शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: मनमोहन सिंग यांनी मोदींना पत्र लिहिले, लसीकरण वाढवण्यासह हे महत्त्वाचे सल्ले दिले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 17:17 IST

coronavirus In India : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं (Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. (coronavirus In India )वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं (Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामधून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी यांना अनेक सल्ले दिले आहेत. ( Manmohan Singh writes letter to PM Narendra Modi, gives important advice with increasing vaccination)

डॉ. मनमोहन सिंग यांनी या पत्रामधून नरेंद्र मोदींना देशातील कोरोनाविरोधातील लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, कोरोना लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल. कारण कोरोनाविरोधातील लढाईत ही बाब महत्त्वपूर्ण आहे. तसेच आतापर्यंत किती लोकांचे लसीकरण झाले आहे त्याकडे लक्ष न देता एकूण लोकसंख्येपैकी कीती लोकांचा लसीकरण झाले आहे. यावर लक्ष केंद्रित करण्यात यावे. दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लिहिलेले हे पत्र पी. चिदंबरम यांनी शेअर केले आहे. 

सीडब्ल्यूसीच्या बैठकीतील चर्चेदरम्यान मिळालेले सल्ले या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, पंतप्रधानांना लिलिहेल्या पत्रात डॉ. मनमोहन सिंग यांनी ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही लसीकरणामध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. 

वेगवेगळ्या लसींबाबत सरकारचे काय आदेश आहेत. तसेच पुढच्या सहा महिन्यांमध्ये कोरोनाच्या लसीचा साठा मिळण्याबाबत काय परिस्थिती आहे, हे सरकारने सांगितले पाहिजे. तसेच विविध राज्यांना त्यांना अपेक्षित असलेला लसींचा साठा कसा मिळेल, हे केंद्र सरकारने पाहिले पाहिजे. तसेच राज्यांना फ्रंटलाइन वर्कर्सच्या श्रेणी परिभाषित करण्याची सूट दिली गेली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.  

भारत सरकारने लसनिर्मात्यांना काही अधिकच्या सवलती दिल्या पाहिजेत. इस्राइलप्रमाणे अनिवार्य लायसन्सिंगची व्यवस्था लागू केली पाहिजे. ज्या लसींना युरोपियन मेडिकल एजन्सीने किंवा यूएसएफडीएने मान्यता दिली आहे, अशा लसींची आयात करून त्या उपयोगात आणल्या पाहिजेत. 

दरम्यान, या पत्राबाबत पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये कोरोनाच्या साथीविरोधात लढण्यासाठी पाच महत्त्वपूर्ण सल्ले देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा त्वरित स्वीकार करून पुढील पावले उचलावीत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याManmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार