शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

coronavirus: "खंडणी वसूल करण्यापेक्षा ऑक्सिजनचा साठा केला असता तर हे मृत्यू थांबवता आले असते’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 11:29 IST

coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना विषाणूच्या फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. राज्यातील रुग्णसंख्येत दररोज मोठी वाढ होत असून, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे.

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूच्या फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. (coronavirus in Maharashtra) राज्यातील रुग्णसंख्येत दररोज मोठी वाढ होत असून, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. काही ठिकाणी वैद्यकीय साधनसामुग्रीचीही मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यातच काल रात्री नालासोपारा येथे ऑक्सिजनच्या अभावी काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले होते. त्यावरून आता भाजपाने ( BJP MLA Atul Bhatkhalkar ) राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  (coronavirus: "Death could have been prevented if oxygen had been stored instead of collecting ransom" BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize Maharashtra Government )

या घटनेवरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये अतुल भातखळकर म्हणतात की, नालासोपाऱ्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे एक तासात सात रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र मृत्यूचा सापळा बनले आहे. खंडणी वसूल करण्याच्या काळात ऑक्सिजनचा पुरेसा साठा केला असता तर कदाचित हे मृत्यू थांबवता आले असते, असा टोला भातखळकर यांनी या ट्विटमधून लगावला आहे. 

दरम्यान, गंभीर कोरोना रुग्णांना दाखल करून घेणारे आमचे रुग्णालय या परिसरातील एकमेवर रुग्णालय आहे. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यांना सहव्याधी होत्या, असे स्पष्टीकरण या रुग्णालयातील डॉक्टरांनी दिले आहे. दरम्यान, नालासोपाऱ्यात खासगी रुग्णालयात ऑक्सिजनअभावी १० रुग्णांच्या मृत्यू झाल्याच्याबाबतीत वसई-विरार शहर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून सोमवारी मध्यरात्री आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी प्रेसनोट जारी करून स्पष्टीकरण दिले आहे. त्यात म्हटले आहे की,  १२ एप्रिल रोजी विनायका हॉस्पिटल या खासगी रुग्णालयामध्ये ७ व रिद्धी विनायक या खासगी रुग्णालयामध्ये ३ रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला ही बातमी वस्तुस्थितीस अनुसरून नाही. या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध होता. किंबहुना वसई-विरार महानगरपालिका परिक्षेत्रात एकूण ८ खासगी कोविड रुग्णालये असून, अशा प्रकारे ऑक्सिजनअभावी कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब इतर कोणत्याही रुग्णालयात उद्भवलेली नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAtul Bhatkalkarअतुल भातखळकर