शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

CoronaVirus Live Updates : "विरोधी पक्षाने कोरोनाबद्दल लोकांमध्ये भीती निर्माण केलीय पण..."; योगी आदित्यनाथांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 20:17 IST

Corona Virus And Yogi Adityanath : कोरोनाचं संकट असताना विरोधी पक्ष लोकांना भडकवत आहेत असा गंभीर आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,49,65,463 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,81,386 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,106 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,74,390 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील कोरोनाचा कहर (CoronaVirus) पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीची जिल्ह्यांनुसार तपासणी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) अनेक जिल्ह्यांना भेट देत आहेत. सोमवारी मुझफ्फरनगरमध्ये त्यांनी कोरोना नियंत्रण कक्षापासून आरोग्य विभागाने केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

कोरोनाचं संकट असताना विरोधी पक्ष लोकांना भडकवत आहेत असा गंभीर आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. कोरोना काळात लोकांना धीर देणं आणि त्यांची हिंमत वाढवण्याची गरज आहे त्यावेळेस विरोधी पक्षातील नेते लोकांना घाबरवण्याचं काम करत आहेत अशा शब्दांत योगींनी निशाणा साधला आहे. रोगाच्या कालावधीमध्ये काही लोकांनी जनतेला धीर देऊन त्यांचा विश्वास वाढवण्याची गरज होती त्यावेळी त्यांनी जनतेला भडकवण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला. विरोधी पक्षांनी भीती दाखवल्यामुळे लोक ऑक्सिजनसाठी धावपळ करू लागले आणि सर्वजण घाबरुन गेले, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये 300 ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचं काम आम्ही करत आहोत. मुझफ्फरनगरमध्येही सहा ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात येणार आहेत. येथे चार प्लान्ट आधीपासूनच कार्यरत आहेत अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारने तयारी सुरू केल्याची माहिती दिली. आम्ही आतापासूनच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयारी सुरू केली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना प्रादुर्भाव होऊ शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र सर्वांनी या परिस्थितीमध्ये धीर धरणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले आहेत.

योगी आदित्यनाथ यांनी देशामध्ये सर्वाधिक कोरोना चाचण्या करणाऱ्या राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेश अव्वल असल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये साडेचार कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. गावांमध्येही ट्रेस, टेस्ट आणि ट्रीटमेंट या पद्धतीने काम सुरू आहे. लसीकरणही मोठ्या संख्येनेही सुरू करण्यात आलं आहे. आतापर्यंत दीड कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. राज्यामध्ये प्रादुर्भाव कमी होत आहे, असं योगी म्हणाले. तसेच समाजातील गरीब घटकांसाठी कम्युनिटी किचनची सेवा सुरू करण्यात आली आहे. गरीबांना मोफत धान्य देण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाDeathमृत्यू