शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

CoronaVirus Live Updates : "विरोधी पक्षाने कोरोनाबद्दल लोकांमध्ये भीती निर्माण केलीय पण..."; योगी आदित्यनाथांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 20:17 IST

Corona Virus And Yogi Adityanath : कोरोनाचं संकट असताना विरोधी पक्ष लोकांना भडकवत आहेत असा गंभीर आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,49,65,463 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,81,386 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,106 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,74,390 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील कोरोनाचा कहर (CoronaVirus) पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीची जिल्ह्यांनुसार तपासणी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) अनेक जिल्ह्यांना भेट देत आहेत. सोमवारी मुझफ्फरनगरमध्ये त्यांनी कोरोना नियंत्रण कक्षापासून आरोग्य विभागाने केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

कोरोनाचं संकट असताना विरोधी पक्ष लोकांना भडकवत आहेत असा गंभीर आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. कोरोना काळात लोकांना धीर देणं आणि त्यांची हिंमत वाढवण्याची गरज आहे त्यावेळेस विरोधी पक्षातील नेते लोकांना घाबरवण्याचं काम करत आहेत अशा शब्दांत योगींनी निशाणा साधला आहे. रोगाच्या कालावधीमध्ये काही लोकांनी जनतेला धीर देऊन त्यांचा विश्वास वाढवण्याची गरज होती त्यावेळी त्यांनी जनतेला भडकवण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला. विरोधी पक्षांनी भीती दाखवल्यामुळे लोक ऑक्सिजनसाठी धावपळ करू लागले आणि सर्वजण घाबरुन गेले, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये 300 ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचं काम आम्ही करत आहोत. मुझफ्फरनगरमध्येही सहा ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात येणार आहेत. येथे चार प्लान्ट आधीपासूनच कार्यरत आहेत अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारने तयारी सुरू केल्याची माहिती दिली. आम्ही आतापासूनच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयारी सुरू केली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना प्रादुर्भाव होऊ शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र सर्वांनी या परिस्थितीमध्ये धीर धरणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले आहेत.

योगी आदित्यनाथ यांनी देशामध्ये सर्वाधिक कोरोना चाचण्या करणाऱ्या राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेश अव्वल असल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये साडेचार कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. गावांमध्येही ट्रेस, टेस्ट आणि ट्रीटमेंट या पद्धतीने काम सुरू आहे. लसीकरणही मोठ्या संख्येनेही सुरू करण्यात आलं आहे. आतापर्यंत दीड कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. राज्यामध्ये प्रादुर्भाव कमी होत आहे, असं योगी म्हणाले. तसेच समाजातील गरीब घटकांसाठी कम्युनिटी किचनची सेवा सुरू करण्यात आली आहे. गरीबांना मोफत धान्य देण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाDeathमृत्यू