शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

Coronavirus: दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही?, आरोग्यमंत्र्यांनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 11:18 IST

Coronavirus in Maharashtra: कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे महाराष्ट्रात किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, देशात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे त्या काळात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत होता. (Coronavirus in Maharashtra) दरम्यान, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे महाराष्ट्रात किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे राज्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले. (No deaths have been reported in Maharashtra due to lack of oxygen, information given by Health Minister Rajesh Tope)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, एप्रिल महिन्यात नाशिकमध्ये ऑक्सिजन टँकमध्ये गळती होऊन एका रुग्णालयातील २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी राजेश टोपे यांनी या हलगर्जीपणाबाबत माहिती घेण्यासाठी या घटनेचा तपास केला जाईल, अशे सांगितले होते. दरम्यान, मंगळवारी केंद्र सरकारने राज्यसभेत माहिती देताना सांगितले होते की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, देशातीत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

दरम्यान, या विधानावर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यावेळी एका वृत्तवाहिनीवर केंद्र सरकारच्या या विधानाबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यामध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे असे आम्ही कधीही म्हटलेले नाही. अनेक रुग्ण हे इतर आजारांनी पीडित होते. ऑक्सिजनच्या टंचाईमुळे कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

तत्पूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे झालेल्या मृत्यूंवरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. तसेच ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारविरोधात कोर्टात गेले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला होता. दरम्यान, यावर भाजपानेही जोरदार पलटवार केला होता. त्यात म्हटले होते की, विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यातील सरकारांनी दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे कोर्टात सांगितले होते. केंद सरकारने दिलेले उत्तर हे त्याच उत्तरावर आघारित आहे, असे भाजपाने स्पष्ट केले होते.

भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितले की, संसदेमध्ये केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून उत्तर दिले होते. कुठल्याही राज्याने ऑक्सिजनच्या टंचाईमुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा दिला नव्हता. पात्रा म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात ऑक्सिजनच्या टंचाईमुळे कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे सांगितले होते. छत्तीसगडच्या आरोग्यमंत्र्यांनीही असाच दावा केला होता.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपेMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार