात सांगितले होते. केंद सरकारने दिलेले उत्तर हे त्याच उत्तरावर आघारित आहे, असे भाजपाने स्पष्ट केले होते.

भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितले की, संसदेमध्ये केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून उत्तर दिले होते. कुठल्याही राज्याने ऑक्सिजनच्या टंचाईमुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा दिला नव्हता. पात्रा म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात ऑक्सिजनच्या टंचाईमुळे कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे सांगितले होते. छत्तीसगडच्या आरोग्यमंत्र्यांनीही असाच दावा केला होता.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपेMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार